IND Vs ENG: इंग्लंडच्या प्लेईंग ११मध्ये बदल निश्चित, वेगवान गोलंदाजांची होणार एंट्री

मुंबई: भारताविरुद्ध १५ फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवल्या जाणाऱ्या सामन्यात इंग्लंडच्या प्लेईंग ११मध्ये बदल होणे निश्चित आहे. इंग्लंड मालिकेत पहिल्यांदा दोन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरू शकते. जेम्स अँडरसन खेळणे निश्चित आहे. याशिवाय इंग्लंड पहिल्यांदा या मालिकेत वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनलाही प्लेईंग ११ चा भाग बनवू शकते. दरम्यान रॉबिन्स खेळल्यास स्पिनर रेहानला बाहेर बसावे लागू शकते.


भारताविरुद्धच्या सामन्यांमध्ये आतापर्यंत इंग्लंडच्या संघाने आश्चर्यजनक निर्णय घेताना केवळ एक वेगवान गोलंदाजाला प्लेईंग ११मध्ये ठेवले आहे. आता या रणनीतीला बदलण्याचा विचार करत आहे. तिसऱ्या कसोटीत इंग्लंडकडून टॉम हार्टले आणि शोएब बशीर हे खेळणार आहेत. याशिवाय अँडरसन आणि रॉबिन्सन प्लेईंग ११चा भाग असतील. तिसऱ्या स्पिनरची भूमिका ज्यो रूट निभावेल.



पिचची भूमिका महत्त्वाची


इंग्लंड तीन स्पिनर्ससोबत मैदानात न उतरण्याचे आणखी एक कारण म्हणजे पिच. राजकोटची पिच रँक टर्नर नसल्याचे म्हटले जात आहे. राजकोटची पिच अशी असेल जिथे स्पिनर्सशिवाय फलंदाज आणि वेगवान गोलंदाजांनाही फायदा मिळेल. यामुळेच इंग्लंड तीनऐवजी दोन स्पिनर्ससह मैदानात उतरेल. जॅक लीच बाहेर गेल्यानंतर त्याच्या रिप्लेसमेंटची घोषणा झालेली नाही. तर रेहान व्हिसा वादात अडकताना दिसत आहे.

Comments
Add Comment

BCCI : आता दृष्टिहीन क्रिकेट संघाला मिळणार रॉयल ट्रीटमेंट; बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय अंध क्रिकेट असोसिएशन (सीएबीआय) साठी एक योजना जाहीर केली आहे. या

T20 World Cup 2026 : अभिषेक शर्माच्या फॉर्मची काळजी करणाऱ्यांची मला काळजी वाटते : सूर्यकुमार यादव

आयसीसी टी२० २०२६ च्या विश्वचषकाचा गट टप्पा संपला असून आता सुपर ८ चा महत्वाचा टप्पा सुरु झाला आहे. या स्पर्धेत

भारत आणि दक्षिण आफ्रिका रविवारी आमनेसामने

अहमदाबाद : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर

शिखर धवन दुसऱ्यांदा अडकला विवाहबंधनात

नवी दिल्ली : माजी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनने दुसऱ्यांदा लग्न केले. आयर्लंडच्या सोफी शाइनसोबत शिखर धवनने लग्न

सुपर एट फेरीतला पहिलाच सामना पावसामुळे रद्द

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंडी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धची टी ट्वेंटी मालिका भारताने २-१ अशी जिंकली, सिडनी आणि अॅडलेडमध्ये भारताचा विजय

अॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांदरम्यान तीन सामन्यांची टी ट्वेंटी मालिका झाली. ही मालिका भारताने