PM Modi: प्रत्येक श्वास म्हणतोय भारत-यूएई मैत्री जिंदाबाद- पंतप्रधान मोदी

अबूधाबी: पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) यांनी मंगळवारी संयुक्त अरब अमिरातमध्ये भारतीय वंशाच्या लोकांना संबोधित करताना म्हटले की भारताला त्यांच्यावर गर्व आहे. ही वेळ दोन्ही देशांदरम्यानच्या मित्रतेचा जयकार आहे. अबूधाबीच्या जायद स्पोर्ट्स स्टेडियममध्ये मोदी मोदी असा नारा सुरू असताना पंतप्रधान मोदींनी अहलन मोदी कार्यक्रमात सामील झालेल्या भारतीय वंशाच्या लोकांना अभिवादन करत नमस्कार म्हटले.


भारतीय समुदायाच्या या कार्यक्रमाने ते मंत्रमुग्ध झाले. पंतप्रधान मोदी म्हणाले, तुम्ही येथे इतक्या मोठ्या संख्येने येत इतिहास रचला. तुम्ही यूएईच्या विविध भागातून आणि भारताच्या विविध राज्यांतून जरी आले असलात तरी सर्वांची मने जोडलेली आहेत.


ही वेळ भारत आणि यूएईच्या मित्रतेच्या जयजयाकाराची आहे. या ऐतिहासिक स्टेडियममध्ये प्रत्येकाच्या मनात एकच भावना आहे भारत-यूएईची मित्रता जिंदाबाद.आजच्या या आठवणी माझ्यासोबत नेहमी राहतील कारण येथे मी माझ्या कुटुंबातील सदस्यांना भेटण्यासाठी आलो आहे. मी १४० कोटीहून अधिक भारतीयांकडून, तुमच्या बहीण-भावांकडून हा संदेश घेऊन आलो आहे की भारताला तुमच्यावर गर्व आहे.


यावेळी पंतप्रधान मोदींनी २०१५मधील आपल्या पहिल्या यूएई दौऱ्याच्या आठवणी ताज्या केल्या. ते म्हणाले, तेव्हा आम्ही केंद्र सरकारमध्ये नवे होते. तीन दशकांमधील एखाद्या भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला दौरा होता. तेव्हा पासून गेल्या दहा वर्षात यूएईचा माझा सातवा दौरा आहे.



काय म्हणाले पंतप्रधान मोदी


पंतप्रधान मोदी म्हणाले भारताला २०४७ पर्यंत विकसित भारत बनवणार ही माझी गॅरंटी आहे. ते म्हणाले लवकरच यूएईमध्ये यूपीआय सुरू होणार आहे. आज २१व्या शतकाच्या तिसऱ्या दशकात भारत आणि यूएईचे हे नाते अभूतपूर्व उंचीवर पोहोचले आहे. आम्ही एकमेकांच्या प्रगतीमध्ये साथीदार आहोत. आज यूएई भारताचा तिसरा मोठा ट्रेड पार्टनर आहे.

Comments
Add Comment

Chief Minister of Keral : अखेर सस्पेन्स संपला ! केरळमचे मुख्यमंत्री ठरले

Chief Minister of Keral : केरळमधील मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स अखेर संपला असून, काँग्रेसने (Congress ) व्ही. डी. सतीशन यांच्या नावाची

Delhi Bus Rape Case : दिल्ली हादरली! स्लीपर बसमध्ये विवाहित महिलेवर बलात्कार

दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चेत आली आहे. राजधानीत एका खासगी

Price Hike : सामान्यांच्या खिशाला कात्री; सोनं-चांदी ते दूधाच्या दरात मोठी वाढ

नवी दिल्ली : गेल्या चार दिवसांत देशाच्या आर्थिक आणि वित्तीय क्षेत्रात झपाट्याने घडामोडी घडताना दिसत आहेत.

Maharashtra ATS Launches Massive Crackdown : ATS चा धडाका! पाकिस्तानस्थित 'भट्टी गँग'चे जाळे उखडून फेकले; महाराष्ट्रात ४० ठिकाणी छापे, ५७ जण ताब्यात

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) बुधवारी पहाटेच्या सुमारास संपूर्ण राज्यात एक मोठी शोधमोहीम राबवली.

Uttar Pradesh Storm : उत्तर प्रदेशात निसर्गाचं तांडव! वादळ, मुसळधार पाऊस आणि वीज कोसळून ५६ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) विविध जिल्ह्यांना बुधवारी भीषण वादळ आणि मुसळधार पावसाने झोडपून काढले. या

Monsoon Rain Update : उकाड्यापासून लवकरच सुटका! अंदमानात पुढच्या ४८ तासांत पावसाच्या सरी कोसळणार!

देशभरात उन्हाचा चटका वाढत असतानाच भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) एक दिलासादायक बातमी दिली आहे. नैऋत्य