Rohit Sharma: २१८ दिवसांनी रोहित शर्माने कसोटीत ठोकले शतक, धोनीलाही टाकले मागे

मुंबई: ३३ धावांवर ३ विकेट आणि त्यानंतर २३७ धावांवर ४ विकेट ही आहे राजकोट कसोटीच्या पहिल्या दिवसाची कहाणी एका ओळीत. रोहित शर्माने(rohit sharma) राजकोटमध्ये पुन्हा एकदा दाखवले की तो टीम इंडियाचा सर्वात मोठा संकटमोचक आहे. आज आपल्या शतकीय खेळीदरम्यान त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांनी बनवलेल्या दलदलीतून भारतीय संघाला बाहेर काढले. या दरम्यान त्याला रवींद्र जडेजाची जबरदस्त साथ लाभली. त्याने अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे केले.


भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या मालिकेला राजकोटमध्ये सुरूवात झाली आहे. सामन्यास रोहित शर्माने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहितचा हा निर्णय फसतोय की काय असे वाटले कारण भारताने अवघ्या ३३ धावांत ३ विकेट गमावल्या. येथूनच रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा संघासाठी धावून आले. दोघांनी भारताला संकटातून बाहेर काढले.


या दरम्यान कर्णधार रोहित शर्माने १३१ धावांची शानदार शतकी खेळी केली. रोहितने कसोटीतील आपले ११वे शतक ठोकले. १० डावांनंतर हे शक्य झाले. याआधी रोहितने आपले शेवटचे कसोटी शतक जुलै २०२३मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकले होते.


३६ वर्षीय रोहित शर्माने २१८ दिवसांनी आपले कसोटी शतक ठोकले. तर या सामन्यात रोहित शर्माने महेंद्रसिंग धोनीला षटकार ठोकण्याच्या बाबतीतही मागे टाकले. धोनी कसोटी सामन्यांमध्ये एकूण ७८ षटकार ठोकले आहेत. तर हिटमॅनने कसोटीत एकूण ८० षटकार ठोकलेत.


रोहित शर्माने आजच्या शतकीय खेळी दरम्यान ३ षटकार ठोकले. तर भारताकडून सर्वाधिक षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. या क्रिकेटरने आपल्या कसोटी कारकिर्दीत ९० षटकार ठोकले होते.

Comments
Add Comment

IND vs SL: आशिया कपमध्ये पहिल्यांदा धावसंख्या २०० पार, भारताचे श्रीलंकेसमोर विजयासाठी इतके मोठे आव्हान

दुबई: आशिया कप २०२५मधील १८व्या सामन्यात भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी २०३ धावांचे भलेमोठे आव्हान ठेवले आहे.

ICCने सूर्यकुमार यादवला ठरवले दोषी, ठोठावला दंड, निर्णयाला BCCI ने दिले आव्हान

दुबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांनंतर वाद सुरूच आहे. या मालिकेतील भारत आणि

IND vs PAK: आम्ही टीम इंडियालाही हरवू शकतो...बांगलादेशला हरवल्यानंतर पाकच्या कर्णधाराने दिले चॅलेंज

दुबई: आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताचा सामना करण्यासाठी पाकिस्तानचा संघ सज्ज झाला आहे. बांगलादेशचा ११

Asis Cup 2025: आशिया कपच्या ४१ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार आहे हे...भारताविरुद्ध खेळणार हा संघ

दुबई: आशिया कप २०२५ च्या सुपर फोरमधील निर्णायक सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा ११ धावांनी पराभव करत अंतिम

बिग बॅश लीगमध्ये रविचंद्रन अश्विन सिडनी थंडरकडून खेळणार

कॅनबेरा : अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन बिग बॅश लीगच्या आगामी हंगामासाठी सिडनी थंडरकडून खेळणार आहे. या

वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई : वेस्ट इंडिज विरूद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयच्या निवड समितीने भारतीय संघ जाहीर