National Film Awards : राष्ट्रीय पुरस्कारांच्या 'त्या' श्रेणींना इंदिरा गांधी व नर्गिस दत्त यांचे नाव नसणार

काय आहेत दोन मोठे बदल?


नवी दिल्ली : भारतात चित्रपटांसाठी (Indian Films) राष्ट्रीय पुरस्कार (National Film Awards) सर्वोच्च मानला जातो. यंदाच्या वर्षापासून या राष्ट्रीय पुरस्कारांच्या श्रेणीमध्ये दोन मोठे आणि महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत. यानुसार बक्षिसाची रक्कम आणि दोन श्रेणींच्या पुरस्कारांची नावे बदलण्यात आली आहेत. यापुढे राष्ट्रीय पुरस्कारांच्या दोन श्रेणी ज्यांना इंदिरा गांधी (Indira Gandhi) व नर्गिस दत्त (Nargis Dutt) यांच्या नावाने ओळखल्या जायच्या त्या श्रेणींच्या पुरस्कारांचे नाव बदलण्यात येणार आहे.


समितीने सुचविलेल्या बदलांनुसार, 'दिग्दर्शकाच्या सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठी इंदिरा गांधी पुरस्कार' (Indira Gandhi Award for Best Debut Film of a Director) हे नाव बदलून 'दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट', असे करण्यात आले आहे. तर 'नॅशनल इंटिग्रेशनवरील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा नर्गिस दत्त पुरस्कार' (Nargis Dutt Award for Best Feature Film on National Integration) आता 'राष्ट्रीय, सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म' म्हणून ओळखला जाईल. या श्रेणीमध्ये, सामाजिक समस्या आणि पर्यावरण संरक्षणासाठी पुरस्कार श्रेणी एकत्रित केल्या आहेत.



बक्षिसाच्या रक्कमेतही करण्यात आला बदल


बक्षिसाची रक्कम, जी आधी निर्माता आणि दिग्दर्शकामध्ये विभागली जात होती, ती आता फक्त दिग्दर्शकाला दिली जाईल. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समितीच्या एका सदस्याने सांगितले की, “समितीने कोरोनाच्या काळात बदलांचा विचार केला होता. हे बदल करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे." यंदाच्या वर्षापासून या बदलांची अंमलबजावणी करण्यात येईल.

Comments
Add Comment

कर्नाटकमध्ये प्रत्येक आमदाराला शुभारंभाच्या सामन्याचे VIP पास मिळणार

बंगळुरू : कर्नाटकमध्ये प्रत्येक आमदाराला आयपीएलच्या राज्यातील शुभारंभाच्या सामन्याचे VIP पास मिळणार आहेत.

लडाखमध्ये हिमस्खलन, सात जणांचा मृत्यू; श्रीनगर-लेह महामार्ग बंद

लडाख : लडाखमधील झोजी ला येथे श्रीनगर-लेह महामार्गावर झालेल्या हिमस्खलनात अनेक वाहने बर्फाखाली गाडली गेली.

महाराष्ट्र आणि गोव्याला पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानाअंतर्गत ५९२ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी प्राप्त

नवी दिल्ली : केंद्र सरकारने, पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी, महाराष्ट्र आणि

एस-400 मिसाइलसह संरक्षण उपकरणांच्या खरेदीस मंजुरी

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण मंत्रालयाने हवाई दलासाठी रशियाकडून एस-400 एअर डिफेन्स सिस्टमची अतिरिक्त बॅटरी खरेदी

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्त्वात उच्चस्तरीय गटाची स्थापना

- पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या

PM Narendra Modi : युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी करणार सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच शुक्रवार २७ मार्च रोजी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ