IND Vs ENG: दुसऱ्या कसोटीत भारताची झोप उडवेल इंग्लंड, कोचनी बनवला हा खास प्लान

मुंबई: इंग्लंडने दोन फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय फलंदाजांची झोप उडवेल असा प्लान तयार केला आहे. टॉम हार्टलेविरुद्ध भारताचे फलंदाज अयशस्वी ठरत असतानाच इंग्लंडचा संघ चार स्पिनर्ससोबत मैदानात उतरू शकतो. इंग्लंडचा हा निर्णय योग्यही ठरू शकतो कारण विशाखापट्टणमची पिच स्पिनर्ससाठी फायदेशीर ठरू शकते. इंग्लंडचे कोच ब्रँडम मॅकक्युलमचा दावा आहे की ते चार स्पिनर्ससोबत मैदानात उतरण्याचा निर्णय घेण्यात घाबरणार नाही.


इंग्लंडने पहिल्या कसोटीत टीम इंडियाला २८ धावांनी हरवले . इंग्लंड या मालिकेत १-० अशा आघाडीवर आहे. आता दुसऱ्या कसोटी २० वर्षीय युवा स्पिनर शोएब बशीरही खेळण्यासाठी उपलब्ध आहे. मॅकक्युलमने म्हटले हार्टिलेला पहिली कसोटी खेळण्याचा प्लान यशस्वी झाला.


इंग्लंडचे कोच म्हणाले, हार्टिले पहिला सामना केळत होता. याआधी हार्टिलेने केवळ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळी केली होती. आमची निवड योग्य ठरली. हार्टिलेने दाखवून दिले की हरलेला डाव कसा जिंकता येतो. आम्हाला अशा प्रकारचे बोल्ड निर्णय घेण्याची गरज आहदरम्यान, इंग्लंडचा हा निर्णय घेणे तितके सोपे असणार नाही. इंग्लंडचा सगळ्यात अनुभवी स्पिनर जॅक लीच दुखापतीने ग्रस्त आहे. पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत खेळणे नक्की नाही. बेन स्टोक्सने लीच खेळण्याच्या शक्यतेला नाकारले नाही. याशिवाय इंग्लंडचा स्पिनर रेहन पहिल्या कसोटीत अपयशी ठरला होता. भारताच्या फलंदाजांनी त्याच्यावर हल्ला केला होता.


इंग्लंडच्या संघाला जेम्स अँडरसनची कमतरता भासत असल्याचे कसोटी सामन्यात दिसत होते. सामन्यात अनेक ठिकाणी असे जाणवले. दरम्यान, विशाखापट्टणमची पिच हैदराबादपेक्षाही स्पिनर्सला अधिक फायदेशीर ठरू शकते.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत