IND vs ENG: टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, इंग्लंडला ४३४ धावांनी हरवले

राजकोट: भारतीय क्रिकेट संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वात इतिहास रचला आहे. टीम इंडियाने कसोटी इतिहासात मोठ्या धावांनी विजय मिळवला आहे. राजकोटमध्ये खेळवल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडला ४३४ धावांनी हरवले. भारतासाठी यशस्वी जायसवालने दुहेरी शतक ठोकले. रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजाने शतक ठोकले. जडेजाने बॉलिंगमध्येही कामाल केली. टीम इंडिया या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडीवर आहे.


टीम इंडियाने पहिल्या डावात ४४५ धावा केल्या. या दरम्यान कर्णधार रोहितने १९६ चेंडूचा सामना करताना १३१ धावा केल्या त्याने १४ चौकार आणि ३ षटकार लगावले.रवींद्र जडेजाने २२५ चेंडूंचा सामना करताना ११२ धावा केल्या त्याने ९ चौकार आणि २ षटकार लगावले. पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या सर्फराज खानने शानदार अर्धशतक ठोकले. त्याने ६६ बॉलमध्ये ६२ धावा केल्या. ध्रुव जुरेलने ४६ धावांचे योगदान दिले.



यशस्वीचे शानदार दुहेरी शतक


भारतान ४३० धावा करत दुसरा डाव घोषित केला. या दरम्यान, यशस्वी जायसवालने दुहेरी शतक ठोकले. त्याने २३६ बॉलचा सामना करताना २१४ धावा केल्या. यशस्वीने या डावात १४ चौकार आणि १२ षटकार ठोकले. शुभमन गिलनेही चांगली कामगिरी केली. त्याने १५१ बॉलमध्ये ९१ धावा केल्या. सर्फराज या डावातही कमाल खेळला. त्याने ७२ चेंडूचा सामना करताना नाबाद ६८ धावा केल्या. सर्फराजने ६ चौकार आणि ३ षटकार लगावले.



चांगल्या सुरूवातीनंतर तोंडावर पडली स्टोक्सची टीम


इंग्लंडने पहिल्या डावात चांगली कामगिरी केली. त्यानी ३१९ धावा केल्या, मात्र दुसऱ्या डावात त्यांचा डाव पत्त्यासारखा कोसळला. इंग्लंडसाठी बेन डकेटने पहिल्या डावात शतक ठोकले. त्याने १५१ बॉलमध्ये १५३ धावा केल्या. या दरम्यान त्याने २३ चौकार आणि २ षटकार लगावले. बेन स्टोक्सने ८९ चेंडूत ४१ धावा केल्या. ओली पोपने ३९ धावा केल्या. त्याने ५ चौकार आणि एक षटकार ठोकला. इंग्लंडचा संपूर्ण संघ दुसऱ्या डावात १२२ धावांवर ऑलआऊट झाला.


इंग्लंडच्या पहिल्या डावात सिराजने ४ विकेट मिळवल्या. त्याने २१.१ षटकात ८४ धावा देत ४ बळी मिळवले. कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाने २-२ विकेट मिळवल्या. बुमराह आणि अश्विनला एक विकेट मिळवता आली. दुसऱ्या डावात जडेजाने कमाल केली. त्याने ५ विकेट मिळवल्या. जडेजाने १२.४ षटकांत ४१ धावा दिल्या. कुलदीप यादवला २ विकेट मिळाल्या.

Comments
Add Comment

IND vs SL: आशिया कपमध्ये पहिल्यांदा धावसंख्या २०० पार, भारताचे श्रीलंकेसमोर विजयासाठी इतके मोठे आव्हान

दुबई: आशिया कप २०२५मधील १८व्या सामन्यात भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी २०३ धावांचे भलेमोठे आव्हान ठेवले आहे.

ICCने सूर्यकुमार यादवला ठरवले दोषी, ठोठावला दंड, निर्णयाला BCCI ने दिले आव्हान

दुबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांनंतर वाद सुरूच आहे. या मालिकेतील भारत आणि

IND vs PAK: आम्ही टीम इंडियालाही हरवू शकतो...बांगलादेशला हरवल्यानंतर पाकच्या कर्णधाराने दिले चॅलेंज

दुबई: आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताचा सामना करण्यासाठी पाकिस्तानचा संघ सज्ज झाला आहे. बांगलादेशचा ११

Asis Cup 2025: आशिया कपच्या ४१ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार आहे हे...भारताविरुद्ध खेळणार हा संघ

दुबई: आशिया कप २०२५ च्या सुपर फोरमधील निर्णायक सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा ११ धावांनी पराभव करत अंतिम

बिग बॅश लीगमध्ये रविचंद्रन अश्विन सिडनी थंडरकडून खेळणार

कॅनबेरा : अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन बिग बॅश लीगच्या आगामी हंगामासाठी सिडनी थंडरकडून खेळणार आहे. या

वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई : वेस्ट इंडिज विरूद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयच्या निवड समितीने भारतीय संघ जाहीर