IND vs SA: फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला हव्यात २४५ धावा

मुंबई: अंडर १९ वर्ल्डकप २०२३मधील पहिला सेमीफायनलचा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवला जात आहे. सामन्याचा पहिला डाव संपल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करताना आफ्रिकेने ५० षटकांत २४४ धावा केल्या आहेत. संघासाठी लुईन ड्रे प्रिटोरियसने सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली. या दरम्यान भारतासाठी राज लिंबानीने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या.


बेनोनीने विलोमूर पार्कमध्ये खेळवल्या जात असलेल्या सामन्यात भारताने टॉस जिंकत पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आफ्रिकेसाठी पहिल्यांदा बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले. भारतासाठी हा निर्णय योग्य ठरला कारण त्यांनी आफ्रिकेला २५० धावांच्या आत रोखले. भारताने लवकर विकेट घेत आफ्रिकेला मोठा स्कोर करण्याची संधी दिली नाही. दरम्यान, नवव्या स्थानावर उतरलेल्या ट्रिस्टन लुसने १२ बॉलमध्ये नाबाद २३ धावांची महत्त्वाची खेळी केली. यात त्याने १ चौकार आणि २ षटकार लगावले.


आफ्रिकेची सुरूवात काही आव्हानात्मक ठरली नाही. त्यांनी ५व्या षटकांत २३ धावांवर पहिला विकेट गमावला. आफ्रिकेला पहिला झटका स्टीव्ह स्टोल्कच्या रूपात बसला. त्याने १७ बॉलमध्ये २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १४ धावा केल्या. त्यानंतर ९व्या ओव्हरमध्ये संघाने दुसरा विकेट डेविड टीगरच्या रूपात गमावला.


लवकर विकेट गमावल्याने रिचर्ड सेलेट्सवेन आणि लुआन ड्रे प्रिटोरियस यांनी मोर्चा सांभाळला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. या भागीदारीला मुशीर खानने तोडले. प्रिटोरियस १०२ बॉलमध्ये ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७६ धावा केल्या.



अशी आहे भारताची बॉलिंग


भारतासाठी राज लिंबानीने सर्वाधिक ३ विकेट मिळवल्या. या दरम्यान ९व्या ओव्हरमध्ये ६० धावा खर्च केल्या. याशिवाय मुशीर खानने २ विकेट मिळवल्या. या दरम्यान मुशीरने १० षटकांत ४३ धावा खर्च केल्या.

Comments
Add Comment

जोश हेझलवूडची एमसीजीवर 'ड्रीम स्पेल'!

मेलबर्न: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याने शुक्रवार, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी मेलबर्न क्रिकेट

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ अंतिम सामन्यासाठी पंचांची घोषणा

नवी मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्वचषक २०२५ च्या अंतिम

महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास गावस्कर करणार हे विशेष काम

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता

मेलबर्नमध्ये भारताचा पराभव: ऑस्ट्रेलियाची १-० ने आघाडी!

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने

भारताची फलंदाजी कोलमडली, अभिषेक शर्माचे लढाऊ अर्धशतक व्यर्थ: टी-२० सामन्यात पुन्हा निराशाजनक कामगिरी

मेलबर्न : वनडे मालिकेत पराभवाचा धक्का बसल्यानंतर टी-२० मालिकेत पुनरागमनाची स्वप्नं पाहणाऱ्या भारतीय संघाला

सामन्याच्या अंतिम क्षणी केवळ बायबलच्या त्या ओळी म्हटल्या, विजयानंतर भावूक झाली जेमिमा

नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात