Eng vs Ind: ३ स्पिनर, २ वेगवान राजकोट कसोटीत अशी आहे इंग्लंडची प्लेईंग ११

मुंबई: इंग्लंड क्रिकेट संघाने राजकोटमध्ये होणाऱ्या भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी संघाची घोषणा केली आहे. हैदराबादमधील पहिल्या कसोटीत खेळणाऱ्या मार्क वूडचे संघात पुनरागमन झाले आहे.


तर विशाखापट्टणम कसोटीत पदार्पण करणाऱ्या शोएब बशीरला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. एकूण मिळून हाच एक मोठा बदल बेन स्टोक्सने तिसऱ्या कसोटीत केला आहे. अशातच आता इंग्लंडच्या संघात २ वेगवान आणि ३ स्पिनर असलीतल. वेगवान गोलंदाजांमध्ये संघात मार्क वूडसह जेम्स अँडरसनसोबत मोर्चा सांभाळेल. तर स्पिन गँगमध्ये रेहान अहमद, टॉम हार्टले आणि ज्यो रूट असतील.



का बाहेर गेला शोएब बशीर


विशाखापट्टणममध्ये शोएब बशीरने आपल्या पदार्पणात चांगली कामगिरी केली नाही. त्याला ४ विकेट मिळाले खरे मात्र तो लयीत दिसला नाही. शोएब बशीरने पहिल्या डावात ३८ ओव्हर गोलंदाजी केली. त्याला एकूण तीन विकेट मिळाल्या.


राजकोट कसोटीसाठी इंग्लंडचे प्लेईंग ११- जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, ज्यो रूट, जॉनी बेअरस्ट्रॉ, बेन स्टोक्स(कर्णधार), बेन फॉक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वूड, जेम्स अँडरसन,


तिसऱ्या कसोटीसाठी भारताचे संभाव्य प्लेईंग ११- रोहित शर्मा(कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन दिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल/केएस भरत, आर अश्विन, अक्षर पटेल/कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि मुकेश कुमार.g

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत