School Bus Owners : प्राथमिक शाळांबाबतच्या 'त्या' शासन निर्णयाला स्कूल बस चालकांचा विरोध

विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी घेण्यात आला होता 'तो' निर्णय


मुंबई : राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी (Maharashtra School) राज्य शासनाने (State Government) काही दिवसांपूर्वी मोठा निर्णय घेतला. पूर्व प्राथमिक (Pre-Primary School) ते चौथीपर्यंतच्या शाळा (Primary School) या सकाळी ९ वाजता किंवा त्यानंतर भरवण्याचे आदेश राज्य शासनाने दिले. विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थासाठी हा निर्णय घेण्यात आला. मात्र, या निर्णयाला स्कूलबस मालकांनी (School Bus Owners) विरोध दर्शवला आहे.


शाळा व्यवस्थापन आणि स्कूल बस मालकांशी कुठल्याही प्रकारे चर्चा न करता हा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आल्याचं स्कूल बस मालकांचं म्हणणं आहे. सकाळी नऊ वाजता जर शाळा भरत असेल तर, मुंबईत गर्दीच्या वेळी म्हणजेच पीक अवरमध्ये (Peak hour) स्कूल बसला फेऱ्या माराव्या लागणार आहेत, ही मोठी अडचण असल्याचं स्कूलबस मालकांचं म्हणणं आहे.



विद्यार्थ्यांची ने-आण करणे कठीण होईल


मुंबईतील वाहतूक कोंडी आणि रस्त्याची स्थिती याची जाणीव राज्य सरकारला आहे. शिवाय प्राथमिक शाळा सकाळी नऊ वाजेनंतर भरवल्यास दोन शिफ्टचे व्यवस्थापन स्कूलबस मालकांना शक्य होणार नाही. यामुळे स्कूलबसच्या एकूण आठ फेऱ्या गर्दीच्या वेळी माराव्या लागणार आहेत. यामध्ये कार्यालयीन कर्मचाऱ्यांची जाण्याची आणि येण्याची वेळ असल्याने या गर्दीत विद्यार्थ्यांची ने-आण करणे, हे अधिक अडचणीचे होणार असून यामध्ये अधिकचा वेळ लागणार आहे.



स्कूलबस भाडे २४ ते ४० टक्के वाढविण्याचा इशारा


सरकारने निर्णयावर फेरविचार न केल्यास आणि स्कूल बस मालकांना सक्ती केल्यास भाडे वाढ करण्याचा इशारा स्कूलबस मालकांनी दिला आहे. स्कूलबसचे भाडे २४ ते ४० टक्क्यांनी वाढवणार, असा इशारा स्कूल बस मालकांनी राज्य सरकारला दिला आहे. शिवाय काही शाळांसाठी प्राथमिक शाळेसाठी स्कूल बस सेवा देणे कठीण असल्याचं संघटनांकडून सांगण्यात आलं आहे.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात