U19 World cup 2024: पुन्हा स्वप्नभंग, ऑस्ट्रेलियाकडून भारताचा ७९ धावांनी पराभव

बेनॉनी: वर्ल्डकप जिंकण्याचे टीम इंडियाचे(team india) स्वप्न पुन्हा एकदा अधुरे राहिले. ऑस्ट्रेलियाने अंडर १९ वर्ल्डकप २०२४च्या(U19 World cup 2024) अंतिम सामन्यात भारताला ७९ धावांनी हरवले. संपूर्ण विश्वचषकात अजेय राहिलेल्या भारताला शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. भारताच्या पुरुष संघालाही वर्ल्डकप २०२३मध्येही ऑस्ट्रेलियाकडून अंतिम सामन्यात पराभव सहन करावा लागला होता.


ऑस्ट्रेलियाने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद २५३ धावा केल्या होत्या. खरंतर हे आव्हान तितकेसे काही मोठे नव्हते. मात्र भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियासमोर साफ शरणागती पत्करली. भारताचा संपूर्ण संघ १७४ धावांवर बाद झाला.


भारताकडून सलामीवीर आदर्श सिंगने ४७ धावांची खेळी केली तर मुरूगन अभिषेकने ४२ धावांची खेळी केली. मुशीर खानला २२ धावा करता आल्या. त्या व्यतिरिक्त इतर सर्व फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. त्यामुळेच भारताला पराभव सहन करावा लागला.


तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद २५३ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून हरजस सिंगने सर्वाधिक ५५ धावा केल्या होत्या. हॅरी डिक्सॉनने ४२ धावा केल्या. तर ह्युह वेबगेनने ४८ धावा ठोकल्या. ऑलिव्हर पीकने नाबाद ४६ धावा केल्या.

Comments
Add Comment

जोश हेझलवूडची एमसीजीवर 'ड्रीम स्पेल'!

मेलबर्न: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याने शुक्रवार, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी मेलबर्न क्रिकेट

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ अंतिम सामन्यासाठी पंचांची घोषणा

नवी मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्वचषक २०२५ च्या अंतिम

महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास गावस्कर करणार हे विशेष काम

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता

मेलबर्नमध्ये भारताचा पराभव: ऑस्ट्रेलियाची १-० ने आघाडी!

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने

भारताची फलंदाजी कोलमडली, अभिषेक शर्माचे लढाऊ अर्धशतक व्यर्थ: टी-२० सामन्यात पुन्हा निराशाजनक कामगिरी

मेलबर्न : वनडे मालिकेत पराभवाचा धक्का बसल्यानंतर टी-२० मालिकेत पुनरागमनाची स्वप्नं पाहणाऱ्या भारतीय संघाला

सामन्याच्या अंतिम क्षणी केवळ बायबलच्या त्या ओळी म्हटल्या, विजयानंतर भावूक झाली जेमिमा

नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात