या कारणामुळे शरीरात बनतो कफ, करा हे उपाय मिळेल कफापासून सुटका

  134

मुंबई: थंडीच्या दिवसात सर्दी-खोकल्याने सारेजण हैरण होतात. या मोसमात शरीरात मोठ्या प्रमाणात कफ जमा होतो. काही लोकांना तर या संपूर्ण हंगामादरम्यान सर्दीखोकल्याचा त्रास होत असते. अशातच तुम्हाला माहीत असणे गरजेचे असते की शरीरात कफ बनण्याचे काय कारण आहे.



शरीरामध्ये कफ का तयार होतो?


कफ एक पातळ चिकट द्रव्य पदार्थ आहे जे तुमच्या श्वासनलिकेची सफाई करण्यात महत्त्वाची भूमिका निभावतो. मात्र जर हा कफ वाढला तर तुमच्यासाठी बऱ्याच समस्या निर्माण करतो. घश्यात खवखव, सातत्याने खोकला, यामुळे उलटी होणे हे कफ वाढल्यामुळे होऊ शकते. शरीरात कफ वाढल्याने श्वासनलिकेला सूज, अॅल्रजी, घश्यात अथवा फुफ्फुसांमध्ये जळजळ, फुफ्फुसांचा कॅन्सर, सिस्टीक फायब्रोसिस, ब्रोन्कायटिससारखे आजार निर्माण होऊ शकतात.



काय आहेत कफ कमी करण्याचे उपाय


खूप पाणी प्या


डिहायड्रेशनमुळे कफ वाढतो. यामुळे जितके शक्य असेल तितके पाणी प्या. तसेच मुलांनाही भरपूर पाणी द्या. दिवसभर स्वत:ला हायड्रेट ठेवा. पाणी प्यायल्याने कफ मोकळा होण्यास मदत होते तसेच आरामात बाहेर निघतो. श्वास नलिकेत कफ जमा झाल्यास तो पाणी प्यायल्याने बाहेर निघण्यास मदत होते.



घरात रूम हीटरचा वापर नका करू


कोरड्या हवेमुळेही शरीरात कफ वाढू लागको. स्टीम शॉवरच्या माध्यमातून कफ बाहेर काढण्याचा प्रयत्न करा.



मिठाच्या पाण्याने गुळण्या करा


घश्यात खवखव अथवा कफ जमा झाल्याने कोमट पाण्यात मीठ मिसळून गुळण्या करा. यामुळे घश्याची सूज कमी होईल.

Comments
Add Comment

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर

आयोडीन युक्त मिठाचा वापर करा, आरोग्य विभागाचे आवाहन

मुंबई: जागतिक थायरॉईड दिवस दरवर्षी २५ मे रोजी साजरा केला जातो, ज्याचा उद्देश थायरॉईड रोगांबद्दल जागरूकता वाढवणे