Ind vs Eng: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३३२ धावा

Share

विशाखापट्टणम : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडच्या १ बाद ६७ धावा झाल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी ३३२ धावांची आवश्यकता आहे.

पहिला विकेट गमावल्यानंतर इंग्लंडने रेहान अहमदला नाईट वॉचमन म्हणून तिसऱ्या स्थानावर पाठवले आणि तो विकेट वाचवण्यात यशस्वीही ठरला. याशिवाय सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने दुसऱ्या डावात एकूण २५५ धावा केल्या.

तिसऱ्या दिवसाची सुरूवात भारताच्या दुसऱ्या डावासोबत झाली. तेव्हा भारताच्या बिनबाद २८ धावा झाल्या होत्या. या दरम्यान यशस्वी जायसवालने १७ बॉलमध्ये १५ तर कर्णधार रोहित शर्मा १९ बॉलमध्ये १३ धावांवर खेळत होते. भारतासाठी तिसरा दिवस काही खास राहिला नाही. कारण त्यांनी तीन सत्रे न खेळताना सर्व १० विकेट गमावल्या. या दरम्यान इंग्लंडसाठी स्पिनर टॉम हार्टलेने सर्वाधिक ३ विकेट मिळवल्या. भारतासाठी शुभमन गिलने शतक ठोकताना १४७ चेंडूत ११ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०४ धावांची खेळी केली.

दिवसाच्या तिसऱ्या सत्रात टीम इंडिया आपल्या दुसऱ्या डावात २५५ धावांवर ऑलआऊट झाली. दोन्ही डावांत बॅटिंग केल्यानंतर भारताने इंग्लंडसमोर ३९९ धावांचे आव्हान ठेवले. तिसरा दिवस संपेपर्यंत इंग्लंडने १ विकेट गमावताना ६७ धावा केल्या यानंतर दोन दिवसांमध्ये विजयासाठी ३२२ धावांचे आव्हान आहे.

दिवस संपेपर्यंत इंग्लंडसाठी सलामीवीर जॅक क्रॉली ५० चेंडूत ३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २९ धावांवर नाबाद आहे. तर रेहान अहमद ८ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने ९ धावांवर नाबाद आहे.

Recent Posts

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

10 mins ago

प्रहार बुलेटीन: ०५ जुलै २०२४

दिवसभरातील (Prahaar Bulletin) महत्वाच्या बातम्या… टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत काही चाहते आजारी तर काही झाले…

2 hours ago

Mumbai News : व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या ‘या’ विद्यार्थिनींना मिळणार मोफत प्रवेश!

राज्य मंत्रिमंडळाने घेतला मोठा निर्णय मुंबई : सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर आता…

2 hours ago

NEET PG Exam पुढे ढकलली! नवीन तारीख आली समोर

प्रश्नपत्रिका तयार करतानाच घेणार 'ही' खास काळजी मुंबई : NEET PG परीक्षा रद्द झाल्यानंतर जवळपास…

4 hours ago

Ranjeet Nimbalkar : राहुल गांधींनी पंढरपुरच्या वारीत कॅट वॉक करायला येऊ नये!

यांचा वारीतला सहभाग केवळ राजकीय फायद्यासाठी भाजपाच्या माजी खासदारांची विरोधकांवर बोचरी टीका सोलापूर : आषाढी…

4 hours ago

Nitesh Rane : गुजरातच्या बसवर टीका करणारा मविआचा नेता अदानींचा खास ड्रायव्हर!

आमदार नितेश राणे यांचा रोहित पवारांना अप्रत्यक्ष टोला कोणाची बुद्धी लहान याबाबत राहुल गांधी आणि…

4 hours ago