IND vs ENG, 3rd Test: भारतीय संघाला मोठा झटका, तिसऱ्या कसोटीतून हा खेळाडू बाहेर

Share

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीआधी आणखी एक झटका बसला आहे. हा झटका स्टार प्लेयर केएल राहुलने दिला आहे. दुखापतीशी झुंजणारा राहुल तिसऱ्या कसोटीत खेळणार नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये १५ फेब्रुवारीपासून खेळवला जाईल. केएल राहुलच्या जागी देवदत्त पडिक्कलला संघात सामील केले जाऊ शकेत.

भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यात खेळवल्या जात असलेल्या ५ कसोटी सामन्यांची ही मालिका १-१ अशा बरोबरीत आहे. केएल राहुलने पहिला कसोटी सामना खेळला होता. त्यात तो दुखापतग्रस्त झाला होता. पहिल्या कसोटीदरम्यान राहुलने दुखापतीची तक्रार केली होती. यानंतर तो दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाला होता. आता तिसऱ्या कसोटीतही तो खेळू शकणार नाही.

नुकतीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने इंग्लंडविरुद्ध या मालिकेच्या शेवटच्या ३ कसोटी सामन्यांसाठी आपल्या १७ सदस्यीय संघाची घोषणा केली होती. यात विराट कोहलीचे नाव नव्हते. त्याने खाजगी कारणांसाठी ब्रेक घेतला.

बीसीसीआयने स्पष्ट म्हटले होते की राहुल आणि रवींद्र जडेजा दुखापतीनंतर पुनरागमन करत आहेत. त्यांना फिटनेस सिद्ध करावा लागेल तेव्हाच ते सामने खेळू शकतील. चौथ्या कसोटीत ते खेळतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

फिटनेस टेस्ट पास करू शकला नाही राहुल

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताचे सर्वाधिक खेळाडू १२ फेब्रुवारीला राजकोट पोहोचतील आणि त्यांनी ट्रेनिंग सुरू केले. १३ फेब्रुवारीला सराव सत्र राहील. सूत्रांच्या मते राहुल फिटनेस टेस्ट पास करू शकला नाही. बीसीसीआयच्या मेडिकल टीमने सिलेक्टर्सना सांगितले की राहुलला कमीत कमी एक आठवडा निगराणीखाली राहावे लागेल.

Recent Posts

जम्मू काश्मीरला पावसाचा जबर तडाखा, शाळा बंद, वाहतूक कोलमडल्यामुळे जनजीवन विस्कळीत

श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…

5 minutes ago

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर; व्यापार करार, आयात शुल्क आणि चीनच्या आव्हानाबाबात होणार चर्चा

नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…

1 hour ago

KKR vs GT, IPL 2025: इडन गार्डनवर कोलकत्ता गुजरातला रोखणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…

1 hour ago

साहित्यभूषण पुरस्कारासाठी आता दहा लाख रुपये देणार : उदय सामंत

रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…

2 hours ago

मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

नागपूर:  विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…

3 hours ago

नॅशनल पार्कमधील मिनी ट्रेन सुरू होणार

बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…

3 hours ago