Pushkar Jog : बीएमसी कर्मचाऱ्यांना लाथा घालण्याची भाषा करणाऱ्या पुष्कर जोगने मागितली माफी

काय होतं 'ते' वादग्रस्त वक्तव्य?


मुंबई : सध्या मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) पार्श्वभूमीवर महापालिकेचे कर्मचारी (BMC employees) घरोघरी जाऊन सर्वेक्षण (Survey) करत आहेत. प्रत्येकाला काही प्रश्न विचारुन माहिती गोळा केली जात आहे. अभिनेता पुष्कर जोगच्या (Pushkar Jog) घरीही दोन बीएमसी महिला कर्मचारी सर्वेक्षणासाठी गेल्या होत्या. यावेळेस त्यांनी पुष्करला जातीबद्दल विचारणा केली. मात्र, ही गोष्ट पुष्करला खपली नाही आणि त्याने सोशल मीडियावर (Social Media) एक स्टोरी लिहिली. त्याच्या या स्टोरीमुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला. मात्र, लगेचच त्याने माफी मागत हा विषय थांबवला आहे.


पुष्कर जोगने जात विचारणाऱ्या महिला बीएमसी कर्मचाऱ्यांवर वैतागून लिहिले होते की, “काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्व्हे करतोय अशी माहिती देऊन माझी जात विचारत होते. त्या कर्मचारी जर बाईमाणूस नसत्या, तर २ लाथा नक्कीच मारल्या असत्या…कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोगबोलणार,” अशी पोस्ट त्याने रविवारी केली होती.



पुष्कर जोगच्या पोस्टमुळे चांगलाच वाद झाल्याचं पाहायला मिळालं. पालिका कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. इतकंच नाही तर पुष्कर जोगवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी केली होती. तसेच काही मराठी कलाकारांनीही याबाबत नाराजी दर्शवली. यानंतर पुष्करने शेअर केलेल्या पोस्टबाबत दिलगीरी व्यक्त केली.


पुष्कर जोगने लिहिले की, “मी रविवारी एक पोस्ट केली होती. ज्या पोस्टचा हेतू हा फक्त आणि फक्त हेच सांगण्याचा होता की, मी केवळ माणुसकी हाच धर्म मानतो. अर्थात व्यक्त होताना बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल जे विधान माझ्याकडून गेलं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण ते कर्मचारी त्यांना दिलेलं काम करत होते. वैयक्तिक बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे. माझ्या विधानामुळे ते दुखावले गेले असतील तर पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो,” असं पुष्करने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.


Comments
Add Comment

Devendra fadanvis : मुंबईत आता 'AI' करणार प्रदूषणाचे मॉनिटरिंग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : मुंबईतील वाढते वायू प्रदूषण आणि बांधकामाच्या ठिकाणी पायदळी तुडवले जाणारे नियम यावर आज विधान परिषदेत

मुंबईहून मिरा भाईंदर ते वसई-विरार दरम्यानचा प्रवास होणार सुसाट

मुंबई: मुंबई शहरातून बरीच लोक अनेक उपनगरात कामानिमित्ताने जात असतात. ज्यात मुंबई ते पालघर जाणाऱ्यांची संख्याही

मुंबई महापालिकेच्या शिक्षणविभागाच्या अर्थसंकल्पाचा आकार ४२४८ कोटींचा; शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांना सादर केला अर्थसंकल्प

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा स्वतंत्र अर्थसंकल्प बुधवारी सकाळी शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८० हजार कोटी?

मुंबई: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिका चा सन २०२६-२७ या आर्थिक

महापालिका सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानिमित्त महापालिका सभागृहात शोक प्रस्तावाद्वारे

Drink and Drive New Rules Maharashtra: दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर...; परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील महामार्गांवर होणारे अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाने आता कंबर कसली आहे. विशेषतः समृद्धी