Paytm : पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयने इतकी कठोर कारवाई का केली?

पेटीएमची बँकिंग सर्व्हिस १ मार्चपासून बंद


नवी दिल्ली : ऑनलाईन पेमेंटची सुविधा बहाल करणारी दिग्गज कंपनी पेटीएमला (paytm) भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (reserve bank) मोठा झटका बसला आहे. पेटीएम पेमेंट बँकने नवे ग्राहक जोडण्यावरील बंदीसोबतच आरबीआयने हे आदेशही दिले आहेत की पेटीएम पेमेंट्स बँक २९ फेब्रुवारी २०२४ नंतर कोणत्याही ग्राहकाचे खाते, वॉलेट आणि फास्टटॅगमध्ये डिपॉझिट अथवा टॉपअप स्वीकार करणार नाही.


पेटीएम पेमेंट्स बँकेवर (Paytm Payments Bank) ३१ जानेवारी रोजी आरबीआयने ही कारवाई केली. आरबीआयने नियामांचे उल्लघंन केल्याबद्दल हे निर्बंध लावण्यात आले आहेत. पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयने इतकी कठोर कारवाई का केली, याची माहिती आता समोर आली आहे.


कुठलीही ओळख न दाखवता कोट्यवधी अकाउंट बनवणे हे पेटीएम पेमेंट्स बँकेवर बंदी घालण्यामागे एक प्रमुख कारण आहे. कोट्यवधी अकाउंटची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नव्हती. यामध्ये मनी लॉड्रिंग झाल्याचा संशय आहे. पेटीएम पेमेंट्स बँक अंतर्गत एकच पॅन कार्डशी तब्बल १००० हून अधिक यूजर्सचे अकाउंट कनेक्ट करण्यात आले होते.



पेटीएम पेमेंट्स बँकेकडे तब्बल ३५ कोटी ई-वॉलेट आहेत. यामध्ये तब्बल ३१ कोटी अॅक्टिव्ह नाहीत, तर फक्त चार कोटी कोणाच्याही अमाउंटशिवाय किंवा कमी अमाउंटसह सुरू आहेत. म्हणजेच मोठ्या संख्येने इनअॅक्टिव्ह अकाउंट आहेत. तसेच लाखो अकाउंटचे केवायसी अपडेट झालेले नाहीत. यामुळेच पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयने इतकी कठोर कारवाई केली आहे.

Comments
Add Comment

स्मृती मानधना-पलाश मुच्छल लग्नाची 'ही' तारीख पंतप्रधानानीचं केली उघड

मुंबई : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबतची चर्चा अनेक दिवसापासून रंगत होती. मात्र आता त्यांच्या

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर अयोध्येचा विकास

लखनऊ / अयोध्या : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा परिणाम म्हणून अयोध्येचा स्मार्ट सिटी

विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपती, राज्यपालांवर वेळेचं बंधन नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना राज्य किंवा केंद्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच जिल्हा परिषदांचा कार्यक्रम

आरक्षणासाठी निवडणूक आयोग पुन्हा लॉटरी काढण्याची शक्यता नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

CM Nitish Kumar Bihar : CM नितीश कुमारांकडे फक्त २१ हजारांची रोख रक्कम! पाटण्यात नावावर घर नाही, तरीही नितीश कुमार यांची एकूण संपत्ती किती?

पाटणा : बिहारच्या राजकारणाला गेल्या दोन दशकांपासून एकच चेहरा व्यापून राहिला आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांचा. ते

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे मोठे विधान! राज्यातील राजकारणावर चर्चांना उधाण

कर्नाटक: एकीकडे बिहारमध्ये आज नितीशकुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे