U19 World cup 2024: पुन्हा स्वप्नभंग, ऑस्ट्रेलियाकडून भारताचा ७९ धावांनी पराभव

  95

बेनॉनी: वर्ल्डकप जिंकण्याचे टीम इंडियाचे(team india) स्वप्न पुन्हा एकदा अधुरे राहिले. ऑस्ट्रेलियाने अंडर १९ वर्ल्डकप २०२४च्या(U19 World cup 2024) अंतिम सामन्यात भारताला ७९ धावांनी हरवले. संपूर्ण विश्वचषकात अजेय राहिलेल्या भारताला शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. भारताच्या पुरुष संघालाही वर्ल्डकप २०२३मध्येही ऑस्ट्रेलियाकडून अंतिम सामन्यात पराभव सहन करावा लागला होता.


ऑस्ट्रेलियाने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद २५३ धावा केल्या होत्या. खरंतर हे आव्हान तितकेसे काही मोठे नव्हते. मात्र भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियासमोर साफ शरणागती पत्करली. भारताचा संपूर्ण संघ १७४ धावांवर बाद झाला.


भारताकडून सलामीवीर आदर्श सिंगने ४७ धावांची खेळी केली तर मुरूगन अभिषेकने ४२ धावांची खेळी केली. मुशीर खानला २२ धावा करता आल्या. त्या व्यतिरिक्त इतर सर्व फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. त्यामुळेच भारताला पराभव सहन करावा लागला.


तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद २५३ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून हरजस सिंगने सर्वाधिक ५५ धावा केल्या होत्या. हॅरी डिक्सॉनने ४२ धावा केल्या. तर ह्युह वेबगेनने ४८ धावा ठोकल्या. ऑलिव्हर पीकने नाबाद ४६ धावा केल्या.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार