Kalkaji Mandir : कालकाजी मंदिरात जागरणादरम्यान कोसळला स्टेज; एका महिलेचा मृत्यू तर १७ जखमी

पोलीस म्हणतात, या कार्यक्रमाला परवानगी नव्हती...


नवी दिल्ली : दिल्लीच्या कालकाजी मंदिरात (Kalkaji Mandir) जागरण सुरू असतानाच अचानक स्टेज कोसळला. यामुळे पळापळी झाल्याने चेंगराचेंगरीत (Stampede) सुमारे १७ जण जखमी झाले आणि एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी आयोजकांविरुद्ध एफआयआर (FIR) नोंदवून तपास सुरू केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जानेवारी रोजी कालकाजी मंदिरात माता का जागरणाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी रात्री साडेबाराच्या सुमारास १५०० ते १६००० लोकांची गर्दी जमली होती. या गर्दीचे मुख्य कारण म्हणजे जागरणमध्ये प्रसिद्ध बॉलिवूड गायक बी प्राक (B Praak) पोहोचला होता, त्याला पाहण्यासाठी सगळे जमले होते. या दरम्यान, जमाव आयोजक व्हीआयपींच्या कुटुंबीयांसाठी बनवलेल्या स्टेजवर चढला आणि स्टेज खाली कोसळला आणि मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाली.


या अपघातात स्टेजखाली बसलेले १७ जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर, जखमी झालेल्या ४५ वर्षीय महिलेला ऑटोमधून मॅक्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अद्याप महिलेची ओळख पटलेली नाही.





कार्यक्रमाच्या आयोजनाला परवानगी नव्हती : पोलीस


हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नव्हती, असेही पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी आयोजकांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३३७/३०४ अ/१८८ अन्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला