आरक्षण मिळेपर्यंत सरकारी नोकरभरती नको, गुन्हे मागे घ्या, मनोज जरांगेंची मागणी

  80

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची मागणी घेऊन मनोज जरांगे यांचे आदोलन वाशीमध्ये पोहोचले आहे. येथे झालेल्या सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी वाशीमध्ये उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी सरकारकडे केलेल्या मागण्याची माहिती दिली.


जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न १०० टक्के निकाली निघत नाही तोपर्यंत सरकारने कोणत्याही प्रकारची सरकारी नोकरभरती करून नये अशी मागणी जरांगे यांनी सरकारकडे केली आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शिक्षण मोफत द्या. तसेच सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र काढण्याचा आदेश द्यावा. यासोबतच आंतरवाली सराटीसह राज्यातील इतर ठिकाणचे गुन्हे मागे घेतल्याचे आदेश काढावेत अशी मागणी जरांगे यांनी सरकराकडे केली आहे.


तसेच आरक्षण मान्य झाल्याशिवाय सरकारने कोणत्याही प्रकारची शासकीय भरती करू नये मात्र भरती करायची असल्यास जागा राखीव ठेवण्यात याव्या असेही जरांगे यांनी सरकारला सांगितले. तसेच या मागण्यांसाठी सरकारने सहमती दर्शवल्याची माहितीही यावेळी जरांगेंनी दिली.


आज संध्याकाळपर्यंत शासनाचा निर्णय अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. जर सरकारकडून अध्यादेश निघाला नाही तर आझाद मैदानाच्या दिशेने कूच करणार असल्याचे जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केले.



मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या


आंतरवाली तसेच राज्यातील इतर ठिकाणी मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगे यांनी सरकारकडे केली आहे. तसेच समाजाच्या शेवटच्या माणसाला आरक्षण मिळत नाही तोवर १०० टक्के शिक्षण मोफत केले जावे अशी मागणीही यावेळी जरांगे यांच्याकडून करण्यात आली.

Comments
Add Comment

शाळांमध्ये १४ ऑगस्टपासून पसायदानाचे पठण

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) :

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची