School Bus Owners : प्राथमिक शाळांबाबतच्या 'त्या' शासन निर्णयाला स्कूल बस चालकांचा विरोध

विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी घेण्यात आला होता 'तो' निर्णय


मुंबई : राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी (Maharashtra School) राज्य शासनाने (State Government) काही दिवसांपूर्वी मोठा निर्णय घेतला. पूर्व प्राथमिक (Pre-Primary School) ते चौथीपर्यंतच्या शाळा (Primary School) या सकाळी ९ वाजता किंवा त्यानंतर भरवण्याचे आदेश राज्य शासनाने दिले. विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थासाठी हा निर्णय घेण्यात आला. मात्र, या निर्णयाला स्कूलबस मालकांनी (School Bus Owners) विरोध दर्शवला आहे.


शाळा व्यवस्थापन आणि स्कूल बस मालकांशी कुठल्याही प्रकारे चर्चा न करता हा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आल्याचं स्कूल बस मालकांचं म्हणणं आहे. सकाळी नऊ वाजता जर शाळा भरत असेल तर, मुंबईत गर्दीच्या वेळी म्हणजेच पीक अवरमध्ये (Peak hour) स्कूल बसला फेऱ्या माराव्या लागणार आहेत, ही मोठी अडचण असल्याचं स्कूलबस मालकांचं म्हणणं आहे.



विद्यार्थ्यांची ने-आण करणे कठीण होईल


मुंबईतील वाहतूक कोंडी आणि रस्त्याची स्थिती याची जाणीव राज्य सरकारला आहे. शिवाय प्राथमिक शाळा सकाळी नऊ वाजेनंतर भरवल्यास दोन शिफ्टचे व्यवस्थापन स्कूलबस मालकांना शक्य होणार नाही. यामुळे स्कूलबसच्या एकूण आठ फेऱ्या गर्दीच्या वेळी माराव्या लागणार आहेत. यामध्ये कार्यालयीन कर्मचाऱ्यांची जाण्याची आणि येण्याची वेळ असल्याने या गर्दीत विद्यार्थ्यांची ने-आण करणे, हे अधिक अडचणीचे होणार असून यामध्ये अधिकचा वेळ लागणार आहे.



स्कूलबस भाडे २४ ते ४० टक्के वाढविण्याचा इशारा


सरकारने निर्णयावर फेरविचार न केल्यास आणि स्कूल बस मालकांना सक्ती केल्यास भाडे वाढ करण्याचा इशारा स्कूलबस मालकांनी दिला आहे. स्कूलबसचे भाडे २४ ते ४० टक्क्यांनी वाढवणार, असा इशारा स्कूल बस मालकांनी राज्य सरकारला दिला आहे. शिवाय काही शाळांसाठी प्राथमिक शाळेसाठी स्कूल बस सेवा देणे कठीण असल्याचं संघटनांकडून सांगण्यात आलं आहे.

Comments
Add Comment

Rajendra Jain : मंत्री भुजबळांचे आशीर्वाद घेत राजेंद्र जैन यांच्याकडून राज्यसभेसाठी अर्ज दाखल

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार  (Sunetra Pawar) यांनी विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर राज्यसभेच्या

KIDNAPPING : विवाहित महिलेशी संभाषणाच्या संशयातून तरुणाचे अपहरण; पोलिसांनी फिल्मी स्टाईलने केली सुटका

BARAMATI: बारामती तालुक्यातील सुपा परिसरातून एका तरुणाचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री उघडकीस आली.

Sangli Crime : धक्कादायक! 30 लाखांच्या विम्यासाठी मेहुण्यानेच रचला कट; सांगलीतील खुनाचे गूढ उलगडले

सांगली : सांगली (Sangli) जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात उघडकीस आलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने परिसरात खळबळ

Dimbhe Canal Drowning : डिंभे कालव्यात पोहण्याचा मोह जीवावर; १५ वर्षीय प्रज्वल चासकरचा बुडून दुर्दैवी अंत

MANCHAR PUNE: 'मला पोहता येते' असा आत्मविश्वास बाळगून डिंभे धरणाच्या (हुतात्मा बाबू गेनू जलाशय) डाव्या कालव्यात उडी

बीडमधील अजब प्रकार, अधिक महिन्याचं वाण थेट मांजराच्या पोटात

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील टाकरवण परिसरातील एका गावात अधिक मासानिमित्त घडलेल्या एका अनोख्या घटनेची सध्या जोरदार

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; खासगी ट्रॅव्हल्सची बस ट्रकवर आदळली, २५ प्रवासी जखमी

बुलढाणा : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात (Accident) झाला आहे. रविवारी मेहकर तालुक्यातील पिंपरी माळी गावाजवळ झालेल्या