सकाळी अलार्म लावूनही उठता येत नाही, तर सोडून द्या ही गोष्ट

  171

मुंबई: आपल्या साऱ्यांनाच माहीत आहे सकाळी उठण्याचे अनेक फायदे असतात. मात्र असे असतानाही आपल्याला सकाळी लवकर उठता येत नाही. अनेकदा आपण सकाळी लवकर उठण्यासाठी अलार्म तर लावतो मात्र त्यानंतरही उठायला जमत नाही. जसे अलार्म वाजतो आपण अलार्म बंद करून पुन्हा झोपून जातो. जर तुमच्यासोबतही असे होत आहे तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या बातमीत आम्ही तुम्हाला टिप्स देऊ जे तुम्ही तुमच्या रूटीनमध्ये सामील करून सकाळी उठाल.



सकाळी लवकर उठण्यासाठी टिप्स


सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कधीही सकाळीसाठी अलार्म न लावता रात्रीसाठी लावा. तुम्ही हा विचार कराल की असे का? हा अलार्म बेडवर झोपण्यासाठी लावा. ९ ते १० दरम्यान लावा. जेव्हा तुम्ही सर्व कामे सोडून बेडवर झोपण्यासाठी तेव्हा प्रयत्न करा की ९ ते १० पर्यंत सर्व कामे पूर्ण कराल.


रात्री लवकर झोप येत नसेल तर पुस्तके वाचा अथवा डायरी लिहा


जेव्हा रात्री झोपायला जात असाल तर इलेक्ट्रॉनिक वस्तूंना अजिबात स्पर्श करू नका. कारण यातून निघणारी लाईट तुमच्या मेंदूला मेलाटोनिन नावाचे हार्मोन स्त्रवण्यापासून रोखते.


रात्रीच्या वेळेस हलके जेवण घ्या. खिचडी अथवा ओट्स खा. यासोबतच तुम्ही १ ग्लास दूध घेऊ शकता. मात्र लक्षात ठेवा की तुमच्या डिनर आणि झोपण्यामध्ये एकूण २ तासांचा गॅप असावा.


रात्रीच्या जेवणानंतर चुकूनही कॉफी पिऊ नका. नाहीतर तुम्ही सकाळी उठणारी रूटीन फॉलो करू शकत नाही.


जर तुम्ही अलार्म लावून झोपत आहात आणि उठू शकत नाही आहात तर अलार्म वाजल्यावर मोठी लाईट लावा. यामुळे डोळे उघडतील.


Comments
Add Comment

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘अरण्य’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच मराठी चित्रपट ‘अरण्य’ च्या पोस्टरचे अनावरण करण्यात

मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?

मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी

आरक्षणाची लढाई लढावी, पण... नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

मुंबई : जे रक्ताने मराठे असतात ते कधीही आईविषयी अपशब्द वापरणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना

मरिनड्राईव्हच्या समुद्रात तरुणीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या मरिनड्राईव्ह परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नरिमन पॉईंट येथील समुद्रात एका तरुणीचा

मुंबईत यंदा २७५ कृत्रिम तलावांची निर्मिती

मुंबई (खास प्रतिनिधी) : श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये व्हावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून