मुंबई: थंडीमध्ये तुम्ही पाहिले असेल की बऱ्याच जणांचे वजन वाढते. याची अनेक कारणे आहेत. यातील महत्त्वाचे कारण म्हणजे थंडीमध्ये अनेकांना अंथरूण घेऊन लोळत राहावेसे वाटते. यामुळे ना जिमला जाणे होत ना रनिंग. एक्सरसाईजही कमी होते. यामुळे फिजीकल अॅक्टिव्हिटी कमी होते.
थंडीच्या दिवसात हेवी डाएट घेतला जातो. यात फॅट, प्रोटीन, कॅलरीज मोठ्या प्रमाणात असतात. लोक या काळात आलू पराठे, गाजरचा हलवा, नॉनव्हेज जास्त प्रमाणात खातात. यामुळे शरीरात उष्णता निर्माण होऊ शकेल. मात्र खाण्यातील कॅलरीजचा परिणाम आपल्या पोट आणि कमरेवर दिसू लागतो.
अशातच हे ५ पदार्थ ज्यांचा डाएटमध्ये समावेश केल्याने तुम्ही फिट आणि अॅक्टिव्ह राहू शकता.
डाळिंब अतिशय पौष्टिक फळ आहे.यात मोठ्या प्रमाणात पौष्टिक तत्वे असतात. यात अँटी ऑक्सिडंट आणि फायबरचे प्रमाण अधिक आढळते. डाळिंबाचा रस शरीरात रक्त वाढवण्यासाठी तसेच बॉडीला एनर्जी देण्याचा जबरदस्त स्त्रोत आहे. यात फॅट बर्न कऱणारेही गुण असतात. हे तुम्ही डायरेक्ट खाऊ शकता अथवा फ्रुट सलाड म्हणूनही सेवन करू शकता.
थंडीच्या दिवसांत आंबट फळे खाण्यासाठी आरोग्यासाठी फायदेशीर असते. यात मोठ्या प्रमाणात व्हिटामिन सी असते. जे इम्युन बूस्ट करण्याचे काम करतात. तसेच वजन घटवण्यात फायदेशीर असतात. दररोजच्या डाएटमध्ये संत्रे, मोसंबी, ग्रेपफ्रुटसारख्या पदार्थांचा समावेश करू शकता.
हिरव्या पालेभाज्यांमध्ये केल सर्वात फायदेशीर मानले जाते. याचा वापर साधारणपणे सलाडच्या रूपात केला जातो. यात व्हिटामिन्स, मिनरल्स, फायबर आणि लो कॅलरी असते. यामुळे वजन कंट्रोल करण्यात मदत होते.
अक्रोड हे एक जबरदस्त ड्रायफ्रुट आहे. हे एक हेल्दी फॅट, प्रोटीन, फायबरसारखे न्यूट्रिएंट याचा मोठा स्त्रोत आहे. यात अँटीऑक्सिडंट असतात. थंडीच्या दिवसांत शरीर गरम ठेवण्यासोबतच वजन मेंटेन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
आल्याचा वापर साधारणपणे मसाल्याचा पदार्थ म्हणून केला जातो. आल्यामध्ये मेटाबॉलिज्म मजबूत करण्यासोबतच वजन कमी करण्यात फायदेशीर ठरतात. यामुळे डायजेशन चांगले होते तसेच सूजही कमी होण्यास मदत होते.
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…
मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…
पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…
ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…
पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…
पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम…