T20 World Cup 2024: रोहित शर्मा होणार टी-२० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा कर्णधार

मुंबई: या वर्षी अमेरिकेत होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमध्ये(t-20 world cup) टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्माच्या हातात असणार आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे सचिव जय शाहने रोहित शर्माला टी-२० वर्ल्डकपसाठी कर्णधार म्हणून घोषित केले आहे.


जय शाह यांनी विश्वास व्यक्त केला आहे की रोहित शर्मा टी-२० वर्ल्डकप जिंकणे गरजेचे आहे. जय शाहने गेल्या वर्षी वनडे वर्ल्डकपमध्ये केलेल्या टीम इंडियाच्या कामगिरीबाबत आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान टीम इंडियाला वर्ल्डकप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.


एका टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत जय शाह यांनी कन्फर्म केले की रोहित शर्मा टी-२० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा कर्णधार असेल. जय शाहने राजकोटमध्ये खेळवल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटीआधी सांगितले, भले आम्ही २०२३च्या वनडे वर्ल्डकपमधील फायनल सामना हरलो असलो तरी टीम इंडिया चाहत्यांची मने जिंकण्यात यशस्वी राहिली.


भारताने सलग १० सामने जिंकले. मला विश्वास आहे की रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया या वर्षी होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमध्ये विजय मिळवण्यात यशस्वी होतील.

Comments
Add Comment

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना

रायपूरमध्ये होणार भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना

रायपूर: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रांचीतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेची दमदार सुरुवात