Ind vs Eng: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३३२ धावा

विशाखापट्टणम : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडच्या १ बाद ६७ धावा झाल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी ३३२ धावांची आवश्यकता आहे.


पहिला विकेट गमावल्यानंतर इंग्लंडने रेहान अहमदला नाईट वॉचमन म्हणून तिसऱ्या स्थानावर पाठवले आणि तो विकेट वाचवण्यात यशस्वीही ठरला. याशिवाय सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने दुसऱ्या डावात एकूण २५५ धावा केल्या.


तिसऱ्या दिवसाची सुरूवात भारताच्या दुसऱ्या डावासोबत झाली. तेव्हा भारताच्या बिनबाद २८ धावा झाल्या होत्या. या दरम्यान यशस्वी जायसवालने १७ बॉलमध्ये १५ तर कर्णधार रोहित शर्मा १९ बॉलमध्ये १३ धावांवर खेळत होते. भारतासाठी तिसरा दिवस काही खास राहिला नाही. कारण त्यांनी तीन सत्रे न खेळताना सर्व १० विकेट गमावल्या. या दरम्यान इंग्लंडसाठी स्पिनर टॉम हार्टलेने सर्वाधिक ३ विकेट मिळवल्या. भारतासाठी शुभमन गिलने शतक ठोकताना १४७ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०४ धावांची खेळी केली.


दिवसाच्या तिसऱ्या सत्रात टीम इंडिया आपल्या दुसऱ्या डावात २५५ धावांवर ऑलआऊट झाली. दोन्ही डावांत बॅटिंग केल्यानंतर भारताने इंग्लंडसमोर ३९९ धावांचे आव्हान ठेवले. तिसरा दिवस संपेपर्यंत इंग्लंडने १ विकेट गमावताना ६७ धावा केल्या यानंतर दोन दिवसांमध्ये विजयासाठी ३२२ धावांचे आव्हान आहे.


दिवस संपेपर्यंत इंग्लंडसाठी सलामीवीर जॅक क्रॉली ५० चेंडूत ३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २९ धावांवर नाबाद आहे. तर रेहान अहमद ८ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने ९ धावांवर नाबाद आहे.

Comments
Add Comment

BCCI : आता दृष्टिहीन क्रिकेट संघाला मिळणार रॉयल ट्रीटमेंट; बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय अंध क्रिकेट असोसिएशन (सीएबीआय) साठी एक योजना जाहीर केली आहे. या

T20 World Cup 2026 : अभिषेक शर्माच्या फॉर्मची काळजी करणाऱ्यांची मला काळजी वाटते : सूर्यकुमार यादव

आयसीसी टी२० २०२६ च्या विश्वचषकाचा गट टप्पा संपला असून आता सुपर ८ चा महत्वाचा टप्पा सुरु झाला आहे. या स्पर्धेत

भारत आणि दक्षिण आफ्रिका रविवारी आमनेसामने

अहमदाबाद : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर

शिखर धवन दुसऱ्यांदा अडकला विवाहबंधनात

नवी दिल्ली : माजी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनने दुसऱ्यांदा लग्न केले. आयर्लंडच्या सोफी शाइनसोबत शिखर धवनने लग्न

सुपर एट फेरीतला पहिलाच सामना पावसामुळे रद्द

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंडी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धची टी ट्वेंटी मालिका भारताने २-१ अशी जिंकली, सिडनी आणि अॅडलेडमध्ये भारताचा विजय

अॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांदरम्यान तीन सामन्यांची टी ट्वेंटी मालिका झाली. ही मालिका भारताने