Bihar : नितीश कुमार ९व्यांदा बनले बिहारचे मुख्यमंत्री, या ८ मंत्र्यांनी घेतली शपथ

नवी दिल्ली: नितीश कुमार(nitish kumar) आज बिहारचे(bihar) मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांना ९व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जदयूच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आजच महागठबंधनमधून बाहेर होण्याची घोषणा करत एनडीएमध्ये सहभागाची घोषणा केली. नितीश कुमार यांच्यासह ८ मंत्र्यांनीही शपथ घेतली. यात सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.


या दोघांशिवाय भाजपकडून डॉ. प्रेम कुमार, जदयूमधून विजय कुमार चौधरी, श्रवण कुमार, विजेंद्र यादव, हममधून संतोष कुमार सुमन आणि अपक्ष सुमित कुमार सिंह यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.



राबडी सरकारमध्ये मंत्री राहिलेले आहेत सम्राट चौधरी


बिहारच्या मुंगेर येथील सम्राट चौधरी याआधीही बिहार सरकारमध्ये मंत्री राहिलेले आहेत. सम्राट हे राबडी देवी यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले आहेत. ते राजकीय कुटुंबातून येतात. त्यांचे वडील शकुनी चौधरी सात वेळा खासदार होते. तर आई पार्वती देवीही खासदार होत्या. दरम्यान, सहा वर्षांपूर्वी त्यांनी भाजप पक्षात प्रवेश घेतला आणि गेल्या वर्षी मार्चमध्ये भाजपने त्यांना प्रदेश अध्यक्ष बनवले.



विधानसभेत अध्यक्ष राहिलेत विजय सिन्हा


विजय कुमार सिन्हा यांच्याबाबत बोलायचे झाल्यास जे भाजप-जदयूच्या पूर्वीच्या सरकारमध्ये श्रम मंत्री होते. ते २०१० पासून लखीसराय विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. २०२० ते २०२२ दरम्यान विधानसभेचे अध्यक्ष राहिले होते.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च