या कारणामुळे शरीरात बनतो कफ, करा हे उपाय मिळेल कफापासून सुटका

मुंबई: थंडीच्या दिवसात सर्दी-खोकल्याने सारेजण हैरण होतात. या मोसमात शरीरात मोठ्या प्रमाणात कफ जमा होतो. काही लोकांना तर या संपूर्ण हंगामादरम्यान सर्दीखोकल्याचा त्रास होत असते. अशातच तुम्हाला माहीत असणे गरजेचे असते की शरीरात कफ बनण्याचे काय कारण आहे.



शरीरामध्ये कफ का तयार होतो?


कफ एक पातळ चिकट द्रव्य पदार्थ आहे जे तुमच्या श्वासनलिकेची सफाई करण्यात महत्त्वाची भूमिका निभावतो. मात्र जर हा कफ वाढला तर तुमच्यासाठी बऱ्याच समस्या निर्माण करतो. घश्यात खवखव, सातत्याने खोकला, यामुळे उलटी होणे हे कफ वाढल्यामुळे होऊ शकते. शरीरात कफ वाढल्याने श्वासनलिकेला सूज, अॅल्रजी, घश्यात अथवा फुफ्फुसांमध्ये जळजळ, फुफ्फुसांचा कॅन्सर, सिस्टीक फायब्रोसिस, ब्रोन्कायटिससारखे आजार निर्माण होऊ शकतात.



काय आहेत कफ कमी करण्याचे उपाय


खूप पाणी प्या


डिहायड्रेशनमुळे कफ वाढतो. यामुळे जितके शक्य असेल तितके पाणी प्या. तसेच मुलांनाही भरपूर पाणी द्या. दिवसभर स्वत:ला हायड्रेट ठेवा. पाणी प्यायल्याने कफ मोकळा होण्यास मदत होते तसेच आरामात बाहेर निघतो. श्वास नलिकेत कफ जमा झाल्यास तो पाणी प्यायल्याने बाहेर निघण्यास मदत होते.



घरात रूम हीटरचा वापर नका करू


कोरड्या हवेमुळेही शरीरात कफ वाढू लागको. स्टीम शॉवरच्या माध्यमातून कफ बाहेर काढण्याचा प्रयत्न करा.



मिठाच्या पाण्याने गुळण्या करा


घश्यात खवखव अथवा कफ जमा झाल्याने कोमट पाण्यात मीठ मिसळून गुळण्या करा. यामुळे घश्याची सूज कमी होईल.

Comments
Add Comment

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे

तोंड येण्याची समस्या का होते? कारणे आणि घरगुती उपाय

मुंबई : तोंड येणे म्हणजे तोंडात किंवा जिभेवर येणारे छोटेसे पण वेदनादायक फोड. ही एक सामान्य समस्या असली, तरी