Hemant Soren : हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर झारखंड बंदची हाक

सोरेन यांच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात होणार सुनावणी


रांची : जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने (ED) हेमंत सोरेन (Hemant Soren) यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. ईडीकडून अटकेच्या हालचाली सुरू झाल्यानंतर हेमंत सोरेन यांनी राज्यपालांकडे जात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देऊन सोरेन घरी पोहोचताच ईडीने त्यांना अटक केली. हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर आता झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.


जमीन घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या हेमंत सोरेन यांच्या याचिकेवर आज गुरुवारी सकाळी १०.३० वाजता न्यायालयात सुनावणी होणार आहे. ईडीच्या समन्सविरोधात हेमंत सोरेन यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या अटकेविरोधात त्यांनी न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. त्यामुळे न्यायालयाकडून हेमंत सोरेन यांना दिलासा मिळतो का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


तसेच झारखंडमधील सर्व आदिवासी संघटनांनी गुरुवारी, १ फेब्रुवारी रोजी राज्यात बंदची हाक दिली आहे. या संदर्भात पोस्टरही जारी करण्यात आले असून, त्यात हेमंत सोरेन यांचे फोटो आहे.


झारखंड मुक्ती मोर्चाने चंपाई सोरेन (Champai  Soren) यांना राज्याचा पुढील मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला आहे. हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर चंपाई यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे. त्यांनी ४३ आमदारांची पाठिंब्याची पत्रेही राज्यपालांना सुपूर्द केली आहेत. त्यामुळे झारखंडमध्ये सध्या प्रचंड राजकीय उलथापालथी सुरु आहेत.


Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने