Nitish Kumar : बिहारमध्ये होणार सत्तापालट! भाजपकडून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार नितीश कुमार

  65

नव्या सरकारचा आजच पार पडणार शपथविधी


पाटणा : बिहारमध्ये राजकीय घडामोडींना (Bihar Politics) प्रचंड वेग आला आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीसाठी (India Alliance) पुढाकार घेतलेले नितीश कुमारच (Nitish Kumar) आता भाजपमध्ये (BJP) सामील होणार असल्याने इंडिया आघाडीचे भवितव्य धोक्यात आले आहे. बिहारमध्ये आरजेडी (RJD) आणि जेडीयू (JDU) या पक्षाचे एकत्रित सरकार होते. मात्र नितीशकुमारांनी या महाआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आरजेडीकडून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्तही केला आणि आजच ते भाजपकडून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे बिहारमध्ये सत्तापालट होणार असून इंडिया आघाडी अडचणीत सापडली आहे.


नितीशकुमारांसोबत भाजपचे आणखी दोन नेते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. सुशील मोदी आणि रेणू देवी हे भाजपचे दोन नेते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. यानंतर राज्यात भाजप व जेडीयूचे सरकार स्थापन होईल. महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये सत्ता पालटली असून राज्य सरकारची समीकरणं पुन्हा बदलली आहेत. तसेच आता नितीश कुमार हे ९ व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.


राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यांनी यावेळी म्हटलं की, 'महाआघाडीमध्ये परिस्थिती योग्य नव्हती. बरीच कामं राज्यात होत नव्हती. त्यामुळे आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसेच आता आम्ही इंडिया आघाडीमधून बाहेर पडणार आहोत'. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बिहारचे प्रभारी विनोद तावडे देखील पोहचले होते. आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा हे देखील बिहारमध्ये पोहचणार असल्याची माहिती समोर आली आहे.





नितीशकुमारांच्या पक्षाची पुनर्रचना


नितीशकुमार यांनी एनडीएसोबत (NDA) जाण्यातील सर्व अडथळे दूर केले आहेत. जेडीयूची पुनर्रचना करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्षांपासून ते नवी कार्यकारिणी तयार झाली आहे. विशेष म्हणजे राजीव रंजन उर्फ ​​लालन सिंह यांची राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हकालपट्टी केल्यानंतर आता त्यांची गठित कार्यकारिणी बरखास्त करून नवी समिती स्थापन करण्यात आली आहे. वशिष्ठ नारायण सिंह यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात एक प्रवासी ट्रेन रुळावरून घसरली, त्यानंतर काही काळ गोंधळ

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.

Kolkata Rape Case : लॉ विद्यार्थिनीवर बलात्कारप्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिस कोठडी, ममता सरकार निशाण्यावर

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकार संचालित दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजशी संबंधित सामूहिक बलात्काराचा एक

MP News : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील १९ इनोव्हामध्ये भरले २० लीटर डिझेल, मात्र निघालं १० लीटर पाणीच पाणी

डिझेल भरायला गेल्या अन् पाणी भरून आल्या... मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

JeM Terrorist Killed: उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या ३ दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू, एक ठार

उधमपूर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील एका दुर्गम जंगली भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक