Bihar : नितीश कुमार ९व्यांदा बनले बिहारचे मुख्यमंत्री, या ८ मंत्र्यांनी घेतली शपथ

नवी दिल्ली: नितीश कुमार(nitish kumar) आज बिहारचे(bihar) मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांना ९व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जदयूच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आजच महागठबंधनमधून बाहेर होण्याची घोषणा करत एनडीएमध्ये सहभागाची घोषणा केली. नितीश कुमार यांच्यासह ८ मंत्र्यांनीही शपथ घेतली. यात सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.


या दोघांशिवाय भाजपकडून डॉ. प्रेम कुमार, जदयूमधून विजय कुमार चौधरी, श्रवण कुमार, विजेंद्र यादव, हममधून संतोष कुमार सुमन आणि अपक्ष सुमित कुमार सिंह यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.



राबडी सरकारमध्ये मंत्री राहिलेले आहेत सम्राट चौधरी


बिहारच्या मुंगेर येथील सम्राट चौधरी याआधीही बिहार सरकारमध्ये मंत्री राहिलेले आहेत. सम्राट हे राबडी देवी यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले आहेत. ते राजकीय कुटुंबातून येतात. त्यांचे वडील शकुनी चौधरी सात वेळा खासदार होते. तर आई पार्वती देवीही खासदार होत्या. दरम्यान, सहा वर्षांपूर्वी त्यांनी भाजप पक्षात प्रवेश घेतला आणि गेल्या वर्षी मार्चमध्ये भाजपने त्यांना प्रदेश अध्यक्ष बनवले.



विधानसभेत अध्यक्ष राहिलेत विजय सिन्हा


विजय कुमार सिन्हा यांच्याबाबत बोलायचे झाल्यास जे भाजप-जदयूच्या पूर्वीच्या सरकारमध्ये श्रम मंत्री होते. ते २०१० पासून लखीसराय विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. २०२० ते २०२२ दरम्यान विधानसभेचे अध्यक्ष राहिले होते.

Comments
Add Comment

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था