Team india: आज होणार भारतीय संघाची घोषणा! विराट कोहली घेऊ शकतो ब्रेक

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या ३ कसोटी सामन्यांसाठी आज भारतीय संघाची घोषणा होऊ शकते. मात्र त्याआधी टीम इंडियासाठी एक चांगली आणि एक वाईट बातमी समोर येत आहे. वाईट बातमी अशी की भारताचा माजी कर्णधार विराट कोहली पुढील दोन कसोटी सामन्यांतून बाहेर असू शकतो.

मात्र यातच एक चांगली बातमी समोर येत आहे. ही बातमी दुखापतग्रस्त स्टार खेळाडू रवींद्र जडेजा आणि केएल राहुलबाबत आहे. खरंतर भारतीय संघ मायदेशात इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. सुरूवातीच्या दोन सामन्यानंतर मालिका १-१ अशा बरोबरीत आहे.

तिसऱ्या कसोटीत पुनरागमन करू शकतात राहुल-जडेजा


शेवटच्या ३ सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा होणे बाकी आहे. जडेजा आणि राहुल दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीत खेळू शकले नव्हते. मात्र आता रिपोर्टनुसार या दोन्ही स्टार खेळाडूंचे तिसऱ्या सामन्यात पुनरागमन होऊ शकते.

रवींद्र जडेजा आणि केएल राहुल यावेळेस बंगळुरू स्थित नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये आहेत. दोघेही बीसीसीआयच्या निगराणीखाली आहेत. याशिवाय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजही तिसऱ्या कसोटीत पुनरागमन करू शकतो. त्याला विशाखापट्टणम कसोटीत आराम देण्यात आला होता.

सिराजला प्लेईंग ११मध्ये मिळू शकते संधी


सिराजला पहिल्या कसोटीसाठी प्लेईंग ११मध्ये सामील करण्यात आले होते मात्र त्याला चांगली कामगिरी करता आली नव्हती. सिराजला त्या सामन्यात एकही विकेट मिळाला नव्हता. हा सामना इंग्लंडने जिंकला होता. दरम्यान, दुसऱ्या कसोटीत सिराजच्या जागी मुकेश कुमारला संधी दिली होती. मात्र त्यालाही विकेट घेता आल्या नव्हत्या.

 
Comments
Add Comment

क्रिकेटच्या १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, मुंबईकर आयुष म्हात्रेकडे नेतृत्व

मुंबई : बीसीसीआयच्या निवड समितीने १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकासाठी तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात कोण कितव्या स्थानी ?

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या, न्यूझीलंड दुसऱ्या, दक्षिण आफ्रिका

ऑस्ट्रेलियात इंग्लंडचा विजय, मेलबर्न कसोटी दोन दिवसांत संपली

मेलबर्न : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या 'ॲशेस' मालिकेतील 'बॉक्सिंग डे' कसोटी

बीसीसीआयकडून धोनीला दरमहा ७० हजार रुपये पेन्शन

मुंबई : १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतरही धोनीची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही.

वैभव सूर्यवंशीचा टी-२० विश्वचषक संघात समावेश होणार?

भारताचा माजी कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची मागणी मुंबई : माजी भारतीय कर्णधार आणि राष्ट्रीय निवड समितीचे

पहिल्याच दिवशी मेलबर्नमध्ये ७५ षटकांत २० बळी

चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला ४२ धावांची आघाडी नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ॲशेस