सफरचंद, संत्रे, केळे या सर्वांना मात देते हे छोटेसे फळ, वाचल्यावर आजच कराल खाण्यास सुरूवात

मुंबई: फळे आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाची आहेत हे आपण सारेच जाणतो. यासाठी तज्ञही सांगतात की कमीत कमी २ ते ३ फळांचे सेवन दररोज केले पाहिजे. मात्र बरेच जण काही ठराविक फळेच खातात जसे सफरचंद, संत्री अथवा केळी. मात्र आरोग्य तज्ञांच्या मते निळ्या रंगाचे हे छोटेसे फळ जगातील बेस्ट फ्रुटपैकी एक आहे. याला ब्लूबेरी असे म्हटले जाते.


ब्लूबेरी केवळ खाण्यासाठीच स्वादिष्ट नाही आहे तर हृदयाच्या आरोग्यापासून ते कँसर तसेच स्ट्रोकचा धोकाही कमी करतात. जाणून घेऊया ब्लू बेरीचे फायदे



अँटी ऑक्सिडंट भरपूर


ब्लू बेरीमध्ये अँटी ऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. खासकरून यात अँथोसायनिनसारखे फ्लॅवेनाईड्स असतात जे शरारीला हानिकारक फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात. हे अँटी ऑक्सिडंट्स पेशींना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचवतात. यामुळे कँन्सर तसेच हार्टच्या आजारांचा धोका कमी होतो.



हृदय अॅक्टिव्ह ठेवतात.


ब्लूबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट असल्याने त्यांच्या इन्फ्लामेंटरी गुणांसह सूज कमी करणे तसेच ब्लड फ्लोमध्ये सुधारण्याचे काम करत हेल्दी हार्ट बनवण्याचे काम करतात. ब्लू बेरीच्या नियमित सेवनाने ब्लड प्रेशर कमी करणे तसेच एलडीएल कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी कऱण्यास मदत होते.



चांगल्या पाचनासाठी फायदेशीर


ब्लू बेरी डाएटरी फायबरचा एक चांगला स्त्रोत आहे. जे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ देत नाही. तसेच पाचनसंस्थेला सुधारतो. याशिवाय पोटासंबंधीचे आजार दूर होण्यास मदत होते.


ब्लू बेरीमध्ये आढळणारे अँटी ऑक्सिडंट ल्यूटिन आणि जॅक्सेन्थिन वयाशी संबंधित डोळ्यांचे आरोग्य, मोतिबिंदूपासून बचाव तसेच डोळ्यांच्या आरोग्यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारतात.

Comments
Add Comment

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण