हृदयविकाराचा झटका आल्याने बस ड्रायव्हरचा मृत्यू, मात्र हुशारीने वाचवला प्रवाशांचा जीव

बालेश्वर: ओडिशाच्या बालेश्वर जिल्ह्यात मंगळवारी एक घटना समोर आली. यात एक बस चालवत असलेल्या ड्रायव्हरला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. मात्र थोडेआधीच त्याला हे समजल्याने आपल्या सावधगिरीने त्याने प्रवाशांचा जीव वाचवला. आपल्या मृत्यूआधी त्याने बसला थांबवले. यामुळे ड्रायव्हरने बसमध्ये बसलेल्या ६०हून अधिक प्रवाशांचा जीव वाचवला. या घटनेची माहिती पोलिसांनी दिली.


पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बालेश्वर जिल्ह्यातील पातापूर छकमध्ये घडली. प्राथमिक तपासाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की पश्चिम बंगाल येथून पर्यटकांना घेऊन ही बस बालेश्वर जिल्ह्यातील पंचलिंगेश्वर मंदिरात जात होती. यातच बसच्या ड्रायव्हरला अचानक हृदयविकाराचा झटका झाला. यात त्याची तब्येत बिघडल्याने त्याचा मृत्यू झाला.


या घटनेबाबत अधिक सांगितले की जसे ड्रायव्हरला थोडे दुखणे सुरू झाले तसे त्या व्यक्ती बस रस्त्याच्या बाजूला उभी केली. त्यानंतर काही वेळातच तो बेशुद्ध झाला. शेख अख्तर असे या मृत ड्रायव्हरचे नाव आहे.


पोलिसांच्या माहितीनुसार बस ड्रायव्हर शेख अख्तर अचानक बेशुद्ध झाल्याने घाबरलेल्या प्रवाशांनी स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली.यानंतर या ड्रायव्हरला जवळच्या नीलगिरी उपसंभागीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासले असता मृत घोषित करण्यात आले.


याबाबत बसमधील प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, बस ड्रायव्हरची तब्येत बस चालवता चालवता अचानक बिघडली. त्याने बस एका बाजूला लावली. त्यानंतर लगेचच हा ड्रायव्हर बेशुद्ध झाला. यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्याला आधीच मृत घोषित करण्यात आले.

Comments
Add Comment

Shreyansh Patel : बुद्धीबळाच्या पटावर अडीच वर्षांच्या चिमुरड्याची 'शह-मात'! श्रेयांश पटेलने रचला विश्वविक्रम

हैदराबाद : बुद्धीबळ म्हणजे संयम आणि तल्लख बुद्धिमत्तेचा खेळ. जिथे मोठ्यांनाही विचार करावा लागतो, तिथे एका अवघ्या

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे

Amaravati Capital : 'अमरावती' आता आंध्र प्रदेशची 'कायमस्वरूपी' राजधानी; केंद्राचे गॅझेट नोटिफिकेशन जारी!

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) राजधानीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर केंद्र सरकारने