Kalkaji Mandir : कालकाजी मंदिरात जागरणादरम्यान कोसळला स्टेज; एका महिलेचा मृत्यू तर १७ जखमी

पोलीस म्हणतात, या कार्यक्रमाला परवानगी नव्हती...


नवी दिल्ली : दिल्लीच्या कालकाजी मंदिरात (Kalkaji Mandir) जागरण सुरू असतानाच अचानक स्टेज कोसळला. यामुळे पळापळी झाल्याने चेंगराचेंगरीत (Stampede) सुमारे १७ जण जखमी झाले आणि एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी आयोजकांविरुद्ध एफआयआर (FIR) नोंदवून तपास सुरू केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जानेवारी रोजी कालकाजी मंदिरात माता का जागरणाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी रात्री साडेबाराच्या सुमारास १५०० ते १६००० लोकांची गर्दी जमली होती. या गर्दीचे मुख्य कारण म्हणजे जागरणमध्ये प्रसिद्ध बॉलिवूड गायक बी प्राक (B Praak) पोहोचला होता, त्याला पाहण्यासाठी सगळे जमले होते. या दरम्यान, जमाव आयोजक व्हीआयपींच्या कुटुंबीयांसाठी बनवलेल्या स्टेजवर चढला आणि स्टेज खाली कोसळला आणि मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाली.


या अपघातात स्टेजखाली बसलेले १७ जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर, जखमी झालेल्या ४५ वर्षीय महिलेला ऑटोमधून मॅक्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अद्याप महिलेची ओळख पटलेली नाही.





कार्यक्रमाच्या आयोजनाला परवानगी नव्हती : पोलीस


हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नव्हती, असेही पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी आयोजकांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३३७/३०४ अ/१८८ अन्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे