विरोधी पक्षनेता देता येत नाही इतकी पक्षाची स्थिती खालवली

राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांची काँग्रेसवर सडकून टीका


शिर्डी : इंडिया आघाडीची बैठक म्हणजे भारतीय जनता पार्टीला विरोध कसा करता येईल याचा एक कलमी कार्यक्रम असतो. काँग्रेसकडे अथवा आघाडीकडे विकास कसा होणार व लोकांसाठी काय करायचे याचे कुठलेही धोरण नसून भविष्यातही आघाडीचे काहीच खरे नसल्याचे सांगत काँग्रेसला साधा विरोधी पक्ष नेता ही देता येत नाही. इतकी या पक्षाची स्थिती खालवली असल्याने हा पक्ष जनतेला काय देणार, असा उपरोधिक सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री खासदार प्रफुल पटेल यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.


दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री खा प्रफुल्ल पटेल यांनी सहपरिवार सोमवारी (दि.२९ रोजी) साईदरबारी हजेरी लावत श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. साईदर्शनानंतर खा.पटेल यांचा साईबाबा संस्थानच्या वतीने प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


तसेच शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष दिपक गोंदकर यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी प्रदेश सचिव संग्राम कोते, तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर,अमित शेळके, युवक अध्यक्ष निलेश शिंदे , शिवाजी ज्ञानेश्वर गोंदकर, अमोल सुपेकर, गंगाधर वाघ आदीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. साईसमाधी दर्शनानंतर खा. प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवर सडकून टीका केली. राष्ट्रवादी ही कोणाची म्हणण्यापेक्षा अजित पवारांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारमध्ये एक महत्त्वाचा घटक म्हणून राष्ट्रवादी कार्यरत आहे. महायुतीमध्ये महाराष्ट्राच्या कल्याणासाठी राष्ट्रवादी शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य यासह सर्वच नागरिक तसेच विविध क्षेत्रातील घटकांसाठी सरकारमध्ये राहून अत्यंत महत्वपूर्ण योगदान देत आहे .


इंडिया आघाडीवर टीका करताना प्रफुल पटेल म्हणाले की, मुळात त्या शब्दातच ठिकठिकाणी डॉट असून त्यामुळे आघाडीमध्ये एकमेकांसाठी गतिरोधक खूप आहेत. काँग्रेसला देशासाठी विरोधी पक्ष नेताही देता येत नाही, इतकी वाईट अवस्था काँग्रेसची झाली असून पक्षाची स्थिती खालवली आहे. भाजपला कसा विरोध करायचा, याचाच अजेंडा बैठकीत ठरतो. मात्र देशाचा विकास कसा होणार, लोकांच्या हितासाठी व विकासासाठी काय करता येईल, याचा कुठलाही ठोस कार्यक्रम त्यांच्याकडे नाही. फक्त व्यक्तीविरोध करून अथवा भाजपला हटवण्याचा विचार करून लोकांची मते मिळवता येणार नाही, असा टोलाही लगावला. मागे चार राज्यांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये जनमत कोणाच्या बाजूने आहे. याचा अनुभव सर्वांना आला. लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाला कोणाचाही विरोध नाही. यापूर्वीसुद्धा घटनेत मंडल आयोगासारख्या दुरुस्त्या करून आपण आरक्षण ओबीसींना दिलेले आहे. सरसकट आरक्षण हा वेगळा प्रश्न जरी असला तरी मराठा समाजाच्या आरक्षणावर सर्व सकारात्मक आहेत. मंत्री नारायण राणे यांची भूमिका सुद्धा योग्य असून ज्यांना मराठा म्हणून दाखले हवेत ते कुणबीचे दाखले घेणार नाहीत. तर ज्यांना कुणबी हवेत त्यांनी घ्यावे, हे त्यांचे मत योग्यच आहे. त्याला दुमत असण्याचे कारण नाही. जो चांगले काम करील तो मुख्यमंत्री होईल त्यात गैरकाय असे यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Ashok Kharat : भोंदू खरातचा आणखी एक कारनामा समोर, फार्म हाऊसवर मुलींसोबत दारु प्यायचा, नशेत... ; सीएचा अशोक खरातविरोधात धक्कादायक खुलासा

नाशिक : स्वतःला दैवी अवतार सांगणारा भोंदू अशोक खरात यांच्या गळाचा आता आणखी आवळला जाणार आहे कारण याप्रकरणाच्या

Drugs Case : मीरा रोडमध्ये २३.३ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, तिघांना अटक

मीरा रोड : मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर शहरात पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या कारवाईत एकूण तेवीस लाख तीस

Ashok Kharat Case : धर्माच्या आड काळे कारनामे! ‘भोंदू’ अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे

मुंबई : धर्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला अशोक खरात (Ashok

Toll Exemption : सिंधुदुर्गवासियांना ‘टोल माफ’, पालकमंत्री नितेश राणेंनी दिला दिलासा

सावंतवाडी : ओसरगाव टोल नाक्यावर मी आमदार असताना सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोल लागू दिला नव्हता. आता महामार्ग

Nashik Simhastha Kumbh Mela : 'कुंभमेळा कामांना अधिक गती देणार'

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कामे समाधानकारकरितीने होत असून आगामी

River Linking : 'नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार'

नाशिक : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या