आरक्षण मिळेपर्यंत सरकारी नोकरभरती नको, गुन्हे मागे घ्या, मनोज जरांगेंची मागणी

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची मागणी घेऊन मनोज जरांगे यांचे आदोलन वाशीमध्ये पोहोचले आहे. येथे झालेल्या सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी वाशीमध्ये उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी सरकारकडे केलेल्या मागण्याची माहिती दिली.


जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न १०० टक्के निकाली निघत नाही तोपर्यंत सरकारने कोणत्याही प्रकारची सरकारी नोकरभरती करून नये अशी मागणी जरांगे यांनी सरकारकडे केली आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शिक्षण मोफत द्या. तसेच सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र काढण्याचा आदेश द्यावा. यासोबतच आंतरवाली सराटीसह राज्यातील इतर ठिकाणचे गुन्हे मागे घेतल्याचे आदेश काढावेत अशी मागणी जरांगे यांनी सरकराकडे केली आहे.


तसेच आरक्षण मान्य झाल्याशिवाय सरकारने कोणत्याही प्रकारची शासकीय भरती करू नये मात्र भरती करायची असल्यास जागा राखीव ठेवण्यात याव्या असेही जरांगे यांनी सरकारला सांगितले. तसेच या मागण्यांसाठी सरकारने सहमती दर्शवल्याची माहितीही यावेळी जरांगेंनी दिली.


आज संध्याकाळपर्यंत शासनाचा निर्णय अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. जर सरकारकडून अध्यादेश निघाला नाही तर आझाद मैदानाच्या दिशेने कूच करणार असल्याचे जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केले.



मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या


आंतरवाली तसेच राज्यातील इतर ठिकाणी मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगे यांनी सरकारकडे केली आहे. तसेच समाजाच्या शेवटच्या माणसाला आरक्षण मिळत नाही तोवर १०० टक्के शिक्षण मोफत केले जावे अशी मागणीही यावेळी जरांगे यांच्याकडून करण्यात आली.

Comments
Add Comment

गुजराती मतदार पोहोचले गावाला

मुंबई : मकरसंक्रांत अर्थात "उत्तरायण" हा गुजरात आणि राजस्थानमधील प्रमुख सण आहे. या काळात जवळपास जागोजागी भव्य

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या