Bihar : नितीश कुमार ९व्यांदा बनले बिहारचे मुख्यमंत्री, या ८ मंत्र्यांनी घेतली शपथ

  103

नवी दिल्ली: नितीश कुमार(nitish kumar) आज बिहारचे(bihar) मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांना ९व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जदयूच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आजच महागठबंधनमधून बाहेर होण्याची घोषणा करत एनडीएमध्ये सहभागाची घोषणा केली. नितीश कुमार यांच्यासह ८ मंत्र्यांनीही शपथ घेतली. यात सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.


या दोघांशिवाय भाजपकडून डॉ. प्रेम कुमार, जदयूमधून विजय कुमार चौधरी, श्रवण कुमार, विजेंद्र यादव, हममधून संतोष कुमार सुमन आणि अपक्ष सुमित कुमार सिंह यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.



राबडी सरकारमध्ये मंत्री राहिलेले आहेत सम्राट चौधरी


बिहारच्या मुंगेर येथील सम्राट चौधरी याआधीही बिहार सरकारमध्ये मंत्री राहिलेले आहेत. सम्राट हे राबडी देवी यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले आहेत. ते राजकीय कुटुंबातून येतात. त्यांचे वडील शकुनी चौधरी सात वेळा खासदार होते. तर आई पार्वती देवीही खासदार होत्या. दरम्यान, सहा वर्षांपूर्वी त्यांनी भाजप पक्षात प्रवेश घेतला आणि गेल्या वर्षी मार्चमध्ये भाजपने त्यांना प्रदेश अध्यक्ष बनवले.



विधानसभेत अध्यक्ष राहिलेत विजय सिन्हा


विजय कुमार सिन्हा यांच्याबाबत बोलायचे झाल्यास जे भाजप-जदयूच्या पूर्वीच्या सरकारमध्ये श्रम मंत्री होते. ते २०१० पासून लखीसराय विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. २०२० ते २०२२ दरम्यान विधानसभेचे अध्यक्ष राहिले होते.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )