Ramayana Serial : अयोध्येत रामाच्या पुनरागमनानंतर आता रामायण मालिकेचंही होणार पुनरागमन

राम-सीता पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला


मुंबई : यंदाच्या वर्षी हिंदूंच्या (Hindu) दृष्टीने २२ जानेवारी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरला. अयोध्येत या दिवशी भव्य अशा राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (Ramlalla Pran Pratishtha) करण्यात आली. प्रभु श्री रामाचे या दिवशी पुनरागमन झाले. अशा या राममय वातावरणात रामभक्तांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. टीव्ही मनोरंजन क्षेत्रात (Television industry) सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली मालिका 'रामायण' (Ramayana Serial) पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दूरदर्शन नॅशनलने (DD National) एक पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली.


रामानंद सागर यांची रामायण मालिका ही आतापर्यंत सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली मालिका आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. २५ जानेवारी १९८७ ते ३१ जुलै १९८८ पर्यंत ही मालिका सुरु होती. ८२ टक्के प्रेक्षकांनी, दर्शकांनी ही मालिका पाहिल्याचे सांगण्यात येते. आतापर्यतचा रेकॉर्डब्रेक मिळालेला प्रतिसाद म्हणून त्याबाबत सांगितले जाते. कोरोना काळात देखील या मलिकेचे पुन्हा प्रक्षेपण करण्यात आले होते. तेव्हाही प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर ही मालिका पुन्हा दूरदर्शनवरुन प्रसारित केली जाणार आहे.


दूरदर्शन नॅशनलने केलेल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, प्रभु श्रीराम हे पुन्हा आले आहेत. भारतातील सर्वाधिक लोकप्रिय रामायण मालिका ही पुन्हा एकदा डीडी नॅशनलवर पाहता येणार आहे. केव्हापासून ही मालिका प्रदर्शित होणार याबाबत माहिती समोर आलेली नाही.





राम सीतेची लोकप्रियता कायम


२२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये राम मंदिराचे उद्घाटन अन् प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी रामायण मालिकेचे निर्माते आणि त्या मालिकेत काम केलेल्या कलाकारांना देखील यावेळी निमंत्रित करण्यात आले होते. त्यात उल्लेख करायचा झाल्यास अरुण गोविल, दीपिका चिखलिया, सुनील लहरी हे सहभागी झाले होते. रामायण मालिकेत रामाची भूमिका करणाऱ्या अरुण गोविल आणि सीतेच्या भूमिकेतील दीपिका चिखलिया यांची लोकप्रियता कायम आहे.

Comments
Add Comment

गोंदिया-जबलपूर मार्ग दुहेरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी

महाराष्ट्रासह चार राज्यात मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्प नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली

पोखरणमध्ये भारताचे हवाई दल करणार 'ऑपरेशन वायुशक्ती'

पोखरण : भारतीय हवाई दल राजस्थानमधील पोखरण येथे २७ फेब्रुवारी रोजी 'ऑपरेशन वायुशक्ती' अंतर्गत युद्धसराव अर्थात

संसदीय मुत्सद्देगिरीत डॉ. श्रीकांत शिंदेंची एन्ट्री; इंडोनेशियासोबतच्या संबंधांचे करणार सारथ्य

नवी दिल्ली : भारताची 'संसदीय मुत्सद्देगिरी' (Legislative Diplomacy) जागतिक स्तरावर अधिक बळकट करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष मा. ओम

Kerala To Be Renamed : केरळचे नाव बदलून केरळम होणार? राज्य निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता

केरळचे नाव बदलून केरळम करण्याचे विधेयक आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर होण्याची शक्यता आहे, जो

AI ​​Impact Summit मधील आंदोलन प्रकरणी युवक काँग्रेस अध्यक्षाला अटक

नवी दिल्ली : मागील आठवड्यात झालेल्या एआय इम्पॅक्ट समिटमधील भारतीय युवा काँग्रेसच्या आंदोलन प्रकरणात दिल्ली

US Tariff on India : अमेरिकेच्या टॅरिफ बदलांच्या परिणामांवर भाष्य करणे खूप घाईचे ठरेल - अर्थमंत्री निर्मला सीतारमण

अमेरिकेने केलेल्या शुल्कातील (टॅरिफ) बदलांच्या परिणामांबाबत भाष्य करणे खूप घाईचे ठरेल, असे केंद्रीय अर्थ आणि