Paytm : पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयने इतकी कठोर कारवाई का केली?

पेटीएमची बँकिंग सर्व्हिस १ मार्चपासून बंद


नवी दिल्ली : ऑनलाईन पेमेंटची सुविधा बहाल करणारी दिग्गज कंपनी पेटीएमला (paytm) भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (reserve bank) मोठा झटका बसला आहे. पेटीएम पेमेंट बँकने नवे ग्राहक जोडण्यावरील बंदीसोबतच आरबीआयने हे आदेशही दिले आहेत की पेटीएम पेमेंट्स बँक २९ फेब्रुवारी २०२४ नंतर कोणत्याही ग्राहकाचे खाते, वॉलेट आणि फास्टटॅगमध्ये डिपॉझिट अथवा टॉपअप स्वीकार करणार नाही.


पेटीएम पेमेंट्स बँकेवर (Paytm Payments Bank) ३१ जानेवारी रोजी आरबीआयने ही कारवाई केली. आरबीआयने नियामांचे उल्लघंन केल्याबद्दल हे निर्बंध लावण्यात आले आहेत. पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयने इतकी कठोर कारवाई का केली, याची माहिती आता समोर आली आहे.


कुठलीही ओळख न दाखवता कोट्यवधी अकाउंट बनवणे हे पेटीएम पेमेंट्स बँकेवर बंदी घालण्यामागे एक प्रमुख कारण आहे. कोट्यवधी अकाउंटची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नव्हती. यामध्ये मनी लॉड्रिंग झाल्याचा संशय आहे. पेटीएम पेमेंट्स बँक अंतर्गत एकच पॅन कार्डशी तब्बल १००० हून अधिक यूजर्सचे अकाउंट कनेक्ट करण्यात आले होते.



पेटीएम पेमेंट्स बँकेकडे तब्बल ३५ कोटी ई-वॉलेट आहेत. यामध्ये तब्बल ३१ कोटी अॅक्टिव्ह नाहीत, तर फक्त चार कोटी कोणाच्याही अमाउंटशिवाय किंवा कमी अमाउंटसह सुरू आहेत. म्हणजेच मोठ्या संख्येने इनअॅक्टिव्ह अकाउंट आहेत. तसेच लाखो अकाउंटचे केवायसी अपडेट झालेले नाहीत. यामुळेच पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयने इतकी कठोर कारवाई केली आहे.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या