थंडीत रोज पालक खाल्ल्यास होतील हे अनेक फायदे

मुंबई: थंडीच्या दिवसात बाजारात मोठ्या प्रमाणात भाज्या येतात. पालकाची भाजीही बाजारात मोठ्या प्रमाणात दिसते. तुम्हीही थंडीच्या दिवसात पालक मोठ्या प्रमाणात खाता का?


प्रोटीन, फायबर आणि कार्बोहायड्रेटने भरपूर पालकाचे सेवन थंडीच्या दिवसांत केले जाते. पालकाला सुपरफूडही म्हटले जाते. यात व्हिटामिन सी, आर्यन आणि कॅल्शियमसारखी पोषकतत्वे मोठ्या प्रमाणात असतात.


थंडीच्या दिवसांत दररोज पालक खाल्ल्याने शरीरास अनेक फायदे होतात. पालक हे व्हिटामिन आणि मिनरल्ससह अनेक पोषकतत्वांचे भंडार आहे जे शरीराला हेल्दी बनवतात.


पालकामध्ये अँटी ऑक्सिडंट गुण मोठ्या प्रमाणात आढळतात. अँटी ऑक्सिडंटमुळे आपल्या शरीराच्या पेशींना होणारे नुकसान यापासून बचाव होतो.


पालक व्हिटामिनशिवाय कॅल्शियमचाही चांगला स्त्रोत आहे. यामुळे हाडे मजबूत होतात. पालकामध्ये जॅक्सेन्थिन आणि ल्युटिन मोठ्या प्रमाणात असते जे डोळ्यांचा मोतीबिंदूपासून बचाव करता. तसेच डोळ्यांचे आरोग्य सुधारतात.


पालक पुरुषांमध्ये होणाऱ्या प्रोस्टेट कॅन्सरची शक्यता कमी करतात. याशिवाय ब्रेस्ट कॅन्सरपासूनही बचाव करतात. पालक हे लो कॅलरी आणि हाय फायबर फूड आहे. यामुळे भूक शांत होण्यासोबतच पाचन तंदुरुस्त राखण्यास मदत होते.

Comments
Add Comment

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल