IND Vs ENG: इंग्लंडच्या प्लेईंग ११मध्ये बदल निश्चित, वेगवान गोलंदाजांची होणार एंट्री

  79

मुंबई: भारताविरुद्ध १५ फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवल्या जाणाऱ्या सामन्यात इंग्लंडच्या प्लेईंग ११मध्ये बदल होणे निश्चित आहे. इंग्लंड मालिकेत पहिल्यांदा दोन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरू शकते. जेम्स अँडरसन खेळणे निश्चित आहे. याशिवाय इंग्लंड पहिल्यांदा या मालिकेत वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनलाही प्लेईंग ११ चा भाग बनवू शकते. दरम्यान रॉबिन्स खेळल्यास स्पिनर रेहानला बाहेर बसावे लागू शकते.


भारताविरुद्धच्या सामन्यांमध्ये आतापर्यंत इंग्लंडच्या संघाने आश्चर्यजनक निर्णय घेताना केवळ एक वेगवान गोलंदाजाला प्लेईंग ११मध्ये ठेवले आहे. आता या रणनीतीला बदलण्याचा विचार करत आहे. तिसऱ्या कसोटीत इंग्लंडकडून टॉम हार्टले आणि शोएब बशीर हे खेळणार आहेत. याशिवाय अँडरसन आणि रॉबिन्सन प्लेईंग ११चा भाग असतील. तिसऱ्या स्पिनरची भूमिका ज्यो रूट निभावेल.



पिचची भूमिका महत्त्वाची


इंग्लंड तीन स्पिनर्ससोबत मैदानात न उतरण्याचे आणखी एक कारण म्हणजे पिच. राजकोटची पिच रँक टर्नर नसल्याचे म्हटले जात आहे. राजकोटची पिच अशी असेल जिथे स्पिनर्सशिवाय फलंदाज आणि वेगवान गोलंदाजांनाही फायदा मिळेल. यामुळेच इंग्लंड तीनऐवजी दोन स्पिनर्ससह मैदानात उतरेल. जॅक लीच बाहेर गेल्यानंतर त्याच्या रिप्लेसमेंटची घोषणा झालेली नाही. तर रेहान व्हिसा वादात अडकताना दिसत आहे.

Comments
Add Comment

मोहम्मद सिराज आयसीसी क्रमवारीत १५ व्या स्थानावर

इंग्लंड मालिकेमुळे सिराजची १२ स्थानाची झेप नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल येथील पाचव्या आणि शेवटच्या

आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच, गिल, जायसवाल आणि सुदर्शनला संधी मिळण्याची शक्यता

मुंबई : बीसीसीआय ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. यशस्वी

भारतात परतल्यावर मोहम्मद सिराजचे भव्य स्वागत

हैदराबाद : इंग्लंडमधील जबरदस्त प्रदर्शनानंतर स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज बुधवार(दि.६) रोजी हैदराबादमध्ये परतले

भारत, विंडीज-आफ्रिकेसोबत कसोटी मालिका खेळणार

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार सामने नवी दिल्ली : भारताने इंग्लंडसोबत पाच कसोटी सामन्यांची मालिका बरोबरीत

नोवाक जोकोविचची ‘सिनसिनाटी ओपन’मधून माघार

नवी दिल्ली : ग्रँडस्लॅम विजेता नोवाक जोकोविचला आगामी यूएस ओपनपूर्वी आणखी एक धक्का बसला आहे. त्याने सिनसिनाटी

Team india: इंग्लंड मालिका संपली, आता पुढे टीम इंडियाचे असणार हे वेळापत्रक

मुंबई: इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ २०२५ च्या उर्वरित वर्षासाठी सज्ज झाला