Yami Gautam : यामी गौतमकडे गुडन्यूज! पती आदित्यने दिली माहिती

यामी-आदित्य लवकरच होणार आईबाबा


मुंबई : बॉलिवूडच्या (Bollywood) ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणजे यामी गौतम (Yami Gautam). तिने केलेल्या चित्रपटांपेक्षा तिच्या ब्युटी प्रोडक्टसच्या जाहिरातींमुळे (Beauty products ads) ती विशेष प्रसिद्ध आहे. यामीचा नवा 'आर्टिकल ३७०' (Article 370) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा काल ट्रेलर लाँच (Trailer launch) सोहळा पार पडला. या सोहळ्यात यामीचा पती आदित्य धरने (Aditya Dhar) चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली. यामी आणि आदित्य लवकरच आईबाबा होणार असल्याची त्याने घोषणा केली.


आर्टिकल ३७० या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान यामी बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली. या सोहळ्यावेळी आदित्य म्हणाला, यामी आई होणार आहे, लवकरच आमच्या घरी बाळ येणार आहे. आदित्यने ही गुडन्यूज दिल्यानंतर यामीच्या प्रेग्नेंसीची बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामी आणि आदित्य यांच्यावर चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.


यामी गौतम आणि आदित्य धर यांच्या लग्नाला ३ वर्षे झाली आहेत. दोघांनी २०२१ मध्ये लग्न केले. त्यावेळी त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आदित्यने दिग्दर्शित केलेल्या उरी या चित्रपटात यामीने काम केलं. यामी गौतमने २०१२ मध्ये रिलीज झालेल्या विक्की डोनर या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यामी गौतमचा ओएमजी २ हा चित्रपट गेल्या वर्षी रिलीज झाला.


Comments
Add Comment

मुंबईतील प्रतिजेजुरी पाहिलीत का? मुंबईतही आहे खंडोबाचे पवित्र देवस्थान

मुंबई : चंपाषष्ठीचा शिवशंकराच्या अवतार मानल्या जाणाऱ्या श्री खंडोबा देवाचा उत्सव राज्यभर मोठ्या भक्तिभावात

शतकातील सर्वात मोठं सूर्यग्रहण; २०२७ मध्ये होणार ६ मिनिटांचा अंधार

मुंबई : येणाऱ्या वर्षात म्हणेजच २ ऑगस्ट २०२७ रोजी शतकातील सर्वात मोठं आणि दुर्मिळ खग्रास सूर्यग्रहण पाहायला

मालाड आणि गोरेगावमधील दोन मनोरंजन मैदानांचा होणार विकास

गोरेगाव पहाडीतील मोकळ्या जागेवर उभारले जाणार मनोरंजन मैदान सरदार वल्लभभाई मनोरंजन मैदानाचे होणार

प्रारुप मतदार यादीवर हरकती, सूचना नोंदवण्यास मुदतवाढ

हरकती आता ३ डिसेंबर २०२५ पर्यंत नोंदवता येणार मागील सात दिवसांत २१६७ हरकती, सूचना नोंदवल्या मुंबई (विशेष

शक्ती वाघाचा मृत्यू न्युमोनियामुळे, शव विच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून माहिती समोर

आता राणीबागेत जय आणि करिष्मा वाघाला पाहता येणार मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा (पूर्व)

अतिवृष्टीचे संकट, पण सरकारचा आधार; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला एक वर्षाची स्थगिती

मुंबई : राज्यात जून ते सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली