NCP MLA Disqualification : राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणावर उद्या येणार निकाल

  154

शिवसेना निकालाची होणार पुनरावृत्ती?


मुंबई : जून महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) फूट पडली आणि राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथी झाल्या. अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि शरद पवार (Sharad Pawar) व अजित पवार यांच्यातील संघर्ष वाढत गेला. यानंतर खरी राष्ट्रवादी कोणाची हा प्रश्न उभा राहिला. याबाबत काहीच दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने निकाल देत खरी राष्ट्रवादी अजित पवारांचीच असल्याचे सांगत राष्ट्रवादी पक्ष व घड्याळाचे चिन्ह अजितदादांना बहाल केले.


यानंतर आता राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेची (MLA Disqualification case) सुनावणी प्रतिक्षेत आहे. शिवसेनेप्रमाणे याही प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narewekar) यांच्या हाती सोपवण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेला दिलेल्या निकालाप्रमाणेच राष्ट्रवादीबाबतचाही निर्णय येतो का? याबाबत सर्वत्र चर्चा सुरु आहे.


राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दोन्ही गटांकडून आपआपली मते मांडण्यात येत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना राहुल नार्वेकांनी म्हटले की, १५ फेब्रुवारी म्हणजेच उद्यापर्यंत राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर अंतिम निकाल देण्यात येणार आहे.


राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल देण्यास १५ दिवसांचा कालावधी वाढवून देण्यात आला होता. त्यामुळे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणानंतर लवकरच राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर देखील येत्या काही दिवसांत निकाल लागेल, अशी चिन्हे होती. त्यानुसार उद्याच हा निकाल हाती येणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.