Arvind Kejriwal : दिल्लीत अरविंद केजरीवालांच्या निकटवर्तीयांच्या घरी ईडीची छापेमारी

  56

मनी लाँड्रिंगप्रकरणी जवळपास १० ठिकाणी टाकली छाप


नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) गेल्या अनेक दिवसांपासून अडचणीत सापडले आहेत. ईडी (ED) हात धुवून त्यांच्यामागे लागली आहे. त्यातच आता केजरीवालांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे दिल्लीत जवळपास १० ठिकाणी ईडीने छापेमारी (Raids) केली आहे. ही ठिकाणे केजरीवालांच्या निकटवर्तीयांची आहेत. मनी लाँड्रिंग (Money Laundering) प्रकरणात ईडीकडून आप नेत्यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे.


आपचे राज्यसभा खासदार एन. डी. गुप्ता (N. D. Gupta) यांच्या घरावर तसेच अरविंद केजरीवालांचे खासगी सचिव विभव कुमार (Vibhav Kumar) यांच्या घरावर देखील ईडीकडून छापा टाकण्यात आला आहे. याशिवाय दिल्ली जल बोर्डाचे माजी मेंबर शलभ यांच्या निवासस्थानी देखील छापे टाकले जात आहेत.


मनी लाँड्रिंगप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ED) सातत्याने कारवाई करत आहे. आज या प्रकरणी ईडीने आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवालांचे खाजगी सचिव आणि आम आदमी पार्टीशी संबंधित बड्या नेत्यांच्या घरांवर छापेमारी केली आहे. ईडी सुमारे १० ठिकाणी छापेमारी करत शोध घेत आहे.


Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे