Under 19 World Cup 2024: टीम इंडिया २०२३च्या वर्ल्डकपच्या पराभवाचा बदला घेणार?

Share

मुंबई: आज २०२४ अंडर १९ वर्ल्डकपचा(u19 world cup) फायनल सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियासमोर कांगांरूंचे आव्हान आहे. अशातच युवा संघ भारताला २०२३च्या वर्ल्डकप फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेण्याच्या तयारीने मैदानात उतरतील. भारताने दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला हरवत फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

आयसीसी स्पर्धा, फायनल आणि भारतआणि ऑस्ट्रेलिया…गेल्या एका वर्षात तिसऱ्यांदा हे घडत आहे. याआधी गेल्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वनडे वर्ल्डकपचा फायनल सामना

कांगारूंशी हिशेब बरोबर करण्याची वेळ

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात आला होता. दरम्यान, दोन्ही वेळेस ऑस्ट्रेलिया संघाने बाजी मारली. मात्र यावेळेस आकडे काही वेगळेच सांगत आहे.

कांगारूंनी केलेल्या पराभवाचा बदला घेण्याची वेळ आली आहे. भारताच्या युवा संघाकडे रोहित, शमी आणि कोहलीचा बदला घेण्याची संधी आहे. भारतीय संघ अंडर १९ वर्ल्डकप २०२४मध्ये आतापर्यंत अजेय राहिला आहे. त्यांनी आपल्या सर्व सामन्यात दमदार विजय मिळवला आहे. सेमीफायनलमध्ये तर युवा टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून घेतला.

फायनलमध्ये भारताचे पारडे जड

आतापर्यंत अंडर १९ वर्ल्डकपच्या इतिहासात फायनलमध्ये दोन वेळा भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले. दोन्ही वेळेस टीम इंडियाने बाजी मारली. आता दोन्ही संघादरम्यान तिसऱ्यांदा अंडर १९ वर्ल्डकपचा फायनल सामना खेळवला जाईल. अशातच टीम इंडियाचे पारडे जड दिसत आहे.

Recent Posts

Delta Plane Catches Fire : ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, २८२ प्रवासी थोडक्यात बचावले

ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…

20 minutes ago

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

1 hour ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

2 hours ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

2 hours ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

3 hours ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

3 hours ago