तुम्ही नाश्त्यामध्ये चहा-चपाती खाता का? तर हे जरूर वाचा नाहीतर...

मुंबई: अनेक घरांमध्ये सकाळच्या नाश्त्यामध्ये चहा-चपाती खाल्ली जाते. हा एक प्रकारचा पोटभरीचा नाश्ता मानला जातो. मात्र तुम्हाला माहीत आहे का हा पोटभरीचा पदार्थ तुमच्या आरोग्यावर काय परिणाम करत असतो. चहा आणि चपाती हे कॉम्बिनेशन खाण्यासाठी जरी चांगले असले तरी आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते.



वाढू शकते अॅसिडिटी


आरोग्य तज्ञांच्या मते गरम पेय पदार्थासोबत चपाती हे एक खराब कॉम्बिनेशन आहे. चपातीसोबत चहा प्यायल्याने अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. कारण कॅफेनयुक्त चहा अथवा कॉफी तुमच्या पोटात अॅसिड बेस संतुलन बिघवते. यामुळे चपाती अथवा पराठा हे जड पदार्थ खाल्ल्याने पोटाचे आरोग्य बिघडू शकते.



अॅनिमियाची भीती


चहामधील फेनोलिक केमिकल्स पोटातील आर्यन-कॉम्प्लेक्सच्या फॉर्मेशनला स्टिम्युलेट करतात. यामुळे शरीरात आर्यन शोषण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे खाण्यासोबत चहाचे सेवन करू नये. ज्या लोकांना आर्यनची कमतरता आहे त्यांनी खाण्यासोबत चहाचे सेवन करू नये.



चहा-चपाती नुकसानकारक


चहामध्ये आढळणारे टॅनिन प्रोटीनसोबत मिळून अँटीन्यूट्रिएंट्सप्रमाणे काम करतात. एका अभ्यासानुसार टॅनिन या प्रोटीनला ३८ टक्क्यांपर्यंत कमी करतात. अशातच चहासोबत चपाती अथवा पराठा खाणे आरोग्यासाठी नुकसानदायक आहे.


जर तुम्ही चहा पिण्याचे शौकीन असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवून चहा प्या. कोणत्याही प्रकारचे भोजन केल्यानंतर कमीत कमी ४५ मिनिटांनी चहा प्या. नाश्ता अथवा दुपारचे जेवण केल्यानंतर १ तासांनी अथवा संध्याकाळी स्नॅक्ससोबत तुम्ही चहाचा आनंद घेऊ शकता.

Comments
Add Comment

उत्तम आरोग्यासाठी पोटाकडे लक्ष द्या..

पोटाचे आरोग्य उत्तम असेल तर आपलं पूर्ण शरीर निरोगी राहतं. पोटाचं आरोग्य सांभाळण्यासाठी आतड्याचे स्वच्छ राहणे,

Hair Care: केस गळती थांबवण्यासाठी 'या' ५ बियांचे सेवन करा, नैसर्गिकरित्या केस वाढतील

मुंबई : आजकाल बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे केस गळण्याची समस्या खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत, केसांचे

योगाचे प्रकार

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके मागील लेखात पातंजल-योगाव्यतिरिक्त योगाच्या इतर प्रकारांपैकी हठयोगाविषयी माहिती

Health: सकाळी, दुपारी की रात्री? ड्रायफ्रुट्स खाण्याची योग्य वेळ कोणती, घ्या जाणून...

मुंबई: सुका मेवा (Dry fruits) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु तो कोणत्या वेळी खावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे

उष्ण पदार्थांचे अति सेवन : उच्च रक्तदाब आणि त्वचेच्या समस्यांचे प्रमुख कारण !

मुंबई : आयुर्वेद हा भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये शरीराच्या संतुलनावर विशेष

साथींच्या आजारापासून मुलांना दूर ठेवा

विनायक बेटावदकर गणपती उत्सवापूर्वी सुमारे पंधरा दिवस, गणपती उत्सवात कल्याण शहर, ग्रामीण भागाचे हवामान साधारण