Cancer: कॅन्सरपासून बचाव करतात हे ५ पदार्थ, डाएटमध्ये नक्की करा समावेश

मुंबई: कॅन्सर एक जीवघेणा आजार आहे. याची कारणे अनेक आहे. मात्र या आजाराचा धोका वाढवण्यामध्ये खराब खाण्यापिण्याच्या सवयी आणि फिजीकल अॅक्टिव्हिटीमध्ये कमतरता या गोष्टी कारणीभूत ठरतात. दरम्यान, संतुलित आहार शरीलाला योग्य प्रकारे पोषण देतो. यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते. पोषणयुक्त आहारामुळे शरीराला आवश्यक ती व्हिटामिन, खनिजे,फायबर मिळतात जे कॅन्सरविरोधात लढण्यास मदत करतात.


स्वस्थ जीवनशैलीचा वापर करून आपण कॅन्सरपासून बचाव करू शकतो. दरम्यान पौष्टिक आहार संपूर्ण सुरक्षेची गॅरंटी देत नाही. मात्र निश्चितपणे कॅन्सरचा धोका कमी करण्यात मदत करते.


खाली असे काही ५ पदार्थ आहेत जे कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करतात.



हिरव्या भाज्या


ब्रोकोली, फ्लॉवर, ब्रसेल्स स्पाऊट्स सारख्या हिरव्या भाज्या आपल्या शरीराला पौष्टिकता प्रधान करतात. अँटी ऑक्सिडंट आणि फायटोकेमिकल्सने भरपूर भाज्या स्तन तसेच प्रोस्टेट कॅन्सरह विविध प्रकारच्या कॅन्सरचा धोका कमी करतात.



बेरीज


ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी तसेच रसरशीत बेरीजमध्ये अँटीऑक्सिडंट आणि व्हिटामिन्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे तणावाशी लढण्यात मदत होते. नाश्त्यामध्ये मूठभर बेरीज खाल्ल्याने याचा बराच फायदा होतो.



हळद


हळदीमध्ये करक्युमिन नावाचे तत्व असते. कर्क्युमिन कॅन्सरच्या पेशींचा विकास रोखण्यास मदत करता. त्यामुळे जेवणात नेहमी हळदीचा समावेश करा.



फॅटी फिश


सॅलमन अथवा बांगडासारख्या माशांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात आढळते. कॅन्सरचा धोका कमी करण्यात या फॅटी अॅसिडचा मोठा वाटा आहे. त्यामुळे माशांचे सेवन जरूर करावे.



लसूण


तुमच्या जेवणाची चव वाढवण्यासाठी लसणीचा वापर आहारात केला जातो. मात्र लसूण खाल्ल्याने बरेच फायदेही मिळतात. यातील घटक कॅन्सरविरोधी भूमिका निभावण्यास मदत करतात.

Comments
Add Comment

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे