हृदयविकाराचा झटका आल्याने बस ड्रायव्हरचा मृत्यू, मात्र हुशारीने वाचवला प्रवाशांचा जीव

बालेश्वर: ओडिशाच्या बालेश्वर जिल्ह्यात मंगळवारी एक घटना समोर आली. यात एक बस चालवत असलेल्या ड्रायव्हरला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. मात्र थोडेआधीच त्याला हे समजल्याने आपल्या सावधगिरीने त्याने प्रवाशांचा जीव वाचवला. आपल्या मृत्यूआधी त्याने बसला थांबवले. यामुळे ड्रायव्हरने बसमध्ये बसलेल्या ६०हून अधिक प्रवाशांचा जीव वाचवला. या घटनेची माहिती पोलिसांनी दिली.


पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बालेश्वर जिल्ह्यातील पातापूर छकमध्ये घडली. प्राथमिक तपासाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की पश्चिम बंगाल येथून पर्यटकांना घेऊन ही बस बालेश्वर जिल्ह्यातील पंचलिंगेश्वर मंदिरात जात होती. यातच बसच्या ड्रायव्हरला अचानक हृदयविकाराचा झटका झाला. यात त्याची तब्येत बिघडल्याने त्याचा मृत्यू झाला.


या घटनेबाबत अधिक सांगितले की जसे ड्रायव्हरला थोडे दुखणे सुरू झाले तसे त्या व्यक्ती बस रस्त्याच्या बाजूला उभी केली. त्यानंतर काही वेळातच तो बेशुद्ध झाला. शेख अख्तर असे या मृत ड्रायव्हरचे नाव आहे.


पोलिसांच्या माहितीनुसार बस ड्रायव्हर शेख अख्तर अचानक बेशुद्ध झाल्याने घाबरलेल्या प्रवाशांनी स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली.यानंतर या ड्रायव्हरला जवळच्या नीलगिरी उपसंभागीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासले असता मृत घोषित करण्यात आले.


याबाबत बसमधील प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, बस ड्रायव्हरची तब्येत बस चालवता चालवता अचानक बिघडली. त्याने बस एका बाजूला लावली. त्यानंतर लगेचच हा ड्रायव्हर बेशुद्ध झाला. यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्याला आधीच मृत घोषित करण्यात आले.

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात