थंडीत रोज पालक खाल्ल्यास होतील हे अनेक फायदे

  100

मुंबई: थंडीच्या दिवसात बाजारात मोठ्या प्रमाणात भाज्या येतात. पालकाची भाजीही बाजारात मोठ्या प्रमाणात दिसते. तुम्हीही थंडीच्या दिवसात पालक मोठ्या प्रमाणात खाता का?


प्रोटीन, फायबर आणि कार्बोहायड्रेटने भरपूर पालकाचे सेवन थंडीच्या दिवसांत केले जाते. पालकाला सुपरफूडही म्हटले जाते. यात व्हिटामिन सी, आर्यन आणि कॅल्शियमसारखी पोषकतत्वे मोठ्या प्रमाणात असतात.


थंडीच्या दिवसांत दररोज पालक खाल्ल्याने शरीरास अनेक फायदे होतात. पालक हे व्हिटामिन आणि मिनरल्ससह अनेक पोषकतत्वांचे भंडार आहे जे शरीराला हेल्दी बनवतात.


पालकामध्ये अँटी ऑक्सिडंट गुण मोठ्या प्रमाणात आढळतात. अँटी ऑक्सिडंटमुळे आपल्या शरीराच्या पेशींना होणारे नुकसान यापासून बचाव होतो.


पालक व्हिटामिनशिवाय कॅल्शियमचाही चांगला स्त्रोत आहे. यामुळे हाडे मजबूत होतात. पालकामध्ये जॅक्सेन्थिन आणि ल्युटिन मोठ्या प्रमाणात असते जे डोळ्यांचा मोतीबिंदूपासून बचाव करता. तसेच डोळ्यांचे आरोग्य सुधारतात.


पालक पुरुषांमध्ये होणाऱ्या प्रोस्टेट कॅन्सरची शक्यता कमी करतात. याशिवाय ब्रेस्ट कॅन्सरपासूनही बचाव करतात. पालक हे लो कॅलरी आणि हाय फायबर फूड आहे. यामुळे भूक शांत होण्यासोबतच पाचन तंदुरुस्त राखण्यास मदत होते.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी