Under 19 World Cup 2024: टीम इंडिया २०२३च्या वर्ल्डकपच्या पराभवाचा बदला घेणार?

  69

मुंबई: आज २०२४ अंडर १९ वर्ल्डकपचा(u19 world cup) फायनल सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियासमोर कांगांरूंचे आव्हान आहे. अशातच युवा संघ भारताला २०२३च्या वर्ल्डकप फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेण्याच्या तयारीने मैदानात उतरतील. भारताने दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला हरवत फायनलमध्ये प्रवेश केला आहे.


आयसीसी स्पर्धा, फायनल आणि भारतआणि ऑस्ट्रेलिया...गेल्या एका वर्षात तिसऱ्यांदा हे घडत आहे. याआधी गेल्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वनडे वर्ल्डकपचा फायनल सामना



कांगारूंशी हिशेब बरोबर करण्याची वेळ


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात आला होता. दरम्यान, दोन्ही वेळेस ऑस्ट्रेलिया संघाने बाजी मारली. मात्र यावेळेस आकडे काही वेगळेच सांगत आहे.


कांगारूंनी केलेल्या पराभवाचा बदला घेण्याची वेळ आली आहे. भारताच्या युवा संघाकडे रोहित, शमी आणि कोहलीचा बदला घेण्याची संधी आहे. भारतीय संघ अंडर १९ वर्ल्डकप २०२४मध्ये आतापर्यंत अजेय राहिला आहे. त्यांनी आपल्या सर्व सामन्यात दमदार विजय मिळवला आहे. सेमीफायनलमध्ये तर युवा टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून घेतला.



फायनलमध्ये भारताचे पारडे जड


आतापर्यंत अंडर १९ वर्ल्डकपच्या इतिहासात फायनलमध्ये दोन वेळा भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले. दोन्ही वेळेस टीम इंडियाने बाजी मारली. आता दोन्ही संघादरम्यान तिसऱ्यांदा अंडर १९ वर्ल्डकपचा फायनल सामना खेळवला जाईल. अशातच टीम इंडियाचे पारडे जड दिसत आहे.

Comments
Add Comment

देशातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम बंगळुरूमध्ये उभारले जाणार

बंगळुरू: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरूमधील बोम्मासंद्राच्या सूर्या सिटीमध्ये एक भव्य

संजू सॅमसन राजस्थान रॉयल्समधून बाहेर पडणार?

चेन्नईकडून खेळण्याची शक्यता, अश्विनही संघातून बाहेर पडण्याच्या विचारात चेन्नई  : संजू सॅमसनने राजस्थान

'या' पाकिस्तानी क्रिकेटरला बलात्काराच्या आरोपात ब्रिटनमध्ये अटक

नवी दिल्ली: पाकिस्तानचा २४ वर्षीय क्रिकेटर हैदर अलीला बलात्कार प्रकरणात ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली आहे.

आशिया कप हॉकी स्पर्धेतून पाकिस्तान संघाची माघार; भारतात येऊन खेळण्यास नकार

नवी दिल्ली : आशिया कप क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाक यांच्यातील तिढा सुटला असताना दुसऱ्या बाजूला आशिया कप हॉकी

मोहम्मद सिराज आयसीसी क्रमवारीत १५ व्या स्थानावर

इंग्लंड मालिकेमुळे सिराजची १२ स्थानाची झेप नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल येथील पाचव्या आणि शेवटच्या

आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच, गिल, जायसवाल आणि सुदर्शनला संधी मिळण्याची शक्यता

मुंबई : बीसीसीआय ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. यशस्वी