AUS vs WI:वेस्ट इंडिजने कांगारूंना त्यांच्याच भूमीत धुतले, २७ वर्षांनी केली ही कमाल

मुंबई: वेस्ट इंडिजने इतिहासाची पुनरावृत्ती करताना ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात घरात २७ वर्षांनी कसोटीत मात दिली. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळवण्यात आलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना ब्रिस्बेनच्या द गाबामध्ये खेळवण्यात आला. वेस्ट इंडिजने सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाला ८ धावांनी हरवले. वेस्ट इंडिजकडून या मालिकेत पदार्पण करणाऱ्या शमर जोसेफने शेवटचा विकेट घेत संघाला विजय मिळवून दिला.


सामन्यातील चौथा आणि आपल्या दुसऱ्या डावात ९ विकेट गमावलेल्या ऑस्ट्रेलियाला १ विकेट शिल्लक असताना विजयासाठी ९ धावांची आवश्यकता होती. मात्र वेस्ट इंडिजचा गोलंदाज शमर जोसेफने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवू दिला नाही. फलंदाजी करत असलेल्या जोश हेझलवूडला जोसेफने बोल्ड करत आपल्या संघाच्या खात्यात विजय टाकला.



२१६ धावांचे आव्हान पेलू शकली नाही ऑस्ट्रेलिया


वेस्ट इंडिजला आपल्या दुसऱ्या डावात १९३ धावा करता आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियासमोर २१६ धावांचे आव्हान ठेवले होते. दुसऱ्या डावादरम्यान फलंदाजी करताना शमर जोसेफच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. यानंतर तो रिटायर बाद झाला होता आणि पाहुण्या वेस्ट इंडिजचा डाव संपुष्टात आला होता.


त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उथरलेल्या ऑस्ट्रेलियाला वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी २०१७ धावांवर बाद केले. या दरम्यान संघाचा सलामीवीर स्टीव्ह स्मिथने ९ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने नाबाद ९१ धावांची खेळी केली. तर कॅमेरून ग्रीनने ४ चौकार लगावत ४२ धावा केल्या. याशिवाय ऑस्ट्रेलियाचे इतर फलंदाज अयशस्वी ठरले.


Comments
Add Comment

क्रिकेटच्या १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, मुंबईकर आयुष म्हात्रेकडे नेतृत्व

मुंबई : बीसीसीआयच्या निवड समितीने १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकासाठी तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात कोण कितव्या स्थानी ?

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या, न्यूझीलंड दुसऱ्या, दक्षिण आफ्रिका

ऑस्ट्रेलियात इंग्लंडचा विजय, मेलबर्न कसोटी दोन दिवसांत संपली

मेलबर्न : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या 'ॲशेस' मालिकेतील 'बॉक्सिंग डे' कसोटी

बीसीसीआयकडून धोनीला दरमहा ७० हजार रुपये पेन्शन

मुंबई : १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतरही धोनीची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही.

वैभव सूर्यवंशीचा टी-२० विश्वचषक संघात समावेश होणार?

भारताचा माजी कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची मागणी मुंबई : माजी भारतीय कर्णधार आणि राष्ट्रीय निवड समितीचे

पहिल्याच दिवशी मेलबर्नमध्ये ७५ षटकांत २० बळी

चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला ४२ धावांची आघाडी नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ॲशेस