IND vs ENG: जडेजा, रोहितचे दमदार शतक, सर्फराजचे अर्धशतक, भारत पहिल्या दिवसअखेर ५ बाद ३२६

राजकोट: भारत(india) आणि इंग्लंड(england) यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने पहिल्या दिवसअखेर ५ बाद ३२६ धावा केल्या. रवींद्र जडेजाचे नाबाद शतक, कर्णधार रोहित शर्माची अर्धशतकी खेळी आणि सर्फराज खानचे पदार्पणातील अर्धशतक यांच्या जोरावर भारताने पहिल्या दिवशी तीनशेहून अधिक धावांचा टप्पा गाठला.


पहिल्या दिवसाच्या सुरूवातीलाच ३ बाद ३३ अशी अवस्था असताना भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी खेळपट्टीवर टिकून राहत भारताला मोठी धावसंख्या गाठून दिली. तब्बल २१८ दिवसांनी रोहित शर्माने कसोटीतील शतक ठोकले.


रोहितने १९६ चेंडूंचा सामना करताना १४ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने १३१ धावा तडकावल्या. रोहितने या सामन्यात षटकार ठोकण्याच्या बाबतीत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीलाही मागे टाकले.


त्याला रवींद्र जडेजाची जबरदस्त साथ लाभली. रवींद्र जडेजाने दिवसअखेर नाबाद ११० धावा केल्यात. या खेळीत जडेजाने आतापर्यंत ९ चौकार आणि २ षटकार ठोकलेत. यासोबतच सर्फराज खाननेही या पदार्पणाच्या सामन्यात ६२ धावांची तुफानी खेळी केली.


सर्फराज खानने ६६ बॉलमध्ये ९चौकार आणि १ षटकार लगावताना ६२ धावा ठोकल्या. त्याचे हे पहिलेच अर्धशतक आहे. भारताचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारत ५ बाद ३२६ धावांवर खेळत होता.


इंग्लंडकडून मार्कवूडने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर टॉम हार्टलेला एक बळी मिळवता आला. जेम्स अँडरसन आणि रेहान अहमद यांना एकही बळी मिळवण्यात यश मिळाले नाही.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026 : अभिषेक शर्माच्या फॉर्मची काळजी करणाऱ्यांची मला काळजी वाटते : सूर्यकुमार यादव

आयसीसी टी२० २०२६ च्या विश्वचषकाचा गट टप्पा संपला असून आता सुपर ८ चा महत्वाचा टप्पा सुरु झाला आहे. या स्पर्धेत

भारत आणि दक्षिण आफ्रिका रविवारी आमनेसामने

अहमदाबाद : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर

शिखर धवन दुसऱ्यांदा अडकला विवाहबंधनात

नवी दिल्ली : माजी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनने दुसऱ्यांदा लग्न केले. आयर्लंडच्या सोफी शाइनसोबत शिखर धवनने लग्न

सुपर एट फेरीतला पहिलाच सामना पावसामुळे रद्द

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंडी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धची टी ट्वेंटी मालिका भारताने २-१ अशी जिंकली, सिडनी आणि अॅडलेडमध्ये भारताचा विजय

अॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांदरम्यान तीन सामन्यांची टी ट्वेंटी मालिका झाली. ही मालिका भारताने

पाक मिस्ट्री स्पिनर्सना रोखण्याचे 'किवीं'समोर आव्हान

कोलंबो :टी-२० विश्वचषकाच्या 'सुपर-८' फेरीचा थरार आजपासून खऱ्या अर्थाने सुरू होत असून, ग्रुप-२ मध्ये न्यूझीलंड आणि