Gajanan Maharaj : संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज


  • गजानन महाराज : प्रवीण पांडे, अकोला


भाविक भक्त वाचक मंडळी, यापूर्वीच्या लेखापर्यंत श्री गजानन महाराजांच्या या रसाळ चरित्राचे अमृतपान आपण केले. या लेखमालेतील सर्व चारित्र कथेचे लेखन हे संतकवी दासगणू महाराजांनी ओविबद्ध केलेल्या “श्री गजाननविजय” या ग्रंथाला आधारभूत मानून केले आहे. अत्यंत प्रासादिक आणि रसाळ भाषेत दासगणू महाराजांनी हे चरित्र आपणा सर्व गजानन भक्तांना उपलब्ध करून दिले, ज्याद्वारे महाराजांच्या जीवन चरित्राची माहिती आम्हा सर्वांना मिळाली.



तसे तर श्री गजानन महाराजांबद्दल माहिती महाराष्ट्रातच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेर सुद्धा सर्व भक्तांना आहेच. अनेक भक्तांना तर श्री महाराजांची प्रचिती नेहमीच येते. भाविक वाचकांना हा ग्रंथ मनापासून आवडतो. दासगणू महाराजांनी या ग्रंथरचनेमध्ये अनेक अलंकारांची मांडणी विशेषत्वाने केली आहे. तसेच ग्रंथांमधून खूप चांगल्या प्रकारे उपदेशपर मार्गदर्शन देखील अनेक ठिकाणी केल्याचे दिसून येते. जसे :
सन्नीतीला सोडू नका।
धर्म वासना टाकू नका।
शत्रू न माना एकमेका।
तरीच शक्ती वाढेल ॥१४॥
ऐसे तुम्ही वागल्यास।
येतील चांगले दिवस।
या वऱ्हाड प्रांतास।
हे कधीही विसरू नका॥१५॥
श्री गजानन महाराजांचे दर्शन आणि ग्रंथाचे पारायण याबद्दल दासगणू महाराज सांगतात :
एकदा तरी वर्षातून।
घ्यावे गजाननाचे दर्शन।
एकदा तरी पारायण।
करा गजानन चरित्राचे॥१६॥
हा एकवीस अध्यायांचा।
श्री गजानन विजय नावाचा।
नैवेद्य एकवीस मोदकांचा।
गजाननासी अर्पा हो॥१७॥
वा अध्याय साचार।
माना एकवीस दुर्वांकुर।
पारायणरूपे निरंतर। वाहाव्या गजाननासी॥१८॥
सदभाव जो मानवाचा।
तोच दिवस चतुर्थीचा।
प्रेमरूपी चंद्राचा।
उदय झाला पाहिजे॥१९॥
मग या ग्रंथाचे अक्षर।
एकेक हे दुर्वांकुर।
अर्थ शब्दांचा साचार।
मोदक समजा विबुध हो॥२०॥
किती सुंदर आणि अलंकारिक लिहिलंय.



हा ग्रंथ वाचत असताना किंवा याचे पारायण करताना आनंद तर मिळतोच मिळतो, सोबतच सुंदर आणि दिव्य अनुभूती देखील येतात. महाराज हे अत्यंत कनवाळू आणि भक्त वत्सल आहेत. ब्रह्मांडात कुठेही असले तरी त्यांची कृपादृष्टी सर्व भक्तांवर निरंतर असते.



पुढे ग्रंथाचा महिमा वर्णीताना दासगणू महाराज म्हणतात :
श्री गजानन स्वामी-चरीत।
जो नियमे वाचील सत्य।
त्याचे पुरतील मनोरथ।
गजानन कृपेने॥२३॥



याची प्रचिती भक्तजनांना नेहमीच येते. जे काही मागावयाचे आहे ते आई - वडिलांजवळच मागितले जाते आणि आई-वडील सुद्धा अत्यंत प्रेमाने आपल्या बालकांचे ते लडिवाळ मागणे मोठ्या प्रेमाने पुरवितात. हाच भाव मनी ठेवून प्रेमाने, निष्ठेने आणि विश्वासाने श्री गजानन महाराजांना मागावे. गुरू गजानन माऊली ते परिपूर्ण करतात.


हा ग्रंथ केवळ चिंतामणी। चिंतीले फळ देईल जाणी।
दृढतर विश्वास असल्या मनी हे मात्र विसरू नका ॥२७॥



इथे दासगणू महाराजांनी सांगितले आहे की, “हे स्वामी समर्थ गजानना, आपण जशी प्रेरणा केलीत तसेच मी लिहिले आहे. शेगावच्या मठात काही कागदपत्र होते, ते रतनसा या महाराजांच्या निस्सिम भक्ताने मला आणून दाखवले. त्यांच्या आधारे हा ग्रंथ लिहिला आहे. माझ्या कल्पनेचा कोणताही उपयोग मी केला नाही.



आणि म्हणून काही अधिक न्यून असेल, तर श्रीगजानन महाराजांनी मला क्षमा करावी ही विनंती.”शके अठराशे एकसष्ठात प्रमाथी नाम संवत्सरात चैत्र महिन्यातील शुद्धपक्षात वर्षप्रतीपदेच्या दिवशी श्री गजानन विजय हा ग्रंथ शेगाव येथे कळसास गेला.



शुभं भवतू। हरिहरारर्पणमस्तू॥



क्रमशः

Comments
Add Comment

कोजागिरी पौर्णिमा आज! दूध चंद्रप्रकाशात कधी ठेवाल? जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व

मुंबई: हिंदू धर्मात अश्विन महिन्यातील पौर्णिमेला 'कोजागिरी पौर्णिमा' किंवा 'शरद पौर्णिमा' म्हणून विशेष महत्त्व

कधी आहे संकष्टी चतुर्थी? जाणून घ्या गणेशाच्या बारा अवतारांचे महत्त्व

हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. भगवान

Horoscope: दसऱ्याला बनतोय गुरू-बुध शक्तीशाली योग, या राशींना होणार लाभ

मुंबई: केंद्र योग आणि गुरु-बुध युतीमुळे मेष, कर्क, आणि धनु या राशींना १ ऑक्टोबर २०२५ च्या आसपास मोठा आर्थिक आणि

Navratri Ashtami kanya pujan 2025 : मुलींच्या पूजनाने पूर्ण होतील सर्व मनोकामना! महाअष्टमीला कन्या पूजनाचा विधी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

नवरात्रोत्सव हा हिंदू धर्मातील शक्ती उपासनेचा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा उत्सव आहे. या नऊ दिवसांमध्ये,

दसऱ्यानंतर ‘या’ राशींचे नशीब चमकणार! होणार धनलाभ आणि प्रगती

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे राशी परिवर्तन (गोचर) मानवी जीवनावर मोठा परिणाम करतात. लवकरच बुध ग्रह आपली

Navratri 2025 : नवरात्रीत कांदा आणि लसूण खाणं पाप? यावर प्रेमानंद महाराज काय म्हणाले?

शारदीय नवरात्र उत्सवाला २२ सप्टेंबरपासून भव्य सुरुवात झाली आहे. देशभरातील श्रद्धालूंनी या नऊ दिवसांच्या