लॅण्ड जिहाद, लव जिहाद मुक्त मुंबई होण्यासाठी मुंबईत जनआक्रोश मोर्चाचे आयोजन

Share

मुंबई : सकल हिंदू समाज आयोजित उद्या शनिवारी (दि. १० फेब्रुवारी) रोजी मानखुर्द, गोवंडी, चेंबूर येथे जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून ‘लॅण्ड जिहाद’लव जिहाद वक्फ बोर्ड रद्द व्हावा यासाठी चेंबूर येथे या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘अब फिर एक बार हिंदुओकी हुंकार’ची घोषणा घेऊन शनिवारी सायंकाळी ४ वाजता एम ईस्ट महानगर पालिका देवनार गोवंडी पासून मोर्चाची सुरुवात होणार असून PMGP कॉलनी येथे मोर्चाची सांगता होणार आहे. मुंबई सह चेंबूर भागात अवैद्य प्रार्थनास्थळे, भूमी जिहाद आदी विरोधात हा मोर्चा असल्याची माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली आहे.

या संदर्भात पोलीस विभागातर्फे देखील चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे आणि सदर मोर्चात प्रमुख वक्ते म्हणून हिंदुत्वादी आमदार नितेश राणे, हे वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.

तसेच मानखुर्द अनुशक्तिनगर, गोवंडी, चेंबूर मध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे तसेच धार्मिकस्थळे, हिंदूंवर होणारे हल्ले तसेच ह्या भागात बांगलादेशी मुस्लिम यांची वाढलेली संख्या, वाढत असलेली वस्ती व काही अधिकारी यांना मदत करत आहे यांचा देखील या संदर्भात देखील वक्त्यांकडून समाचार घेतला जाणार असल्याचे बोलले जाते आहे. तसेच मिळालेल्या माहिती नुसार शहरात जिल्ह्यात बैठकीचे आयोजन, शहरात वस्ती, पाढे, कॉलनी येथे निरोप देणे हे सूक्ष्म पद्धतीने नियोजन चालू असल्याचे बोलले जाते आहे. सदर मोर्चात रेकॉर्ड ब्रेक गर्दी जमणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Recent Posts

गौतम गंभीरला ISIS Kashmir ने दिली ठार मारण्याची धमकी

नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…

19 minutes ago

Health Tips: उन्हाळ्यात कशी घ्यावी त्वचेची काळजी ? जाणून घ्या

मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…

45 minutes ago

Health Tips: उन्हाळ्यात या घरगुती गोष्टी चेहऱ्यावर लावा!

दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…

2 hours ago

मोदी सरकार भारत – पाकिस्तान सीमा सील करण्यासाठी इस्रोच्या उपग्रहांची मदत घेणार

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…

2 hours ago

Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…

3 hours ago

RCB vs RR, IPL 2025: राजस्थान बेंगळुरूला पराभवाचा धक्का देणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…

3 hours ago