Rohit Sharma: २१८ दिवसांनी रोहित शर्माने कसोटीत ठोकले शतक, धोनीलाही टाकले मागे

मुंबई: ३३ धावांवर ३ विकेट आणि त्यानंतर २३७ धावांवर ४ विकेट ही आहे राजकोट कसोटीच्या पहिल्या दिवसाची कहाणी एका ओळीत. रोहित शर्माने(rohit sharma) राजकोटमध्ये पुन्हा एकदा दाखवले की तो टीम इंडियाचा सर्वात मोठा संकटमोचक आहे. आज आपल्या शतकीय खेळीदरम्यान त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांनी बनवलेल्या दलदलीतून भारतीय संघाला बाहेर काढले. या दरम्यान त्याला रवींद्र जडेजाची जबरदस्त साथ लाभली. त्याने अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे केले.


भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या मालिकेला राजकोटमध्ये सुरूवात झाली आहे. सामन्यास रोहित शर्माने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहितचा हा निर्णय फसतोय की काय असे वाटले कारण भारताने अवघ्या ३३ धावांत ३ विकेट गमावल्या. येथूनच रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा संघासाठी धावून आले. दोघांनी भारताला संकटातून बाहेर काढले.


या दरम्यान कर्णधार रोहित शर्माने १३१ धावांची शानदार शतकी खेळी केली. रोहितने कसोटीतील आपले ११वे शतक ठोकले. १० डावांनंतर हे शक्य झाले. याआधी रोहितने आपले शेवटचे कसोटी शतक जुलै २०२३मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकले होते.


३६ वर्षीय रोहित शर्माने २१८ दिवसांनी आपले कसोटी शतक ठोकले. तर या सामन्यात रोहित शर्माने महेंद्रसिंग धोनीला षटकार ठोकण्याच्या बाबतीतही मागे टाकले. धोनी कसोटी सामन्यांमध्ये एकूण ७८ षटकार ठोकले आहेत. तर हिटमॅनने कसोटीत एकूण ८० षटकार ठोकलेत.


रोहित शर्माने आजच्या शतकीय खेळी दरम्यान ३ षटकार ठोकले. तर भारताकडून सर्वाधिक षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. या क्रिकेटरने आपल्या कसोटी कारकिर्दीत ९० षटकार ठोकले होते.

Comments
Add Comment

Rinku Singh Century : दांडपट्ट्यागत बॅट फिरवली, ११ चौकार अन् षटकारांच्या मदतीने रिंकू सिंगचं रणजी ट्रॉफीत 'वादळी' शतक!

कानपूर : रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) २०२५-२६ हंगामाला जोरदार सुरुवात झाली असून, उत्तर प्रदेशचा स्टार फलंदाज रिंकू सिंग याने

कॅमेरॉन ग्रीन एकदिवसीय मालिकेतून बाहेर

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत वन-डे आणि टी-२० सामने असणार आहे. या

न्यूझीलंडविरुद्ध इंग्लंड ; टी-२० मालिका आजपासून रंगणार

नवी दिल्ली  : न्यूझीलंड शनिवारपासून घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे,

पर्थमध्ये सलामीसाठी भारतीय संघ सज्ज

ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी दिग्गजांचा कसून सराव मुंबई  :  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन

विराट आणि रोहित २०२७ विश्वचषकापर्यंत नक्की खेळतील - ट्रॅव्हिस हेड

कॅनबेरा : भारतीय वेळेनुसार रविवारी होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे सामन्यापूर्वी ट्रॅव्हिस हेड आणि

टीम इंडियाच्या 'अपोलो टायर्स' जर्सीचा लूक समोर, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी पर्थमध्ये फोटोशूट

पर्थ: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लवकरच सुरू होणाऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) मालिकेपूर्वी टीम इंडियाच्या