मुंबई: आज २०२४ अंडर १९ वर्ल्डकपचा(u19 world cup) फायनल सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियासमोर कांगांरूंचे आव्हान आहे. अशातच युवा संघ भारताला २०२३च्या वर्ल्डकप फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेण्याच्या तयारीने मैदानात उतरतील. भारताने दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला हरवत फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
आयसीसी स्पर्धा, फायनल आणि भारतआणि ऑस्ट्रेलिया…गेल्या एका वर्षात तिसऱ्यांदा हे घडत आहे. याआधी गेल्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वनडे वर्ल्डकपचा फायनल सामना
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात आला होता. दरम्यान, दोन्ही वेळेस ऑस्ट्रेलिया संघाने बाजी मारली. मात्र यावेळेस आकडे काही वेगळेच सांगत आहे.
कांगारूंनी केलेल्या पराभवाचा बदला घेण्याची वेळ आली आहे. भारताच्या युवा संघाकडे रोहित, शमी आणि कोहलीचा बदला घेण्याची संधी आहे. भारतीय संघ अंडर १९ वर्ल्डकप २०२४मध्ये आतापर्यंत अजेय राहिला आहे. त्यांनी आपल्या सर्व सामन्यात दमदार विजय मिळवला आहे. सेमीफायनलमध्ये तर युवा टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून घेतला.
आतापर्यंत अंडर १९ वर्ल्डकपच्या इतिहासात फायनलमध्ये दोन वेळा भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले. दोन्ही वेळेस टीम इंडियाने बाजी मारली. आता दोन्ही संघादरम्यान तिसऱ्यांदा अंडर १९ वर्ल्डकपचा फायनल सामना खेळवला जाईल. अशातच टीम इंडियाचे पारडे जड दिसत आहे.
मुसळधार पावसाचा पालघरमध्ये पहिला बळी पालघर : मुंबई, ठाण्यासह उपनगरीय भागात काल रात्रभर जोरदार पाऊस…
मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील पोयसर नदीवर बसवण्यात आलेल्या सक्शन पंपाचे पाईप फुटल्याने आज कांदिवलीत मोठ्या…
मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करा : एकनाथ शिंदे अजित पवार यांनीही…
हार्बर रेल्वे तसेच मेल एक्स्प्रेस रद्द झाल्याने अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवा मुंबई : मुंबईत काल…
मुसळधार पावसामुळे घडली दुर्दैवी घटना मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन…
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Monsoon Sessions) आज एक महत्त्वाचा ठराव मांडला जाण्याची…