Manoj Jarange Patil : 'जरांगे उपचार घेणार की नाहीत?' मुंबई उच्च न्यायालयाने केली विचारणा

मी मेलो तर मला शासनाच्या दारात नेऊन टाका : मनोज जरांगे


जालना : मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी लावून धरत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसले आहेत. जालन्यातील आंतरवाली सराटी जेथून खरी मराठा आरक्षणाला सुरुवात झाली त्या ठिकाणी जरांगेंनी पुन्हा बेमुदत उपोषण पुकारले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असून प्रकृती अत्यंत खालावली आहे. त्यामुळे जरांगेंनी लवकरात लवकर उपचार घ्यावेत अशी मागणी मराठा बांधवांकडून केली जात आहे. मात्र, उपचार न घेण्यावर जरांगे ठाम आहेत. तसेच मेलो तर शासनाच्या दारात नेऊन टाका, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.


राजपत्रित अध्यादेश व मसुदा यांची अंमलबजावणी करावी, अधिवेशन घेऊन ‘सगेसोयऱ्या’बाबत कायदा मंजूर करावा, यासाठी शनिवार १० फेब्रुवारीपासून मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण करत आहेत. जरांगे यांची परवानगी नसताना त्यांच्यावर उपचार करण्यात आले याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. काळजीची गरज असेल तर सरकारने मराठा आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी अन्यथा पुढील आंदोलनासाठी मुंबईला जाण्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे.


‘मी वैद्यकीय उपचार घेणार नाही. मला झोपेत सलाईन लावू नका. सलाईन लावायचे असेल तर अगोदर अंमलबजावणी कधी करता ते सांगा. मायबाप समाज तुम्ही सरकारला धारेवर धरा. मी एकटा मुंबईत जाऊन बसेन. अंमलबजावणी झाल्याशिवाय उठणार नाही. सरकारने त्वरित निर्णय घ्यावा. अंत पाहू नका. मी जर मेलो तर मला शासनाच्या दारात नेऊन टाका,’’ असे मनोज जरांगे यांनी काल आंतरवाली सराटी येथे उपस्थित मोठ्या जनसमुदायाला सांगितले. यावेळी जरांगे यांनी त्यांना लावलेली सलाईन काढून फेकून दिली.



उच्च न्यायालयाकडून जरांगेंना उपचाराबाबत विचारणा


दरम्यान मनोज जरांगे यांना उच्च न्यायालयाने (Mumbai Highcourt) औषध उपचाराच्या संदर्भात विचारणा केली आहे. जरांगे उपचार घेणार की नाही, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने केला आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे यांच्या उपोषणाच्या संदर्भात एक याचिका दाखल केली. त्यावरून न्यायालयाने जरांगे यांना आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.


Comments
Add Comment

सन्मानाचा अंतिम निरोपही डावलला , बेवारस मृतदेहाचा अंतिम प्रवास चक्क कचऱ्याच्या घंटागाडीतून ; कुठे घडला संतापजनक प्रकार

Jalgaon  : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) शहरातून मानवी संवेदनशीलतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल प्रकरणात नवीन वळण; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हाती प्रकरणाची धुरा

पुणे : बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्यायालयीन लढाईला आता नवे वळण मिळाले आहे. एकीकडे आरोपी सिया

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)