U19 World cup 2024: पुन्हा स्वप्नभंग, ऑस्ट्रेलियाकडून भारताचा ७९ धावांनी पराभव

बेनॉनी: वर्ल्डकप जिंकण्याचे टीम इंडियाचे(team india) स्वप्न पुन्हा एकदा अधुरे राहिले. ऑस्ट्रेलियाने अंडर १९ वर्ल्डकप २०२४च्या(U19 World cup 2024) अंतिम सामन्यात भारताला ७९ धावांनी हरवले. संपूर्ण विश्वचषकात अजेय राहिलेल्या भारताला शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. भारताच्या पुरुष संघालाही वर्ल्डकप २०२३मध्येही ऑस्ट्रेलियाकडून अंतिम सामन्यात पराभव सहन करावा लागला होता.


ऑस्ट्रेलियाने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद २५३ धावा केल्या होत्या. खरंतर हे आव्हान तितकेसे काही मोठे नव्हते. मात्र भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियासमोर साफ शरणागती पत्करली. भारताचा संपूर्ण संघ १७४ धावांवर बाद झाला.


भारताकडून सलामीवीर आदर्श सिंगने ४७ धावांची खेळी केली तर मुरूगन अभिषेकने ४२ धावांची खेळी केली. मुशीर खानला २२ धावा करता आल्या. त्या व्यतिरिक्त इतर सर्व फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. त्यामुळेच भारताला पराभव सहन करावा लागला.


तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद २५३ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून हरजस सिंगने सर्वाधिक ५५ धावा केल्या होत्या. हॅरी डिक्सॉनने ४२ धावा केल्या. तर ह्युह वेबगेनने ४८ धावा ठोकल्या. ऑलिव्हर पीकने नाबाद ४६ धावा केल्या.

Comments
Add Comment

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख