Paytm : पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयने इतकी कठोर कारवाई का केली?

  96

पेटीएमची बँकिंग सर्व्हिस १ मार्चपासून बंद


नवी दिल्ली : ऑनलाईन पेमेंटची सुविधा बहाल करणारी दिग्गज कंपनी पेटीएमला (paytm) भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (reserve bank) मोठा झटका बसला आहे. पेटीएम पेमेंट बँकने नवे ग्राहक जोडण्यावरील बंदीसोबतच आरबीआयने हे आदेशही दिले आहेत की पेटीएम पेमेंट्स बँक २९ फेब्रुवारी २०२४ नंतर कोणत्याही ग्राहकाचे खाते, वॉलेट आणि फास्टटॅगमध्ये डिपॉझिट अथवा टॉपअप स्वीकार करणार नाही.


पेटीएम पेमेंट्स बँकेवर (Paytm Payments Bank) ३१ जानेवारी रोजी आरबीआयने ही कारवाई केली. आरबीआयने नियामांचे उल्लघंन केल्याबद्दल हे निर्बंध लावण्यात आले आहेत. पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयने इतकी कठोर कारवाई का केली, याची माहिती आता समोर आली आहे.


कुठलीही ओळख न दाखवता कोट्यवधी अकाउंट बनवणे हे पेटीएम पेमेंट्स बँकेवर बंदी घालण्यामागे एक प्रमुख कारण आहे. कोट्यवधी अकाउंटची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नव्हती. यामध्ये मनी लॉड्रिंग झाल्याचा संशय आहे. पेटीएम पेमेंट्स बँक अंतर्गत एकच पॅन कार्डशी तब्बल १००० हून अधिक यूजर्सचे अकाउंट कनेक्ट करण्यात आले होते.



पेटीएम पेमेंट्स बँकेकडे तब्बल ३५ कोटी ई-वॉलेट आहेत. यामध्ये तब्बल ३१ कोटी अॅक्टिव्ह नाहीत, तर फक्त चार कोटी कोणाच्याही अमाउंटशिवाय किंवा कमी अमाउंटसह सुरू आहेत. म्हणजेच मोठ्या संख्येने इनअॅक्टिव्ह अकाउंट आहेत. तसेच लाखो अकाउंटचे केवायसी अपडेट झालेले नाहीत. यामुळेच पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयने इतकी कठोर कारवाई केली आहे.

Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.