Nitish Kumar : बिहारमध्ये होणार सत्तापालट! भाजपकडून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार नितीश कुमार

नव्या सरकारचा आजच पार पडणार शपथविधी


पाटणा : बिहारमध्ये राजकीय घडामोडींना (Bihar Politics) प्रचंड वेग आला आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीसाठी (India Alliance) पुढाकार घेतलेले नितीश कुमारच (Nitish Kumar) आता भाजपमध्ये (BJP) सामील होणार असल्याने इंडिया आघाडीचे भवितव्य धोक्यात आले आहे. बिहारमध्ये आरजेडी (RJD) आणि जेडीयू (JDU) या पक्षाचे एकत्रित सरकार होते. मात्र नितीशकुमारांनी या महाआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आरजेडीकडून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्तही केला आणि आजच ते भाजपकडून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे बिहारमध्ये सत्तापालट होणार असून इंडिया आघाडी अडचणीत सापडली आहे.


नितीशकुमारांसोबत भाजपचे आणखी दोन नेते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. सुशील मोदी आणि रेणू देवी हे भाजपचे दोन नेते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. यानंतर राज्यात भाजप व जेडीयूचे सरकार स्थापन होईल. महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये सत्ता पालटली असून राज्य सरकारची समीकरणं पुन्हा बदलली आहेत. तसेच आता नितीश कुमार हे ९ व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.


राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यांनी यावेळी म्हटलं की, 'महाआघाडीमध्ये परिस्थिती योग्य नव्हती. बरीच कामं राज्यात होत नव्हती. त्यामुळे आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसेच आता आम्ही इंडिया आघाडीमधून बाहेर पडणार आहोत'. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बिहारचे प्रभारी विनोद तावडे देखील पोहचले होते. आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा हे देखील बिहारमध्ये पोहचणार असल्याची माहिती समोर आली आहे.





नितीशकुमारांच्या पक्षाची पुनर्रचना


नितीशकुमार यांनी एनडीएसोबत (NDA) जाण्यातील सर्व अडथळे दूर केले आहेत. जेडीयूची पुनर्रचना करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्षांपासून ते नवी कार्यकारिणी तयार झाली आहे. विशेष म्हणजे राजीव रंजन उर्फ ​​लालन सिंह यांची राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हकालपट्टी केल्यानंतर आता त्यांची गठित कार्यकारिणी बरखास्त करून नवी समिती स्थापन करण्यात आली आहे. वशिष्ठ नारायण सिंह यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Meghalaya Coal Mine Blast : मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट, १८ जणांचा बळी, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

शिलाँग : मेघालयातील जयंतिया हिल्स जिल्ह्यातील थांगस्कू परिसरात एका अवैध कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटाने

UPSC 2026 New Rules: यूपीएससी परीक्षेच्या नियमात महत्वाचे बदल; वाचा संपूर्ण माहिती

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) ४ फेब्रुवारी रोजी नागरी सेवा परीक्षा (CSE) आणि भारतीय वन सेवा (IFS) परीक्षा २०२६ साठी

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत