मुंबई: भाजी, आमटीमध्ये जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त लाल मिरची पावडरचा वापर करत असाल तर सांभाळा कारण यामुळे शरीरास मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचू शकते.अनेकांना गोड पदार्थ खाण्याऐवजी तिखट तसेच चटपटीत खायला आवडते. यामुळे ते सतत आपल्या पदार्थांमध्ये लाल मिरची पावडरचा वापर करत असतात.
अनेकांना तर तिखटाशिवाय जेवणच जात नाही. मात्र अनेकदा तुम्ही डॉक्टरांकडून ऐकले असेल की लाल मिरचीचा वापर अधिक करू नका यामुळे शरीरास हानी पोहोचू शकते. लाल मिरची पावडर जगभरातील अनेक रेसिपीजमध्ये वापरली जाते.
मोठ्या प्रमाणात लाल मिरची पावडरचे सेवन केल्याने पोटात अल्सर तसेच गॅस्ट्राइटिसारख्या पाचनसंबंधी समस्या निर्माण होतात. लाल मिरची पावडरमधील कॅप्साईन हा घटक पोटाला त्रासदायक ठरू शकतो. यामुळे शरीरात सूज निर्माण होऊ शकते.
यामुळेच अधिक प्रमाणात तिखट न खाण्याचा सल्ला दिला जातो. मोठ्या प्रमाणात लाल मिरची पावडर खल्ल्याने शरीरात सूज वाढू शकते जे हृदयरोग, मधुमेह आणि कॅन्सरसारख्या आजारांशी संबंधित असतात.
लाल मिरची पावडरच्या अत्याधिक सेवनाने अॅसिड रिफ्लक्सही होऊ शकतो. सोबतच काही व्यक्तींना अस्थमाचाही अटॅक येऊ शकतो. तसेच त्वचेच्या संपर्कात लाल मिरची पावडर आल्यास यामुळे त्वचेची जळजळ आणि लालसरपणाही येऊ शकतो. याशिवाय लाल मिरची पावडरच्या निमित सेवनाने पोटाच्या कॅन्सरचा धोका वाढू शकतो.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…