Water shortage : मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईकरांवर येणार पाणीकपातीचे संकट

दोन महिने आधीच आली राखीव पाणीसाठा मागण्याची वेळ


मुंबई : मार्च महिन्यापासून मुंबईकरांना (Mumbaikars) १० टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावातील पाणीसाठा वेगाने कमी होत असून केवळ ४८ टक्के पाणीसाठा उरला आहे. त्यामुळे भातसा आणि उर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा मिळावा अशी मागणी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने (BMC) राज्य सरकारकडे (Maharashtra Government) पत्राद्वारे केली आहे. राज्य सरकारने ही मागणी मान्य न केल्यास मुंबईकरांसाठी पाणी कपात (Water cut) अटळ असणार आहे.


मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणात राखीव साठा मिळून सध्या केवळ ४८.९५ टक्के पाणीसाठा जमा आहे. हा पाणीसाठा गेल्या तीन वर्षातील सर्वात कमी पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा पावसाळ्यापर्यंत पुरणार नसल्यामुळे १० टक्के पाणी कपात करावी लागेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भातसा आणि उर्ध्व वैतरणा या धरणातील राखीव पाणीसाठा मिळावा अशी मागणी पालिका प्रशासनाने राज्य सरकारला पत्र पाठवून केली आहे. याबाबतचे पत्र जलविभागाने पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मान्यतेसाठी पाठवले आहे.


दरवर्षी ऑक्टोबरमध्येही पाऊस पडतो, पावसाचे पाणी धरणक्षेत्रात झिरपत येत असते. यंदा मात्र ऑक्टोबरपूर्वीच पाऊस थांबल्यामुळे धरणातील पाणी वेगाने आटले असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी दिली. यामुळे राखीव पाणीसाठ्याची गरज भासत आहे.



मे ऐवजी मार्चमध्येच मागावा लागतोय राखीव पाणीसाठा


एखाद्या वर्षी पाणीसाठा कमी झाला तर राखीव साठ्यातून पाणी मिळावे याकरीता पालिका प्रशासन मे महिन्याच्या आसपास राज्य सरकारला पत्र पाठवले जाते. यंदा मात्र ही वेळ मार्च महिन्यातच आली आहे. जून २०२३ मध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे पालिकेने राज्य सरकारकडे राखीव साठ्याची मागणी केली होती. त्यामुळे पाणी कपात टळली होती. मात्र पावसाने ओढ दिल्यामुळे जुलै २०२३ मध्ये अखेर १० टक्के कपात करावी लागली होती. पाणीसाठा ८१ टक्के झाल्यानंतर ऑगस्ट २०२३ मध्ये ही पाणीकपात रद्द करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा पाणी कपातीचे संकट घोंगावत आहे.



तीन वर्षांतील सर्वात कमी पाणीसाठा


मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणात मिळून ७ लाख ८ हजार ४५९ दशलक्षलीटर म्हणजेच ४८.९५ टक्के पाणीसाठा आहे. यापूर्वी २०२३ मध्ये तो ५४.४१ टक्के इतका होता तर २०२२ मध्ये ५६.८६ टक्के इतका होता. यंदा ही टक्केवारी फारच खाली घसरली आहे. त्यामुळे दहा टक्के पाणी कपात टाळता येईल इतका राखीव पाणीसाठा मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे.


Comments
Add Comment

Zero SPAD : EMU Local च्या सिग्नल प्रणालीत सुधारणा, मध्य रेल्वेचा सुरक्षिततेवर भर

मुंबई : मध्य रेल्वेने मुंबई उपनगरीय रेल्वेतील प्रवासी आणि रेल्वे संचालनाची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी

Supriya Sule : पुणे-मुंबई प्रवासादरम्यान सुप्रिया सुळे यांच्या गाडीला अपघात; सीट बेल्टमुळे मोठा अनर्थ टळला

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या गाडीचा पुणे-मुंबई महामार्गावर

BMC News : नगरसेवकांना गृहीत धरून काम करू नका; महापौरांनी अधिकाऱ्यांचे टोचले कान

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मागील पावणे चार वर्षे नगरसेवक नव्हते म्हणून महापालिका प्रशासनातील अधिकारी जर आता

BMC News : महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर, आता नगरसेवकांना विकास निधी वापरण्याचे खाते झाले खुले !

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मांडलेले सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाज

BMC News : मुंबईतील घटनांवर पाहण्याची महापालिकेची दृष्टी झाली अंधूक

- आपत्कालिन नियंत्रण कक्षातील व्हिडीओ वॉलची गुणवत्ता खालावली मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील सर्व ठिकाणांवर

Megablock : ठाणे ते वाशी पाच तास रेल्वे सेवा बंद राहणार, तर मध्य रेल्वेवरही रविवारी मेगाब्लॉक

मुंबई : 'नीट' परीक्षेमुळे गेल्या रविवारी रेल्वेने मेगाब्लॉक रद्द केला होता. मात्र, या रविवारी (१० मे) रेल्वेच्या