Sanjay Raut : दादा भुसे मानहानीप्रकरणी संजय राऊतांना आज कोर्टात हजर राहण्याचे आदेश

मालेगाव : वृत्तपत्रातून चुकीचा व बदनामीकारक (defamation) मजकूर प्रसिध्द केल्याचा आरोप करत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर (Sanjay Raut) अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी आज मालेगाव न्यायालयात (Malegaon Court) सुनावणी होणार आहे.


२ डिसेंबरला संजय राऊत मालेगाव न्यायालयात हजर राहिले होते. या सुनावणीत न्यायालयाने त्यांना दिलासा दिला होता. संजय राऊत यांना याआधी जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र आज पुन्हा या प्रकरणी सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीला संजय राऊत हजर राहतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



काय आहे प्रकरण?


संजय राऊत यांनी दै.सामना या वृत्तपत्रात गिरणा सहकारी साखर कारखान्यात मंत्री दादा भुसे यांनी १७८ कोटी रुपयांचा शेअर्स घोटाळा केल्याचा चुकीचा व बदनामीकारक मजकूर प्रसिध्द केल्याचा आरोप करत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्यावर मालेगावच्या न्यायालयात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला. ज्येष्ठ विधीज्ञ सुधीर अक्कर यांच्या मार्फत दाखल केलेल्या या फौजदारी खटल्यात मंत्री दादा भुसे यांची जन सामन्यांमध्ये प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने दै.सामना या वर्तमानपत्रातून बदनामी केल्याने आरोप खा.संजय राऊत यांच्यावर करण्यात आला आहे.


Comments
Add Comment

BMC News : धक्कादायक! मुंबईच्या नालेसफाईत सापडली चक्क अख्खी रिक्षा; बीएमसीच्या कारवाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : मुंबईत पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या नालेसफाईच्या कामाचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर

Mumbai’s Iconic Vada Pav : मुंबईकरांच्या 'इमोशन'ला महागाईची फोडणी! मुंबईत वडापाव आणि मिसळ पावाच्या दरात प्रति पॅकेट थेट १० रुपयांची वाढ

मुंबई : मुंबईकरांची 'लाईफलाईन' आणि रोजच्या धावपळीच्या जगण्याचा अविभाज्य भाग असलेला वडापाव, तसेच खवय्यांची आवडती

Mumbai Watermelon Death Case : मुंबईतील ‘कलिंगड डेथ केस’मध्ये मोठा ट्विस्ट; फॉरेन्सिक अहवालातून धक्कादायक सत्य समोर

मुंबई : मुंबईतील पायधुनी परिसरात घडलेल्या डोकाडिया कुटुंबाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात आता सर्वात मोठा आणि

Mumbai Rain : उकाड्याने हैराण मुंबईकरांना दिलासा; मुंबईत ५ जूनपूर्वीच पावसाचे आगमन होण्याची शक्यता!

मुंबई : मुंबईकरांनो, आता छत्र्या आणि रेनकोट तयार ठेवा! प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी अखेर

आयएएस तुकाराम मुंढे आता मंत्री झिरवळ यांच्या विभागात

२१ वर्षांच्या कार्यकाळात २५वी बदली; अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा कारभार स्वीकारणार मुंबई : आपल्या कडक

मुंबईला जलमुक्त करण्यासाठी महापालिकेचा मास्टर प्लॅन

मुंबई : मुंबई महानगराची भौगोलिक रचना लक्षात घेता सखल भागांमध्ये साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा जलद आणि