Nitish Kumar : बिहारमध्ये होणार सत्तापालट! भाजपकडून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार नितीश कुमार

  61

नव्या सरकारचा आजच पार पडणार शपथविधी


पाटणा : बिहारमध्ये राजकीय घडामोडींना (Bihar Politics) प्रचंड वेग आला आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीसाठी (India Alliance) पुढाकार घेतलेले नितीश कुमारच (Nitish Kumar) आता भाजपमध्ये (BJP) सामील होणार असल्याने इंडिया आघाडीचे भवितव्य धोक्यात आले आहे. बिहारमध्ये आरजेडी (RJD) आणि जेडीयू (JDU) या पक्षाचे एकत्रित सरकार होते. मात्र नितीशकुमारांनी या महाआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आरजेडीकडून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्तही केला आणि आजच ते भाजपकडून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे बिहारमध्ये सत्तापालट होणार असून इंडिया आघाडी अडचणीत सापडली आहे.


नितीशकुमारांसोबत भाजपचे आणखी दोन नेते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. सुशील मोदी आणि रेणू देवी हे भाजपचे दोन नेते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. यानंतर राज्यात भाजप व जेडीयूचे सरकार स्थापन होईल. महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये सत्ता पालटली असून राज्य सरकारची समीकरणं पुन्हा बदलली आहेत. तसेच आता नितीश कुमार हे ९ व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.


राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यांनी यावेळी म्हटलं की, 'महाआघाडीमध्ये परिस्थिती योग्य नव्हती. बरीच कामं राज्यात होत नव्हती. त्यामुळे आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसेच आता आम्ही इंडिया आघाडीमधून बाहेर पडणार आहोत'. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बिहारचे प्रभारी विनोद तावडे देखील पोहचले होते. आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा हे देखील बिहारमध्ये पोहचणार असल्याची माहिती समोर आली आहे.





नितीशकुमारांच्या पक्षाची पुनर्रचना


नितीशकुमार यांनी एनडीएसोबत (NDA) जाण्यातील सर्व अडथळे दूर केले आहेत. जेडीयूची पुनर्रचना करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्षांपासून ते नवी कार्यकारिणी तयार झाली आहे. विशेष म्हणजे राजीव रंजन उर्फ ​​लालन सिंह यांची राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हकालपट्टी केल्यानंतर आता त्यांची गठित कार्यकारिणी बरखास्त करून नवी समिती स्थापन करण्यात आली आहे. वशिष्ठ नारायण सिंह यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

चिनाब रेल्वे पूल आयफेल टॉवरपेक्षा उंच!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन काश्मिर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

नीट पीजी परीक्षा ३ ऑगस्टला

नवी दिल्ली : पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेशपूर्व परीक्षा अर्थात नीट पीजी परीक्षेची

Elon Musk च्या स्टारलिंकला भारत सरकारची मंजुरी

नवी दिल्ली : Elon Musk च्या स्टारलिंक कंपनीला सॅटेलाइटच्या मदतीने इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारने मंजुरी दिली

ICICI Bank : अविश्वसनीय! ICICI बँकेत ४.५८ कोटींची फसवणूक, महिला मॅनेजरला अटक

जयपूर : बँकेत आपले पैसे सुरक्षित आहेत असं प्रत्येक ग्राहकाला वाटत असतं. पण, एका धक्कादायक प्रकरणात, राजस्थानच्या

जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावर तिरंगा

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केले. चिनाब रेल्वे पूल हा जगातील

पर्वत आणि बोगद्यांमधील अभियांत्रिकीचा चमत्कार, चिनाब पुलामध्ये काय आहे खास पाहा

श्रीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच चिनाब पूल देशाला समर्पित केला. यासोबतच दोन वंदे भारत