थंडीत वजन वाढते आहे तर हे ५ पदार्थ जरूर करा ट्राय, रहाल फिट

  69

मुंबई: थंडीमध्ये तुम्ही पाहिले असेल की बऱ्याच जणांचे वजन वाढते. याची अनेक कारणे आहेत. यातील महत्त्वाचे कारण म्हणजे थंडीमध्ये अनेकांना अंथरूण घेऊन लोळत राहावेसे वाटते. यामुळे ना जिमला जाणे होत ना रनिंग. एक्सरसाईजही कमी होते. यामुळे फिजीकल अॅक्टिव्हिटी कमी होते.


थंडीच्या दिवसात हेवी डाएट घेतला जातो. यात फॅट, प्रोटीन, कॅलरीज मोठ्या प्रमाणात असतात. लोक या काळात आलू पराठे, गाजरचा हलवा, नॉनव्हेज जास्त प्रमाणात खातात. यामुळे शरीरात उष्णता निर्माण होऊ शकेल. मात्र खाण्यातील कॅलरीजचा परिणाम आपल्या पोट आणि कमरेवर दिसू लागतो.


अशातच हे ५ पदार्थ ज्यांचा डाएटमध्ये समावेश केल्याने तुम्ही फिट आणि अॅक्टिव्ह राहू शकता.



डाळिंब


डाळिंब अतिशय पौष्टिक फळ आहे.यात मोठ्या प्रमाणात पौष्टिक तत्वे असतात. यात अँटी ऑक्सिडंट आणि फायबरचे प्रमाण अधिक आढळते. डाळिंबाचा रस शरीरात रक्त वाढवण्यासाठी तसेच बॉडीला एनर्जी देण्याचा जबरदस्त स्त्रोत आहे. यात फॅट बर्न कऱणारेही गुण असतात. हे तुम्ही डायरेक्ट खाऊ शकता अथवा फ्रुट सलाड म्हणूनही सेवन करू शकता.



आंबट फळे


थंडीच्या दिवसांत आंबट फळे खाण्यासाठी आरोग्यासाठी फायदेशीर असते. यात मोठ्या प्रमाणात व्हिटामिन सी असते. जे इम्युन बूस्ट करण्याचे काम करतात. तसेच वजन घटवण्यात फायदेशीर असतात. दररोजच्या डाएटमध्ये संत्रे, मोसंबी, ग्रेपफ्रुटसारख्या पदार्थांचा समावेश करू शकता.



केल


हिरव्या पालेभाज्यांमध्ये केल सर्वात फायदेशीर मानले जाते. याचा वापर साधारणपणे सलाडच्या रूपात केला जातो. यात व्हिटामिन्स, मिनरल्स, फायबर आणि लो कॅलरी असते. यामुळे वजन कंट्रोल करण्यात मदत होते.



अक्रोड


अक्रोड हे एक जबरदस्त ड्रायफ्रुट आहे. हे एक हेल्दी फॅट, प्रोटीन, फायबरसारखे न्यूट्रिएंट याचा मोठा स्त्रोत आहे. यात अँटीऑक्सिडंट असतात. थंडीच्या दिवसांत शरीर गरम ठेवण्यासोबतच वजन मेंटेन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.



आले


आल्याचा वापर साधारणपणे मसाल्याचा पदार्थ म्हणून केला जातो. आल्यामध्ये मेटाबॉलिज्म मजबूत करण्यासोबतच वजन कमी करण्यात फायदेशीर ठरतात. यामुळे डायजेशन चांगले होते तसेच सूजही कमी होण्यास मदत होते.

Comments
Add Comment

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर