आपल्याला पार्टटाइम जॉबमध्ये स्वारस्य आहे का? असे विचारणारा व्हॉट्सॲप कॉल हा दक्षिण मुंबईतील एका फूड स्टॉलच्या मालकाला आला होता. स्टॉलवर काम करताना मोबाइलवरून जर पार्टटाइम धंदा करण्याची संधी मिळत असेल तर काय वाईट आहे, असा विचार या मालकाच्या मनात आला. प्रयत्न करायला हरकत नाही, असे समजून त्याला पाठवण्यात आलेल्या एक लिंकवर काम करायचे, असे फूड स्टॉल मालकाने ठरविले. त्या लिंकमध्ये अनेक हॉटेल्सची माहिती होती आणि त्याला रेटिंग देण्यास सांगण्यात आले होते. रेटिंग दिल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट घेऊन त्याच व्हॉट्सॲप नंबरवर परत पाठवण्यास सांगण्यात आले होते. “स्टॉल मालकाने सूचनांचे तंतोतंत पालन केले आणि हॉटेलला रेटिंग दिल्यावर आणि त्याच नंबरवर त्याचा स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर सुरुवातीला त्याला १५० रुपये मिळाले. त्यानंतर तो इतर हॉटेलांना रेटिंग देत होता. त्या बदल्यात त्याला दीडशे रुपयांपासून दोन हजार ८०० रुपये मिळाले. स्टॉल मालकाला एका टेलिग्राम ग्रुपमध्ये जोडण्यात आले होते. या ठिकाणी संशयित अनोळख्या व्यक्तींकडून त्याला प्री-पेड कामांमध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले आणि प्रतिदिन तीन हजार रुपये ते चार हजार रुपये नफा मिळेल, असे आमिष दाखविण्यात आले होते. स्टॉल मालकाने अवघ्या पाच दिवसांत टेलिग्रामवर सांगितलेल्या चार वेगवेगळ्या बँक खाते क्रमांकावर ११ लाख रुपये ट्रान्सफर केले. एवढी मोठी रक्कम गुंतवणूक करूनही पुढील दोन-तीन दिवसांत नफा मिळू शकला नाही, तेव्हा स्टॉल मालकाला संशय आला. त्याने चौकशी करण्यास सुरूवात केली. पैसे परत मिळविण्यासाठी त्याला आणखी पैसे गुंतवण्यास सांगितले होते; परंतु कोणतेही समाधानकारक उत्तर किंवा पैसे मिळाले नाहीत म्हणून त्याचा संशय अधिक बळावला आणि त्याने पोलिसांकडे धाव घेतली. रितसर तक्रार नोंदविण्यात आली. सहपोलीस आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम यांच्या देखरेखीखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक देवराज बोरसे यांच्या नेतृत्वाखालील एक पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. जास्त नफ्याचे आमिष दाखवून ११ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या त्या सायबर फसवणूक करणाऱ्या भामट्याचा पोलीस शोध घेत आहेत.
सध्या ऑनलाइनचा जमाना आहे; परंतु काळजी घेतली नाही, तर मोठा फटका बसू शकतो, हे विसरून चालणार नाही. सायबर भामटे विविध माध्यमांतून फसवणूक करण्याचे काम करत आहेत. यासंदर्भात गुन्हे वाढत असताना अटक झालेल्यांची संख्या मात्र नगण्य आहे. कधी ‘वर्क फ्रॉम होम’ देत असल्याचे आमिष देत फसवणूक होते केव्हा पार्टटाइम जॉबच्या नावावर फसवले जाते. मुंबईत नव्हे, तर महाराष्ट्रात असे अनेक गुन्हे घडत आहे. त्यामुळे आमिषाला बळी न पडता सायबर ठगांपासून जनतेने सावध असायला हवे.
maheshom108@ gmail.com
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…