Rohit Sharma: २१८ दिवसांनी रोहित शर्माने कसोटीत ठोकले शतक, धोनीलाही टाकले मागे

मुंबई: ३३ धावांवर ३ विकेट आणि त्यानंतर २३७ धावांवर ४ विकेट ही आहे राजकोट कसोटीच्या पहिल्या दिवसाची कहाणी एका ओळीत. रोहित शर्माने(rohit sharma) राजकोटमध्ये पुन्हा एकदा दाखवले की तो टीम इंडियाचा सर्वात मोठा संकटमोचक आहे. आज आपल्या शतकीय खेळीदरम्यान त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांनी बनवलेल्या दलदलीतून भारतीय संघाला बाहेर काढले. या दरम्यान त्याला रवींद्र जडेजाची जबरदस्त साथ लाभली. त्याने अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे केले.


भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या मालिकेला राजकोटमध्ये सुरूवात झाली आहे. सामन्यास रोहित शर्माने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहितचा हा निर्णय फसतोय की काय असे वाटले कारण भारताने अवघ्या ३३ धावांत ३ विकेट गमावल्या. येथूनच रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा संघासाठी धावून आले. दोघांनी भारताला संकटातून बाहेर काढले.


या दरम्यान कर्णधार रोहित शर्माने १३१ धावांची शानदार शतकी खेळी केली. रोहितने कसोटीतील आपले ११वे शतक ठोकले. १० डावांनंतर हे शक्य झाले. याआधी रोहितने आपले शेवटचे कसोटी शतक जुलै २०२३मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ठोकले होते.


३६ वर्षीय रोहित शर्माने २१८ दिवसांनी आपले कसोटी शतक ठोकले. तर या सामन्यात रोहित शर्माने महेंद्रसिंग धोनीला षटकार ठोकण्याच्या बाबतीतही मागे टाकले. धोनी कसोटी सामन्यांमध्ये एकूण ७८ षटकार ठोकले आहेत. तर हिटमॅनने कसोटीत एकूण ८० षटकार ठोकलेत.


रोहित शर्माने आजच्या शतकीय खेळी दरम्यान ३ षटकार ठोकले. तर भारताकडून सर्वाधिक षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. या क्रिकेटरने आपल्या कसोटी कारकिर्दीत ९० षटकार ठोकले होते.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत