U19 World Cup 2024:भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार फायनल

मुंबई: अंडर १९ वर्ल्डकप २०२४मध्ये गुरूवारी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा सेमीफायनलचा सामना खेळवण्यात आला. हा सामना खूपच रोमहर्षक राहिला. यात कांगारूच्या संघाने १ विकेटनी विजय मिळवला आणि फायनलमध्ये प्रवेश केला.


आता फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाची टक्कर भारतीय संघाशी होणार आहे. हा खिताबी सामना रविवारी ११ फेब्रुवारीला बेनोनीमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने आपल्या सेमीफायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेला २ विकेटनी हरवले होते.



पाकिस्तान संघाने दिले होते १८० धावांचे छोटे आव्हान


दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात टॉस हरल्यानंतर पाकिस्तानी संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना खूप सुरूवात केली आणि संपूर्ण संघ १७९ धावांवर बाद झाला. सामन्यादरम्यान पाकिस्तान संघाची स्थिती खूप खराब झाली. त्यांनी ७९ धावांवर पाच विकेट गमावले होते.


यानंतर अजान अवैस(५२) आणि अराफात मिन्हास(५२)ने अर्धशतक ठोकत पाकिस्तानला सन्मानजनक धावसंख्येवर पोहोचवले. पाकिस्तानने पहिल्यांदा खेळताना ४८.५ षटकांत ऑलआऊट होईपर्यंत १७९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियासाठी टॉम स्ट्रेकरे ९.५ षटकांत २४ धावा देत सर्वाधिक ६ विकेट मिळवल्या.



शेवटची विकेट आणि ऑस्ट्रेलिया संघाने केल्या १६ धावा


१८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाने १६४ धावांवर ९ विकेट गमावल्या होत्या. त्यांना २४ बॉलमध्ये विजयासाठी १६ धावा हव्या होत्या. तसेच फक्त एक विकेट त्यांच्या हातात होता. मात्र राफ मॅकमिलनने नाबाद १९ धावांची खेळी करत संपूर्ण चित्रच बदलले. मॅकमिलनला कॅलम विडलरने साथ दिली. त्याने ९ बॉलमध्ये नाबाद २ धावा केल्या.

Comments
Add Comment

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख