Rohit Sharma: २१८ दिवसांनी रोहित शर्माने कसोटीत ठोकले शतक, धोनीलाही टाकले मागे

  106

मुंबई: ३३ धावांवर ३ विकेट आणि त्यानंतर २३७ धावांवर ४ विकेट ही आहे राजकोट कसोटीच्या पहिल्या दिवसाची कहाणी एका ओळीत. रोहित शर्माने(rohit sharma) राजकोटमध्ये पुन्हा एकदा दाखवले की तो टीम इंडियाचा सर्वात मोठा संकटमोचक आहे. आज आपल्या शतकीय खेळीदरम्यान त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांनी बनवलेल्या दलदलीतून भारतीय संघाला बाहेर काढले. या दरम्यान त्याला रवींद्र जडेजाची जबरदस्त साथ लाभली. त्याने अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे केले.


भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या मालिकेला राजकोटमध्ये सुरूवात झाली आहे. सामन्यास रोहित शर्माने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहितचा हा निर्णय फसतोय की काय असे वाटले कारण भारताने अवघ्या ३३ धावांत ३ विकेट गमावल्या. येथूनच रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा संघासाठी धावून आले. दोघांनी भारताला संकटातून बाहेर काढले.


या दरम्यान कर्णधार रोहित शर्माने १३१ धावांची शानदार शतकी खेळी केली. रोहितने कसोटीतील आपले ११वे शतक ठोकले. १० डावांनंतर हे शक्य झाले. याआधी रोहितने आपले शेवटचे कसोटी शतक जुलै २०२३मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकले होते.


३६ वर्षीय रोहित शर्माने २१८ दिवसांनी आपले कसोटी शतक ठोकले. तर या सामन्यात रोहित शर्माने महेंद्रसिंग धोनीला षटकार ठोकण्याच्या बाबतीतही मागे टाकले. धोनी कसोटी सामन्यांमध्ये एकूण ७८ षटकार ठोकले आहेत. तर हिटमॅनने कसोटीत एकूण ८० षटकार ठोकलेत.


रोहित शर्माने आजच्या शतकीय खेळी दरम्यान ३ षटकार ठोकले. तर भारताकडून सर्वाधिक षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. या क्रिकेटरने आपल्या कसोटी कारकिर्दीत ९० षटकार ठोकले होते.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार