थंडीत रोज पालक खाल्ल्यास होतील हे अनेक फायदे

मुंबई: थंडीच्या दिवसात बाजारात मोठ्या प्रमाणात भाज्या येतात. पालकाची भाजीही बाजारात मोठ्या प्रमाणात दिसते. तुम्हीही थंडीच्या दिवसात पालक मोठ्या प्रमाणात खाता का?


प्रोटीन, फायबर आणि कार्बोहायड्रेटने भरपूर पालकाचे सेवन थंडीच्या दिवसांत केले जाते. पालकाला सुपरफूडही म्हटले जाते. यात व्हिटामिन सी, आर्यन आणि कॅल्शियमसारखी पोषकतत्वे मोठ्या प्रमाणात असतात.


थंडीच्या दिवसांत दररोज पालक खाल्ल्याने शरीरास अनेक फायदे होतात. पालक हे व्हिटामिन आणि मिनरल्ससह अनेक पोषकतत्वांचे भंडार आहे जे शरीराला हेल्दी बनवतात.


पालकामध्ये अँटी ऑक्सिडंट गुण मोठ्या प्रमाणात आढळतात. अँटी ऑक्सिडंटमुळे आपल्या शरीराच्या पेशींना होणारे नुकसान यापासून बचाव होतो.


पालक व्हिटामिनशिवाय कॅल्शियमचाही चांगला स्त्रोत आहे. यामुळे हाडे मजबूत होतात. पालकामध्ये जॅक्सेन्थिन आणि ल्युटिन मोठ्या प्रमाणात असते जे डोळ्यांचा मोतीबिंदूपासून बचाव करता. तसेच डोळ्यांचे आरोग्य सुधारतात.


पालक पुरुषांमध्ये होणाऱ्या प्रोस्टेट कॅन्सरची शक्यता कमी करतात. याशिवाय ब्रेस्ट कॅन्सरपासूनही बचाव करतात. पालक हे लो कॅलरी आणि हाय फायबर फूड आहे. यामुळे भूक शांत होण्यासोबतच पाचन तंदुरुस्त राखण्यास मदत होते.

Comments
Add Comment

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी योगाचा प्रभावी उपयोग: ही ५ योगासने ठरतील लाभदायक

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत चुकीच्या आहार आणि तणावमय दिनचर्येमुळे अनेक गंभीर आजारांनी डोके वर काढले आहे. त्यात

उत्तम आरोग्यासाठी पोटाकडे लक्ष द्या..

पोटाचे आरोग्य उत्तम असेल तर आपलं पूर्ण शरीर निरोगी राहतं. पोटाचं आरोग्य सांभाळण्यासाठी आतड्याचे स्वच्छ राहणे,

Hair Care: केस गळती थांबवण्यासाठी 'या' ५ बियांचे सेवन करा, नैसर्गिकरित्या केस वाढतील

मुंबई : आजकाल बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे केस गळण्याची समस्या खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत, केसांचे

योगाचे प्रकार

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके मागील लेखात पातंजल-योगाव्यतिरिक्त योगाच्या इतर प्रकारांपैकी हठयोगाविषयी माहिती

Health: सकाळी, दुपारी की रात्री? ड्रायफ्रुट्स खाण्याची योग्य वेळ कोणती, घ्या जाणून...

मुंबई: सुका मेवा (Dry fruits) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, परंतु तो कोणत्या वेळी खावा, हे जाणून घेणे महत्त्वाचे

उष्ण पदार्थांचे अति सेवन : उच्च रक्तदाब आणि त्वचेच्या समस्यांचे प्रमुख कारण !

मुंबई : आयुर्वेद हा भारतीय प्राचीन आरोग्यशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये शरीराच्या संतुलनावर विशेष