Health Tips: तुम्ही लाल मिरचीचे सेवन अधिक करता का? तर हे घ्या जाणून

  107

मुंबई: भाजी, आमटीमध्ये जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त लाल मिरची पावडरचा वापर करत असाल तर सांभाळा कारण यामुळे शरीरास मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचू शकते.अनेकांना गोड पदार्थ खाण्याऐवजी तिखट तसेच चटपटीत खायला आवडते. यामुळे ते सतत आपल्या पदार्थांमध्ये लाल मिरची पावडरचा वापर करत असतात.


अनेकांना तर तिखटाशिवाय जेवणच जात नाही. मात्र अनेकदा तुम्ही डॉक्टरांकडून ऐकले असेल की लाल मिरचीचा वापर अधिक करू नका यामुळे शरीरास हानी पोहोचू शकते. लाल मिरची पावडर जगभरातील अनेक रेसिपीजमध्ये वापरली जाते.


मोठ्या प्रमाणात लाल मिरची पावडरचे सेवन केल्याने पोटात अल्सर तसेच गॅस्ट्राइटिसारख्या पाचनसंबंधी समस्या निर्माण होतात. लाल मिरची पावडरमधील कॅप्साईन हा घटक पोटाला त्रासदायक ठरू शकतो. यामुळे शरीरात सूज निर्माण होऊ शकते.


यामुळेच अधिक प्रमाणात तिखट न खाण्याचा सल्ला दिला जातो. मोठ्या प्रमाणात लाल मिरची पावडर खल्ल्याने शरीरात सूज वाढू शकते जे हृदयरोग, मधुमेह आणि कॅन्सरसारख्या आजारांशी संबंधित असतात.


लाल मिरची पावडरच्या अत्याधिक सेवनाने अॅसिड रिफ्लक्सही होऊ शकतो. सोबतच काही व्यक्तींना अस्थमाचाही अटॅक येऊ शकतो. तसेच त्वचेच्या संपर्कात लाल मिरची पावडर आल्यास यामुळे त्वचेची जळजळ आणि लालसरपणाही येऊ शकतो. याशिवाय लाल मिरची पावडरच्या निमित सेवनाने पोटाच्या कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी