Maratha reservation: मागण्या अखेर पूर्ण, मनोज जरांंगेंनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोडले उपोषण

मुंबई: राज्यात मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या आंदोलनाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आपले उपोषण सोडले आहे.


राज्य सरकारकडून मागण्या मान्य होताच मराठा आंदोलकांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले जावे यासोबतच त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जावेत अशी मागणी मनोज जरांगे यांनी आपल्या आंदोलनातून केली होती.


हे आंदोलन आंतरवाली सराटी येथून सुरू करण्यात आले होते. सरकारकडे यासाठी वेळही मागण्यात आली होती. दोनदा वेळ वाढवून दिल्यावरही सरकारने कोणतेचे पाऊल उचलले नसल्याचे सांगत मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन वाशीत येऊन धडकले होते.


राज्य सरकारकडून मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे. आमचा विरोध संपला आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या आहे. आम्ही सरकारच्या पत्राचा स्वीकार करेन. मी शनिवारी म्हणजेच आज मुख्यमंत्र्याच्या हातून ज्यूस पिईन.


मंत्री दीपक केसरकर आणि मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वातील एक प्रातिनिधिक मंडळ मनोज जरांगे यांना रात्री उशिरा भेटण्यासाठी पोहोचले होते. मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्यांबाबत अध्यादेश काढण्यात आला. या अध्यादेशाची कॉपी मनोज जरांगे यांच्याकडे सोपवण्यात आली.
Comments
Add Comment

महाराष्ट्र सागरी मंडळाचे २६० कोटींचे सामंजस्य करार

हरित बंदर विकास विषयी डेन्मार्कच्या कंपनीसोबत मंत्री नितेश राणे यांची सविस्तर चर्चा मुंबई : नेस्को गोरेगाव

बोगस आधार कार्ड प्रकरणी आ. रोहित पवारांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बोगस आधार कार्ड तयार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी

मोबाईल ग्राहकवाढीत जिओ आघाडीवर; एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर

रायगड : महाराष्ट्रात मोबाईल ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत असून, सप्टेंबर महिन्यात रिलायन्स जिओने सर्वाधिक

मुंबईतील खासगी कोचिंग क्लासना लावणार चाप! तपासणीसाठी समिती गठित

मुंबई : मुंबई शहरात सुरू असलेल्या खासगी कोचिंग क्लासची तपासणी करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने सर्व संबधित

शिल्पा शेट्टीच्या आईची तब्येत अचानक बिघडली, लीलावती रुग्णालयात दाखल...

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईच्या लीलावती

मुंबईकरांचा प्रवास गारेगार , आजपासून २० वातानुकूलित बसमार्ग सुरू

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व