Under 19 World Cup 2024: टीम इंडिया २०२३च्या वर्ल्डकपच्या पराभवाचा बदला घेणार?

  67

मुंबई: आज २०२४ अंडर १९ वर्ल्डकपचा(u19 world cup) फायनल सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियासमोर कांगांरूंचे आव्हान आहे. अशातच युवा संघ भारताला २०२३च्या वर्ल्डकप फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेण्याच्या तयारीने मैदानात उतरतील. भारताने दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला हरवत फायनलमध्ये प्रवेश केला आहे.


आयसीसी स्पर्धा, फायनल आणि भारतआणि ऑस्ट्रेलिया...गेल्या एका वर्षात तिसऱ्यांदा हे घडत आहे. याआधी गेल्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वनडे वर्ल्डकपचा फायनल सामना



कांगारूंशी हिशेब बरोबर करण्याची वेळ


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात आला होता. दरम्यान, दोन्ही वेळेस ऑस्ट्रेलिया संघाने बाजी मारली. मात्र यावेळेस आकडे काही वेगळेच सांगत आहे.


कांगारूंनी केलेल्या पराभवाचा बदला घेण्याची वेळ आली आहे. भारताच्या युवा संघाकडे रोहित, शमी आणि कोहलीचा बदला घेण्याची संधी आहे. भारतीय संघ अंडर १९ वर्ल्डकप २०२४मध्ये आतापर्यंत अजेय राहिला आहे. त्यांनी आपल्या सर्व सामन्यात दमदार विजय मिळवला आहे. सेमीफायनलमध्ये तर युवा टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून घेतला.



फायनलमध्ये भारताचे पारडे जड


आतापर्यंत अंडर १९ वर्ल्डकपच्या इतिहासात फायनलमध्ये दोन वेळा भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले. दोन्ही वेळेस टीम इंडियाने बाजी मारली. आता दोन्ही संघादरम्यान तिसऱ्यांदा अंडर १९ वर्ल्डकपचा फायनल सामना खेळवला जाईल. अशातच टीम इंडियाचे पारडे जड दिसत आहे.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार