नवी दिल्ली: नितीश कुमार(nitish kumar) आज बिहारचे(bihar) मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांना ९व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जदयूच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आजच महागठबंधनमधून बाहेर होण्याची घोषणा करत एनडीएमध्ये सहभागाची घोषणा केली. नितीश कुमार यांच्यासह ८ मंत्र्यांनीही शपथ घेतली. यात सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
या दोघांशिवाय भाजपकडून डॉ. प्रेम कुमार, जदयूमधून विजय कुमार चौधरी, श्रवण कुमार, विजेंद्र यादव, हममधून संतोष कुमार सुमन आणि अपक्ष सुमित कुमार सिंह यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.
बिहारच्या मुंगेर येथील सम्राट चौधरी याआधीही बिहार सरकारमध्ये मंत्री राहिलेले आहेत. सम्राट हे राबडी देवी यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले आहेत. ते राजकीय कुटुंबातून येतात. त्यांचे वडील शकुनी चौधरी सात वेळा खासदार होते. तर आई पार्वती देवीही खासदार होत्या. दरम्यान, सहा वर्षांपूर्वी त्यांनी भाजप पक्षात प्रवेश घेतला आणि गेल्या वर्षी मार्चमध्ये भाजपने त्यांना प्रदेश अध्यक्ष बनवले.
विजय कुमार सिन्हा यांच्याबाबत बोलायचे झाल्यास जे भाजप-जदयूच्या पूर्वीच्या सरकारमध्ये श्रम मंत्री होते. ते २०१० पासून लखीसराय विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. २०२० ते २०२२ दरम्यान विधानसभेचे अध्यक्ष राहिले होते.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…