जडेजा ८१ धावांवर नाबाद,भारत दुसऱ्या दिवसअखेर ७ बाद ४२१

हैदराबाद: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताची धावसंख्या दिवसअखेर ७ बाद ४२१ झाली आहे. भारताकडे १७५ धावांची आघाडी झाली आहे. जडेजा ८१ धावांवर नाबाद आहे. अक्षर पटेलने त्याला चांगली साथ दिली आहे. अक्षऱ ३५ धावांवर नाबाद आहे.


तिसऱ्या दिवशी भारत पहिल्या सेशनमध्ये फलंदाजी करत इंग्लंडला दुसऱ्या डावाच्या फलंदाजीसाठी निमंत्रित करू शकतो. सामना पूर्णपणे भारताच्या दिशेने दिसत आहे. रवींद्र जडेजाने या डावात सुंदर फलंदाजी केली. त्याने संयमी खेळी करताना भारताला चारशेहून अधिक धावसंख्या गाठून दिली.त्याचमुळे भारताला पावणेदोनशे धावांची आघाडी घेण्यात यश मिळाले.


याआधी इंग्लंडला पहिल्या डावात केवळ २४६ धावा करता आल्या. भारताच्या गोलंदाजांनी कमाल करत इंग्लिश संघाला अडीचशे धावांचा टप्पाही गाठू दिला नाही. बेन स्टोक्सने कर्णधाराला साजेशी खेळी केली. स्टोक्सने ८८ बॉलचा सामना करताना ७० धावा केल्या. त्याने ६ चौकार आणि ३ षटकार ठोकले. जॉनी बेअरस्ट्रॉने ५८ चेंडूंचा सामना करताना ३७ धावा केल्या. यात ५ चौकारांचा समावेश आहे. बेन डकेटने ३५ धावांची खेळी केली. जॅक क्रॉलीने २० धावा केल्या.


टीम इंडियासाठी रवींद्र जडेजा आणि रवींचंद्रन अश्विनने ३-३ विकेट मिळवल्या. जडेजाने १८ ओव्हरमध्ये ८८ धावा केल्या. अश्विनने २१ ओव्हरमध्ये ६८ धावा दिल्या. अक्षऱ पटेलने १३ ओव्हरमध्ये ३३ धावा देत २ विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराहलाही २ विकेट मिळवण्यात यश मिळाले.

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण