Bihar Politics : बिहारमध्ये जेडीयू-एनडीएचीच सत्ता! नितीशकुमारांनी सिद्ध केलं बहुमत

तेजस्वी यादव यांना मोठा झटका


पाटणा : फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी राष्ट्रीय जनता दलाची (RJD) साथ सोडत पुन्हा एकदा एनडीएसोबत (BJP) सरकार स्थापन केले. त्यांनी भाजपाच्या दोन उपमुख्यमंत्र्यांसह नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आज बिहार विधानसभेत (Bihar Legislative Assembly) एनडीए (NDA) सरकारचे बहुमत सिद्ध करण्यासाठी विश्वासदर्शक ठराव मांडला गेला आणि नितीश कुमार प्रणीत एनडीए सरकारने विश्वासप्रस्ताव जिंकला. स्पष्ट बहुमत मिळाल्याने बिहारमध्ये नितीशकुमारांच्याच सरकारवर शिक्कामोर्तब झाले आहे.


एकूण २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेत बहुमतासाठी १२२ आमदारांच्या संख्याबळाची आवश्यकता होती. नितीश कुमार यांना १२९ आमदारांचे समर्थन मिळाले. विश्वासदर्शक ठरावावेळी आरजेडी, काँग्रेस आणि डाव्या पक्षाच्या आमदारांनी सभात्याग केल्यामुळे एनडीएने १२९ मतांनी हा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे बिहारमधील नितीश कुमार यांची सत्ता कायम राहणार आहे.


भाजपचे तीन आमदार भागीरथी देवी, रश्मी वर्मा आणि मिश्री लाल हे विधानसभेत आले नव्हते. त्यामुळे वेगळ्या चर्चांना सुरुवात झाली होती. लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीचे अवध बिहारी चौधरी यांना बिहारच्या विधानसभा अध्यक्षपदावरुन हटवण्यासाठी प्रस्ताव समोर ठेवण्यात आला होता. त्यांना हटवण्याच्या बाजूने १२५ मते पडली तर विरोधात ११२ मतं पडली. त्यानंतर अध्यक्षांना पदावरुन हटवण्यात आले व बहुमत चाचणीला सुरुवात झाली.


सर्व आमदार एकजूट असल्याचा दावा नितीश कुमार यांनी यापूर्वी केला होता. आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आले होते. दरम्यान, आरजेडीचे तीन आमदार पलटले. आरजेडीचे तीन आमदार नीलम देवी, चेतन आनंद आणि प्रल्हाद यादव हे एनडीए आघाडीच्या बाकावर जाऊन बसलेले पाहायला मिळाले. त्यामुळे सरकारच्या विश्वासदर्शक प्रस्तावाला चार मते अधिक पडल्याचे दिसले. महागठबंधनला मोठा धक्का बसला आणि नितीश कुमार यांना स्पष्ट बहुमत मिळालं. माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.




Comments
Add Comment

Mumbai-Ahmedabad Bullet Train : प्रतीक्षा संपली! देशातील पहिल्या 'बुलेट ट्रेन'ची पहिली झलक आली समोर; दिल्लीत झळकावले चित्र

नवी दिल्ली : भारतातील बहुचर्चित आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन' (Mumbai-Ahmedabad Bullet Train)

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक

Dubare Elephant Camp : थरकाप उडवणारी घटना! कर्नाटकातील दुबारे हत्ती कॅम्पमध्ये दोन हत्तींच्या झुंजीत महिला पर्यटकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू

कर्नाटकातील कोडागू जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या 'दुबारे एलिफंट कॅम्प' (Dubare Elephant Camp) मध्ये एक अत्यंत

Yogi Adityanath : ‘नमाज पठण करायचे असेल तर शिफ्टमध्ये करा, प्रेमाने ऐकाल तर ठीक, नाहीतर...’; योगी आदित्यनाथ यांचा थेट इशारा

उत्तर प्रदेश : आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh Minister) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)

India - Sweden Bilateral Talks : पंतप्रधान मोदींची स्वीडनच्या पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी स्वीडनमधील गॉथेनबर्ग येथे पंतप्रधान महामहीम उल्फ क्रिस्टरसन

Uttar Pradesh Road Accident : उत्तर प्रदेशामध्ये ट्रक-मॅजिकच्या धडकेत १० जणांचा मृत्यू

लखनौ : येथील लखीमपूर खेरी येथे सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण रस्ते अपघातात १० जणांचा