राजकोट: राजकोट कसोटीचा दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडची धावसंख्या २ बाद २०७ धावा इतकी झाली आहे. या पद्धतीने इंग्लंड दुसऱ्या दिवसअखेर २३८ धावांनी पिछाडीवर आहे. आजचा खेळ संपला तेव्हा सलामीवीर बेन डकेट आणि ज्यो रूट नाबाद परतले. बेन डकेट १३३ धावांवर खेळत आहे. तर ज्यो रूट ९ धावांवर आहे.
भारतीय संघाने पहिल्या डावात ४४५ धावा केल्या होत्या. भारतासाठी रवी अश्विन आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक यश मिळाले. रवी अश्विनने जॅक क्राऊलीला बाद केले. यासोबत रवी अश्विनने कसोटी फॉरमॅटमध्ये ५०० विकेटचा आकडा पार केला. जॅक क्राऊलीने १५ धावा केल्या. ओली पोप ३९ धावा बनवून मोहम्मद सिराजची शिकार बनला.
याआधी भारताचा पहिला डाव ४४५ धावांवर आटोपला. भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी ५ बाद ३२६ वरून खेळण्यास सुरूवात केली. मात्र पहिल्या दिवशी नाबाद राहिलेले रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव लवकर परतले. मात्र ध्रुव जुरेल, रवी अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांनी महत्त्वाचे योगदान दिले.
सुरत: सुरतच्या सचिन परिसरात शनिवारी बहुमजली इमारत कोसळली. ही इमारत कोसळल्यानंतर एनडीआरएफ, फायर ब्रिगेडचे संघ…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा २०२४ चा…
मुंबई: अर्शदीप सिंह टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर राहिला. त्याने…
विशेष - भालचंद्र ठोंबरे नहूष हा कुरूवंशातील पराक्रमी राजा होता. तो ययातीचा पिता आणि आयूचा…
निसर्गवेद - डॉ. महालक्ष्मी वानखेडकर गली खजिन्यातील एक हिरा म्हणजे ही कवक, बुरश्या, भूछत्र, अळंबी,…
क्राइम - अॅड. रिया करंजकर प्रत्येकाला समाजामध्ये नाव कमवायचे असते. त्यामुळे लोक कुठल्याही थराला जाऊन…