U19 World Cup 2024:भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार फायनल

  53

मुंबई: अंडर १९ वर्ल्डकप २०२४मध्ये गुरूवारी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा सेमीफायनलचा सामना खेळवण्यात आला. हा सामना खूपच रोमहर्षक राहिला. यात कांगारूच्या संघाने १ विकेटनी विजय मिळवला आणि फायनलमध्ये प्रवेश केला.


आता फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाची टक्कर भारतीय संघाशी होणार आहे. हा खिताबी सामना रविवारी ११ फेब्रुवारीला बेनोनीमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने आपल्या सेमीफायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेला २ विकेटनी हरवले होते.



पाकिस्तान संघाने दिले होते १८० धावांचे छोटे आव्हान


दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात टॉस हरल्यानंतर पाकिस्तानी संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना खूप सुरूवात केली आणि संपूर्ण संघ १७९ धावांवर बाद झाला. सामन्यादरम्यान पाकिस्तान संघाची स्थिती खूप खराब झाली. त्यांनी ७९ धावांवर पाच विकेट गमावले होते.


यानंतर अजान अवैस(५२) आणि अराफात मिन्हास(५२)ने अर्धशतक ठोकत पाकिस्तानला सन्मानजनक धावसंख्येवर पोहोचवले. पाकिस्तानने पहिल्यांदा खेळताना ४८.५ षटकांत ऑलआऊट होईपर्यंत १७९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियासाठी टॉम स्ट्रेकरे ९.५ षटकांत २४ धावा देत सर्वाधिक ६ विकेट मिळवल्या.



शेवटची विकेट आणि ऑस्ट्रेलिया संघाने केल्या १६ धावा


१८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाने १६४ धावांवर ९ विकेट गमावल्या होत्या. त्यांना २४ बॉलमध्ये विजयासाठी १६ धावा हव्या होत्या. तसेच फक्त एक विकेट त्यांच्या हातात होता. मात्र राफ मॅकमिलनने नाबाद १९ धावांची खेळी करत संपूर्ण चित्रच बदलले. मॅकमिलनला कॅलम विडलरने साथ दिली. त्याने ९ बॉलमध्ये नाबाद २ धावा केल्या.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार