IND vs ENG: टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, इंग्लंडला ४३४ धावांनी हरवले

राजकोट: भारतीय क्रिकेट संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वात इतिहास रचला आहे. टीम इंडियाने कसोटी इतिहासात मोठ्या धावांनी विजय मिळवला आहे. राजकोटमध्ये खेळवल्या गेलेल्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडला ४३४ धावांनी हरवले. भारतासाठी यशस्वी जायसवालने दुहेरी शतक ठोकले. रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजाने शतक ठोकले. जडेजाने बॉलिंगमध्येही कामाल केली. टीम इंडिया या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडीवर आहे.


टीम इंडियाने पहिल्या डावात ४४५ धावा केल्या. या दरम्यान कर्णधार रोहितने १९६ चेंडूचा सामना करताना १३१ धावा केल्या त्याने १४ चौकार आणि ३ षटकार लगावले.रवींद्र जडेजाने २२५ चेंडूंचा सामना करताना ११२ धावा केल्या त्याने ९ चौकार आणि २ षटकार लगावले. पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या सर्फराज खानने शानदार अर्धशतक ठोकले. त्याने ६६ बॉलमध्ये ६२ धावा केल्या. ध्रुव जुरेलने ४६ धावांचे योगदान दिले.



यशस्वीचे शानदार दुहेरी शतक


भारतान ४३० धावा करत दुसरा डाव घोषित केला. या दरम्यान, यशस्वी जायसवालने दुहेरी शतक ठोकले. त्याने २३६ बॉलचा सामना करताना २१४ धावा केल्या. यशस्वीने या डावात १४ चौकार आणि १२ षटकार ठोकले. शुभमन गिलनेही चांगली कामगिरी केली. त्याने १५१ बॉलमध्ये ९१ धावा केल्या. सर्फराज या डावातही कमाल खेळला. त्याने ७२ चेंडूचा सामना करताना नाबाद ६८ धावा केल्या. सर्फराजने ६ चौकार आणि ३ षटकार लगावले.



चांगल्या सुरूवातीनंतर तोंडावर पडली स्टोक्सची टीम


इंग्लंडने पहिल्या डावात चांगली कामगिरी केली. त्यानी ३१९ धावा केल्या, मात्र दुसऱ्या डावात त्यांचा डाव पत्त्यासारखा कोसळला. इंग्लंडसाठी बेन डकेटने पहिल्या डावात शतक ठोकले. त्याने १५१ बॉलमध्ये १५३ धावा केल्या. या दरम्यान त्याने २३ चौकार आणि २ षटकार लगावले. बेन स्टोक्सने ८९ चेंडूत ४१ धावा केल्या. ओली पोपने ३९ धावा केल्या. त्याने ५ चौकार आणि एक षटकार ठोकला. इंग्लंडचा संपूर्ण संघ दुसऱ्या डावात १२२ धावांवर ऑलआऊट झाला.


इंग्लंडच्या पहिल्या डावात सिराजने ४ विकेट मिळवल्या. त्याने २१.१ षटकात ८४ धावा देत ४ बळी मिळवले. कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाने २-२ विकेट मिळवल्या. बुमराह आणि अश्विनला एक विकेट मिळवता आली. दुसऱ्या डावात जडेजाने कमाल केली. त्याने ५ विकेट मिळवल्या. जडेजाने १२.४ षटकांत ४१ धावा दिल्या. कुलदीप यादवला २ विकेट मिळाल्या.

Comments
Add Comment

भारत आणि दक्षिण आफ्रिका रविवारी आमनेसामने

अहमदाबाद : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर

शिखर धवन दुसऱ्यांदा अडकला विवाहबंधनात

नवी दिल्ली : माजी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनने दुसऱ्यांदा लग्न केले. आयर्लंडच्या सोफी शाइनसोबत शिखर धवनने लग्न

सुपर एट फेरीतला पहिलाच सामना पावसामुळे रद्द

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंडी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धची टी ट्वेंटी मालिका भारताने २-१ अशी जिंकली, सिडनी आणि अॅडलेडमध्ये भारताचा विजय

अॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांदरम्यान तीन सामन्यांची टी ट्वेंटी मालिका झाली. ही मालिका भारताने

पाक मिस्ट्री स्पिनर्सना रोखण्याचे 'किवीं'समोर आव्हान

कोलंबो :टी-२० विश्वचषकाच्या 'सुपर-८' फेरीचा थरार आजपासून खऱ्या अर्थाने सुरू होत असून, ग्रुप-२ मध्ये न्यूझीलंड आणि

घटस्फोटाच्या मालिकेत अजून एका क्रिकेटरची भर; "मी हा चॅप्टर क्लोज करतोय" म्हणत क्रिकेटरने केली घटस्फोटाची घोषणा

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेट विश्वात घटस्फोटांची मालिका सुरु आहे. अशातच आता या मालिकेत अजून एका