Team india: आज होणार भारतीय संघाची घोषणा! विराट कोहली घेऊ शकतो ब्रेक

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या ३ कसोटी सामन्यांसाठी आज भारतीय संघाची घोषणा होऊ शकते. मात्र त्याआधी टीम इंडियासाठी एक चांगली आणि एक वाईट बातमी समोर येत आहे. वाईट बातमी अशी की भारताचा माजी कर्णधार विराट कोहली पुढील दोन कसोटी सामन्यांतून बाहेर असू शकतो.

मात्र यातच एक चांगली बातमी समोर येत आहे. ही बातमी दुखापतग्रस्त स्टार खेळाडू रवींद्र जडेजा आणि केएल राहुलबाबत आहे. खरंतर भारतीय संघ मायदेशात इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. सुरूवातीच्या दोन सामन्यानंतर मालिका १-१ अशा बरोबरीत आहे.

तिसऱ्या कसोटीत पुनरागमन करू शकतात राहुल-जडेजा


शेवटच्या ३ सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा होणे बाकी आहे. जडेजा आणि राहुल दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीत खेळू शकले नव्हते. मात्र आता रिपोर्टनुसार या दोन्ही स्टार खेळाडूंचे तिसऱ्या सामन्यात पुनरागमन होऊ शकते.

रवींद्र जडेजा आणि केएल राहुल यावेळेस बंगळुरू स्थित नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये आहेत. दोघेही बीसीसीआयच्या निगराणीखाली आहेत. याशिवाय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजही तिसऱ्या कसोटीत पुनरागमन करू शकतो. त्याला विशाखापट्टणम कसोटीत आराम देण्यात आला होता.

सिराजला प्लेईंग ११मध्ये मिळू शकते संधी


सिराजला पहिल्या कसोटीसाठी प्लेईंग ११मध्ये सामील करण्यात आले होते मात्र त्याला चांगली कामगिरी करता आली नव्हती. सिराजला त्या सामन्यात एकही विकेट मिळाला नव्हता. हा सामना इंग्लंडने जिंकला होता. दरम्यान, दुसऱ्या कसोटीत सिराजच्या जागी मुकेश कुमारला संधी दिली होती. मात्र त्यालाही विकेट घेता आल्या नव्हत्या.

 
Comments
Add Comment

अखेर स्मृतीने मौन सोडले, पलाशसोबत लग्न न करण्याचा निर्णय!

मुंबई: मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या स्मृती आणि पलाशच्या लग्नाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. स्मृतीने

टीम इंडिया 'यशस्वी', रो'Hit' चा विक्रम, विशाखापट्टणममध्ये भारताने साजरा केला मालिका विजय

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे झालेला निर्णायक एकदिवसीय सामना भारताने

भारताने दक्षिण आफ्रिकेचा डाव ४८ व्या षटकात गुंडाळला, जिंकण्यासाठी हव्या २७१ धावा

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे निर्णायक एकदिवसीय सामना सुरू आहे. हा सामना

आयपीएलमध्ये विदेशी खेळाडूंना मिळणार केवळ १८ कोटीच!

लिलावापूर्वीच बीसीसीआयच्या नियमांचा अनेक खेळाडूंना फटका मुंबई  : आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावाची सध्या तयारी

इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची विराटला ७ वर्षांनी संधी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना ६ डिसेंबर

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९