थंडीत वजन वाढते आहे तर हे ५ पदार्थ जरूर करा ट्राय, रहाल फिट

मुंबई: थंडीमध्ये तुम्ही पाहिले असेल की बऱ्याच जणांचे वजन वाढते. याची अनेक कारणे आहेत. यातील महत्त्वाचे कारण म्हणजे थंडीमध्ये अनेकांना अंथरूण घेऊन लोळत राहावेसे वाटते. यामुळे ना जिमला जाणे होत ना रनिंग. एक्सरसाईजही कमी होते. यामुळे फिजीकल अॅक्टिव्हिटी कमी होते.


थंडीच्या दिवसात हेवी डाएट घेतला जातो. यात फॅट, प्रोटीन, कॅलरीज मोठ्या प्रमाणात असतात. लोक या काळात आलू पराठे, गाजरचा हलवा, नॉनव्हेज जास्त प्रमाणात खातात. यामुळे शरीरात उष्णता निर्माण होऊ शकेल. मात्र खाण्यातील कॅलरीजचा परिणाम आपल्या पोट आणि कमरेवर दिसू लागतो.


अशातच हे ५ पदार्थ ज्यांचा डाएटमध्ये समावेश केल्याने तुम्ही फिट आणि अॅक्टिव्ह राहू शकता.



डाळिंब


डाळिंब अतिशय पौष्टिक फळ आहे.यात मोठ्या प्रमाणात पौष्टिक तत्वे असतात. यात अँटी ऑक्सिडंट आणि फायबरचे प्रमाण अधिक आढळते. डाळिंबाचा रस शरीरात रक्त वाढवण्यासाठी तसेच बॉडीला एनर्जी देण्याचा जबरदस्त स्त्रोत आहे. यात फॅट बर्न कऱणारेही गुण असतात. हे तुम्ही डायरेक्ट खाऊ शकता अथवा फ्रुट सलाड म्हणूनही सेवन करू शकता.



आंबट फळे


थंडीच्या दिवसांत आंबट फळे खाण्यासाठी आरोग्यासाठी फायदेशीर असते. यात मोठ्या प्रमाणात व्हिटामिन सी असते. जे इम्युन बूस्ट करण्याचे काम करतात. तसेच वजन घटवण्यात फायदेशीर असतात. दररोजच्या डाएटमध्ये संत्रे, मोसंबी, ग्रेपफ्रुटसारख्या पदार्थांचा समावेश करू शकता.



केल


हिरव्या पालेभाज्यांमध्ये केल सर्वात फायदेशीर मानले जाते. याचा वापर साधारणपणे सलाडच्या रूपात केला जातो. यात व्हिटामिन्स, मिनरल्स, फायबर आणि लो कॅलरी असते. यामुळे वजन कंट्रोल करण्यात मदत होते.



अक्रोड


अक्रोड हे एक जबरदस्त ड्रायफ्रुट आहे. हे एक हेल्दी फॅट, प्रोटीन, फायबरसारखे न्यूट्रिएंट याचा मोठा स्त्रोत आहे. यात अँटीऑक्सिडंट असतात. थंडीच्या दिवसांत शरीर गरम ठेवण्यासोबतच वजन मेंटेन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.



आले


आल्याचा वापर साधारणपणे मसाल्याचा पदार्थ म्हणून केला जातो. आल्यामध्ये मेटाबॉलिज्म मजबूत करण्यासोबतच वजन कमी करण्यात फायदेशीर ठरतात. यामुळे डायजेशन चांगले होते तसेच सूजही कमी होण्यास मदत होते.

Comments
Add Comment

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण