Cancer: कॅन्सरपासून बचाव करतात हे ५ पदार्थ, डाएटमध्ये नक्की करा समावेश

  57

मुंबई: कॅन्सर एक जीवघेणा आजार आहे. याची कारणे अनेक आहे. मात्र या आजाराचा धोका वाढवण्यामध्ये खराब खाण्यापिण्याच्या सवयी आणि फिजीकल अॅक्टिव्हिटीमध्ये कमतरता या गोष्टी कारणीभूत ठरतात. दरम्यान, संतुलित आहार शरीलाला योग्य प्रकारे पोषण देतो. यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते. पोषणयुक्त आहारामुळे शरीराला आवश्यक ती व्हिटामिन, खनिजे,फायबर मिळतात जे कॅन्सरविरोधात लढण्यास मदत करतात.


स्वस्थ जीवनशैलीचा वापर करून आपण कॅन्सरपासून बचाव करू शकतो. दरम्यान पौष्टिक आहार संपूर्ण सुरक्षेची गॅरंटी देत नाही. मात्र निश्चितपणे कॅन्सरचा धोका कमी करण्यात मदत करते.


खाली असे काही ५ पदार्थ आहेत जे कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करतात.



हिरव्या भाज्या


ब्रोकोली, फ्लॉवर, ब्रसेल्स स्पाऊट्स सारख्या हिरव्या भाज्या आपल्या शरीराला पौष्टिकता प्रधान करतात. अँटी ऑक्सिडंट आणि फायटोकेमिकल्सने भरपूर भाज्या स्तन तसेच प्रोस्टेट कॅन्सरह विविध प्रकारच्या कॅन्सरचा धोका कमी करतात.



बेरीज


ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी तसेच रसरशीत बेरीजमध्ये अँटीऑक्सिडंट आणि व्हिटामिन्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे तणावाशी लढण्यात मदत होते. नाश्त्यामध्ये मूठभर बेरीज खाल्ल्याने याचा बराच फायदा होतो.



हळद


हळदीमध्ये करक्युमिन नावाचे तत्व असते. कर्क्युमिन कॅन्सरच्या पेशींचा विकास रोखण्यास मदत करता. त्यामुळे जेवणात नेहमी हळदीचा समावेश करा.



फॅटी फिश


सॅलमन अथवा बांगडासारख्या माशांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात आढळते. कॅन्सरचा धोका कमी करण्यात या फॅटी अॅसिडचा मोठा वाटा आहे. त्यामुळे माशांचे सेवन जरूर करावे.



लसूण


तुमच्या जेवणाची चव वाढवण्यासाठी लसणीचा वापर आहारात केला जातो. मात्र लसूण खाल्ल्याने बरेच फायदेही मिळतात. यातील घटक कॅन्सरविरोधी भूमिका निभावण्यास मदत करतात.

Comments
Add Comment

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर